शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

मंंदिर परिसरात सुविधांची वाणवा

By admin | Updated: February 7, 2015 00:05 IST

पर्यटकांची गैरसोय : मंदिराला अतिक्रमणाचा विळखा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतागृहांचा अभाव

कोल्हापूर : ‘शहराचे हृदय’ म्हणून ज्या प्रभागाची ओळख सांगता येईल त्या महालक्ष्मी मंदिर प्रभागात सध्या सगळ््यात मोठा प्रश्न आहे तो येथे येणाऱ्या भाविकांना न मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांचा. महापालिकेकडील निधीची कमतरता आणि शासनपातळीवर मंदिराच्या विकासाबाबतची उदासीनता, ठेकेदारांची अनुपलब्धता यामुळे परिसरात स्वच्छतागृहे नाहीत. महाद्वार रोड, जोतिबा रोडसारख्या रस्त्यांची चाळण झाली आहे. महालक्ष्मी मंदिर या प्रभागात बालगोपाल तालीम, शेषनारायण मंदिर, बाबूजमाल दर्गा परिसर, गंगावेश, अर्बन बँकेची मागील बाजू, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, भेंडे गल्ली, कासार गल्ली, महादेव गल्ली, परीट गल्ली असा भरवस्तीचा परिसर येतो. साधारण साडेसहा हजार लोकवस्ती असलेल्या या प्रभागाचे गेली १५ वर्षे परमार कुटुंबीय नेतृत्व करत आहेत. सध्या रणजित परमार हे या प्रभागाचे नगरसेवक आहेत. मात्र, त्यापूर्वी त्यांच्या पत्नी नयना परमार व भाऊ ईश्वर परमार यांनी देखील या प्रभागाचे नगरसेवकपद पाहिले आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांचा परमार कुटुंबावर विश्वास आहे. मध्यवस्ती परिसरात सर्व जाती-धर्माचे लोक राहतात. रहिवासी तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारीवर्गदेखील आहे. व्यापारीवर्गापेक्षा रहिवासी वस्तीतील नागरिकांच्या सोयी-सुविधांकडे अधिक लक्ष पुरविण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याचा, ड्रेनेजचा किंवा गटारींचा प्रश्न नाही, कारण ही कामे झाली आहेत. येथे प्रश्न येतो तो रस्त्यांचा आणि बाहेरील भाविकांच्या सोयी-सुविधांचा. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर आहे. मंदिराभोवती अतिक्रमणांना विळखा असून त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि गर्दीचा सामना करावा लागतो. पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे नाहीत, घाटी दरवाजा परिसरात अस्वच्छता, इंदुमती गर्ल्स हायस्कूलसमोर असणाऱ्या स्वच्छतागृहांची अवस्था वाईट झाली आहे, हे प्रश्न महत्त्वाचे ठरत आहेत. बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार रोड ते पापाची तिकटी या मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. अंबाबाईचा रथोत्सव, नगरप्रदक्षिणा हेच अडथळे पार करत निघते. मात्र, मंदिराशी निगडित विषय महापालिकेच्या मुख्य प्रशासन पातळीवर होत असल्याने नगरसेवकांना त्यात फारसा वाव नाही. महापालिका पातळीवर या विषयाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही, शिवाय ठेकेदारांमधील उदासीनतेमुळे मंजूर झालेली कामेही रखडली आहेत. मंजूर कामे येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहेत. कोणतेही पद नसताना केलेल्या कामांमुळे गेली १५ वर्षे नागरिकांनी परमार कुटुंबावर विश्वास टाकला आहे. प्रभागात अंबाबाई मंदिर परिसरात सुविधा नाहीत. त्यासाठी वारंवार प्रयत्न सुरू आहेत, मात्र ठेकेदारांमध्ये उदासीनता असल्याने काम रखडले आहे. - रणजित परमार (नगरसेवक)