शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जिल्ह्यात बनावट खतांचा सुळसुळाट

By admin | Updated: November 18, 2016 00:45 IST

बियाणासह खते जप्त : शंभरांवर विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा, तेरा गुणनियंत्रण पथके तैनात

आयुब मुल्ला -- खोची --जिल्ह्यातील रासायनिक खतांची बोगसगिरी वाढल्याचे पाहणीत निष्पन्न झाले आहे. बियाणेसुद्धा संख्येने जास्त अपात्र झाले आहेत. त्यांच्यासंदर्भात गुणनियंत्रण पथकाने कडक कारवाई केली आहे. शेतकऱ्यांच्या हाती बोगस बियाणे देण्याबरोबरच खतांचाही काळाबाजार करण्याचा प्रकार प्रकर्षाने पुढे आला आहे. खते, बियाणे, औषधे विक्री करणारे जवळपास शंभर नमुने अपात्र ठरले आहेत. त्यामुळे शंभरांवर विक्रेत्यांवर कायदेशीर संकट उभारले आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तानिविष्ठा म्हणजे खते, बियाणे, औषधे, सूक्ष्म मूलद्रव्य मिळण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग व राज्य शासन कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे गुणनियंत्रण पथक कार्यरत असते. चालूवर्षी या पथकाला तपासणीच्या कालावधीत अनेक धक्कादायक अनुभव आले आहेत. ५५३ बियाणांचे, २७९ खतांचे, ११0 औषधांचे नमुने तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.एप्रिलपासून तपासणीचे काम सुरू आहे. या कालावधीत जवळपास ८0 टक्के तपासणी करण्यात आली. डिसेंबरपर्यंत उर्वरित तपासणी होणार आहे. ज्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले त्यामध्ये अपात्र असणारी संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. विविध प्रकारच्या बियाणे कंपन्यांची रेलचेल आहे. यामध्ये विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी केली असता पाच प्रकारचे बियाणे नापास असल्याचे सिद्ध झाले आहे. यापैकी दोन कोर्ट केसेससाठी पात्र झाले आहेत. तीन विक्रेत्यांना ताकीद देण्यात आली आहे. रासायनिक खतांमध्ये मात्र बोगसगिरीचा सुळसुळाट असल्याचे निष्पन्न झाले आहे. १५९ दुकानांतील खतांचे नमुने तपासले. त्यामध्ये ४४ कोर्टकेससाठी पात्र झाले आहेत. १५ खतविक्रेत्यांना सक्त ताकीद दिली आहे. औषधांच्याबाबत दोन कोर्ट केसेसाठी पात्र ठरले आहेत. आजअखेर ३१ बियाणे विक्रेत्यांवर बंदी घालण्यात आली. ११.२ मेट्रिक टन रासायनिक खते जप्त केली आहेत. सुपर फॉस्फेट, दुय्यम अन्नद्रव्य घटक ९२ हजार रुपयांचे जप्त केले आहेत. त्यामुळे निविष्ठा प्रकारातील खतांची बाब गंभीर आहे. बियाण्यांच्या बाबतीतही सतर्क राहणे गरजेचे आहे. हे स्पष्ट झाले. अशी गुणनियंत्रण पथके तेरा आहेत. जिल्हा पातळीवरील एक व बारा तालुक्यात प्रत्येक ी एक हे पथक कार्यरत आहे.बोगसगिरांवर गुन्हाखत व त्यावरील पिशवी बोगस तयार करुन एका कंपनीच्या नावाखाली विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा बोगसगिरांवर गुन्हा नोंद नुकताच झाला आहे.गुणनियंत्रण पथक अत्यंत पारदर्शीपणे तपासणी करीत आहे. त्यामुळे बोगसगिरी बियाणे नापास होण्याचे प्रमाण आढळले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, बोगसगिरीला आळा बसावा यासाठी कडक कारवाई करण्यात येत आहे. - सुरेश मगदूम,कृषी उपसंचालक, कोल्हापूर.