शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बनावट खतांचा सुळसुळाट

By admin | Updated: November 18, 2016 00:45 IST

बियाणासह खते जप्त : शंभरांवर विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा, तेरा गुणनियंत्रण पथके तैनात

आयुब मुल्ला -- खोची --जिल्ह्यातील रासायनिक खतांची बोगसगिरी वाढल्याचे पाहणीत निष्पन्न झाले आहे. बियाणेसुद्धा संख्येने जास्त अपात्र झाले आहेत. त्यांच्यासंदर्भात गुणनियंत्रण पथकाने कडक कारवाई केली आहे. शेतकऱ्यांच्या हाती बोगस बियाणे देण्याबरोबरच खतांचाही काळाबाजार करण्याचा प्रकार प्रकर्षाने पुढे आला आहे. खते, बियाणे, औषधे विक्री करणारे जवळपास शंभर नमुने अपात्र ठरले आहेत. त्यामुळे शंभरांवर विक्रेत्यांवर कायदेशीर संकट उभारले आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तानिविष्ठा म्हणजे खते, बियाणे, औषधे, सूक्ष्म मूलद्रव्य मिळण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग व राज्य शासन कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे गुणनियंत्रण पथक कार्यरत असते. चालूवर्षी या पथकाला तपासणीच्या कालावधीत अनेक धक्कादायक अनुभव आले आहेत. ५५३ बियाणांचे, २७९ खतांचे, ११0 औषधांचे नमुने तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.एप्रिलपासून तपासणीचे काम सुरू आहे. या कालावधीत जवळपास ८0 टक्के तपासणी करण्यात आली. डिसेंबरपर्यंत उर्वरित तपासणी होणार आहे. ज्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले त्यामध्ये अपात्र असणारी संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. विविध प्रकारच्या बियाणे कंपन्यांची रेलचेल आहे. यामध्ये विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली असता पाच प्रकारचे बियाणे नापास असल्याचे सिद्ध झाले आहे. यापैकी दोन कोर्ट केसेससाठी पात्र झाले आहेत. तीन विक्रेत्यांना ताकीद देण्यात आली आहे. रासायनिक खतांमध्ये मात्र बोगसगिरीचा सुळसुळाट असल्याचे निष्पन्न झाले आहे. १५९ दुकानांतील खतांचे नमुने तपासले. त्यामध्ये ४४ कोर्टकेससाठी पात्र झाले आहेत. १५ खतविक्रेत्यांना सक्त ताकीद दिली आहे. औषधांच्याबाबत दोन कोर्ट केसेसाठी पात्र ठरले आहेत. आजअखेर ३१ बियाणे विक्रेत्यांवर बंदी घालण्यात आली. ११.२ मेट्रिक टन रासायनिक खते जप्त केली आहेत. सुपर फॉस्फेट, दुय्यम अन्नद्रव्य घटक ९२ हजार रुपयांचे जप्त केले आहेत. त्यामुळे निविष्ठा प्रकारातील खतांची बाब गंभीर आहे. बियाण्यांच्या बाबतीतही सतर्क राहणे गरजेचे आहे. हे स्पष्ट झाले. अशी गुणनियंत्रण पथके तेरा आहेत. जिल्हा पातळीवरील एक व बारा तालुक्यात प्रत्येक ी एक हे पथक कार्यरत आहे.बोगसगिरांवर गुन्हाखत व त्यावरील पिशवी बोगस तयार करुन एका कंपनीच्या नावाखाली विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा बोगसगिरांवर गुन्हा नोंद नुकताच झाला आहे.गुणनियंत्रण पथक अत्यंत पारदर्शीपणे तपासणी करीत आहे. त्यामुळे बोगसगिरी बियाणे नापास होण्याचे प्रमाण आढळले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, बोगसगिरीला आळा बसावा यासाठी कडक कारवाई करण्यात येत आहे. - सुरेश मगदूम,कृषी उपसंचालक, कोल्हापूर.