शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

मंंदिर परिसरात सुविधांची वाणवा

By admin | Updated: February 7, 2015 00:05 IST

पर्यटकांची गैरसोय : मंदिराला अतिक्रमणाचा विळखा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतागृहांचा अभाव

कोल्हापूर : ‘शहराचे हृदय’ म्हणून ज्या प्रभागाची ओळख सांगता येईल त्या महालक्ष्मी मंदिर प्रभागात सध्या सगळ््यात मोठा प्रश्न आहे तो येथे येणाऱ्या भाविकांना न मिळणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांचा. महापालिकेकडील निधीची कमतरता आणि शासनपातळीवर मंदिराच्या विकासाबाबतची उदासीनता, ठेकेदारांची अनुपलब्धता यामुळे परिसरात स्वच्छतागृहे नाहीत. महाद्वार रोड, जोतिबा रोडसारख्या रस्त्यांची चाळण झाली आहे. महालक्ष्मी मंदिर या प्रभागात बालगोपाल तालीम, शेषनारायण मंदिर, बाबूजमाल दर्गा परिसर, गंगावेश, अर्बन बँकेची मागील बाजू, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, भेंडे गल्ली, कासार गल्ली, महादेव गल्ली, परीट गल्ली असा भरवस्तीचा परिसर येतो. साधारण साडेसहा हजार लोकवस्ती असलेल्या या प्रभागाचे गेली १५ वर्षे परमार कुटुंबीय नेतृत्व करत आहेत. सध्या रणजित परमार हे या प्रभागाचे नगरसेवक आहेत. मात्र, त्यापूर्वी त्यांच्या पत्नी नयना परमार व भाऊ ईश्वर परमार यांनी देखील या प्रभागाचे नगरसेवकपद पाहिले आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांचा परमार कुटुंबावर विश्वास आहे. मध्यवस्ती परिसरात सर्व जाती-धर्माचे लोक राहतात. रहिवासी तसेच मोठ्या प्रमाणात व्यापारीवर्गदेखील आहे. व्यापारीवर्गापेक्षा रहिवासी वस्तीतील नागरिकांच्या सोयी-सुविधांकडे अधिक लक्ष पुरविण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्याचा, ड्रेनेजचा किंवा गटारींचा प्रश्न नाही, कारण ही कामे झाली आहेत. येथे प्रश्न येतो तो रस्त्यांचा आणि बाहेरील भाविकांच्या सोयी-सुविधांचा. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान करवीरनिवासिनी अंबाबाईचे मंदिर आहे. मंदिराभोवती अतिक्रमणांना विळखा असून त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आणि गर्दीचा सामना करावा लागतो. पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे नाहीत, घाटी दरवाजा परिसरात अस्वच्छता, इंदुमती गर्ल्स हायस्कूलसमोर असणाऱ्या स्वच्छतागृहांची अवस्था वाईट झाली आहे, हे प्रश्न महत्त्वाचे ठरत आहेत. बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार रोड ते पापाची तिकटी या मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. अंबाबाईचा रथोत्सव, नगरप्रदक्षिणा हेच अडथळे पार करत निघते. मात्र, मंदिराशी निगडित विषय महापालिकेच्या मुख्य प्रशासन पातळीवर होत असल्याने नगरसेवकांना त्यात फारसा वाव नाही. महापालिका पातळीवर या विषयाकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही, शिवाय ठेकेदारांमधील उदासीनतेमुळे मंजूर झालेली कामेही रखडली आहेत. मंजूर कामे येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहेत. कोणतेही पद नसताना केलेल्या कामांमुळे गेली १५ वर्षे नागरिकांनी परमार कुटुंबावर विश्वास टाकला आहे. प्रभागात अंबाबाई मंदिर परिसरात सुविधा नाहीत. त्यासाठी वारंवार प्रयत्न सुरू आहेत, मात्र ठेकेदारांमध्ये उदासीनता असल्याने काम रखडले आहे. - रणजित परमार (नगरसेवक)