शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एफ. आर. पी. देण्यासाठी कारखान्यांना अनुदान द्या

By admin | Updated: December 11, 2014 23:48 IST

चंद्रदीप नरके यांची मागणी : राज्यातील साखर कारखान्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

कोपार्डे : साखरेचे दर घसरल्याने साखर उद्योग आर्थिक अडचणीतून जात आहे. राज्यातील ७० ते ८० टक्के शेतकरी या उद्योगावर अवलंबून असून, त्यांच्याबरोबर कंत्राटदार, कामगार, छोटे-मोठे उद्योगधंदे याच साखर उद्योगावर अवलंबून आहेत. यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेल, तर एफआरपी देण्यासाठी कमी पडणारी रक्कम कर्ज म्हणून नव्हे, तर अनुदान म्हणून द्यावी, अशा मागणीचे निवेदन आमदार चंद्रदीप नरके यांनी सर्व साखर कारखानदारांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, ऊस उत्पादकांना कायद्याने उसाचा किमान भाव (एफआरपी) देणे बंधनकारक असल्याचे सांगत साखरेचा २०१४-१५ चा हंगाम सुरू झाल्यापासून प्रतिक्विंटलचा दर सतत घसरत आहे. साखरेचे २८०० ते ३२०० प्रतिक्विंटल असणारे भाव सध्या २४०० ते २५०० रुपयांवर घसरले आहेत. मात्र, साखर उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ होत असून, सध्या किमान उत्पादन खर्च सरासरी प्रतिटन १५०० ते १६०० च्या दरम्यान येत आहे. सध्याच्या बाजारातील साखर दराप्रमाणे राज्य बॅँकेने प्रतिक्विंटल २५३५ रुपये साखर मूल्यांकन केले आहे. यातून १५ टक्के मार्जिन वजा जाता त्यातून वसुलीसाठी ५०० व प्रक्रिया खर्च २५० वजा करून घेतला जातो. उसाची बिले देण्यासाठी केवळ १४०५ रुपये उपलब्ध होतात. कारखान्यांच्या हंगामातील सरासरी उतारा व बॅँकेचे मूल्यांकन पाहता कारखान्यांना उसाची बिले देण्यासाठी १८०० ते २००० रुपये उपलब्ध होऊ शकतात. ऊस उत्पादकांना देण्यासाठी केंद्र शासनाने ठरविलेल्या एफआरपी सूत्रानुसार राज्यातील साखर कारखान्यांना साखर उताऱ्याप्रमाणे प्रतिटन २४०० ते २६०० देणे कायदेशीर बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कारखान्याना ५०० ते ७०० रुपयेपर्यंत एफआरपी देण्यासाठी कमी पडत आहे. कारखाने ते देऊ शकत नाहीत. त्यामुळे हंगाम सुरू होऊन एक महिना झाला तरी कारखाने उसाचे पेमेंट करू शकलेले नाहीत. मागील हंगामात एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल्याने कारखाने सुरळीत सुरू झाले. या हंगामातही एफआरपीसाठी कमी पडणारे ५०० ते ७०० रुपये कर्ज म्हणून न देता अनुदान म्हणून द्यावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.