शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

एफ. आर. पी. देण्यासाठी कारखान्यांना अनुदान द्या

By admin | Updated: December 11, 2014 23:48 IST

चंद्रदीप नरके यांची मागणी : राज्यातील साखर कारखान्यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

कोपार्डे : साखरेचे दर घसरल्याने साखर उद्योग आर्थिक अडचणीतून जात आहे. राज्यातील ७० ते ८० टक्के शेतकरी या उद्योगावर अवलंबून असून, त्यांच्याबरोबर कंत्राटदार, कामगार, छोटे-मोठे उद्योगधंदे याच साखर उद्योगावर अवलंबून आहेत. यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेल, तर एफआरपी देण्यासाठी कमी पडणारी रक्कम कर्ज म्हणून नव्हे, तर अनुदान म्हणून द्यावी, अशा मागणीचे निवेदन आमदार चंद्रदीप नरके यांनी सर्व साखर कारखानदारांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, ऊस उत्पादकांना कायद्याने उसाचा किमान भाव (एफआरपी) देणे बंधनकारक असल्याचे सांगत साखरेचा २०१४-१५ चा हंगाम सुरू झाल्यापासून प्रतिक्विंटलचा दर सतत घसरत आहे. साखरेचे २८०० ते ३२०० प्रतिक्विंटल असणारे भाव सध्या २४०० ते २५०० रुपयांवर घसरले आहेत. मात्र, साखर उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ होत असून, सध्या किमान उत्पादन खर्च सरासरी प्रतिटन १५०० ते १६०० च्या दरम्यान येत आहे. सध्याच्या बाजारातील साखर दराप्रमाणे राज्य बॅँकेने प्रतिक्विंटल २५३५ रुपये साखर मूल्यांकन केले आहे. यातून १५ टक्के मार्जिन वजा जाता त्यातून वसुलीसाठी ५०० व प्रक्रिया खर्च २५० वजा करून घेतला जातो. उसाची बिले देण्यासाठी केवळ १४०५ रुपये उपलब्ध होतात. कारखान्यांच्या हंगामातील सरासरी उतारा व बॅँकेचे मूल्यांकन पाहता कारखान्यांना उसाची बिले देण्यासाठी १८०० ते २००० रुपये उपलब्ध होऊ शकतात. ऊस उत्पादकांना देण्यासाठी केंद्र शासनाने ठरविलेल्या एफआरपी सूत्रानुसार राज्यातील साखर कारखान्यांना साखर उताऱ्याप्रमाणे प्रतिटन २४०० ते २६०० देणे कायदेशीर बंधनकारक आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कारखान्याना ५०० ते ७०० रुपयेपर्यंत एफआरपी देण्यासाठी कमी पडत आहे. कारखाने ते देऊ शकत नाहीत. त्यामुळे हंगाम सुरू होऊन एक महिना झाला तरी कारखाने उसाचे पेमेंट करू शकलेले नाहीत. मागील हंगामात एक्साईज ड्युटीच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल्याने कारखाने सुरळीत सुरू झाले. या हंगामातही एफआरपीसाठी कमी पडणारे ५०० ते ७०० रुपये कर्ज म्हणून न देता अनुदान म्हणून द्यावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.