शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कोल्हापूर महापौर निवडणुकीत कमालीची चुरस

By admin | Updated: November 10, 2015 00:02 IST

परंतु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते काहीसे अस्वस्थ झाले आहेत.

कोल्हापूर : महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सध्या कॉँग्रेसकडे ४४, तर भाजप-ताराराणी आघाडीकडे ३७ नगरसेवक (शिवसेनेच्या ४ सदस्यांचा पाठिंबा गृहीत धरुन) आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर ‘भाजप’चाच होईल, असे वारंवार सांगितल्यामुळे विशेषत: कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीबाबत उत्कंठा लागून राहिली आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने आघाडी केली आहे. या आघाडीला दोन अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. भाजप-ताराराणी आघाडीनेही या निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु त्यांना नऊ जागा कमी पडल्याने त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला; परंतु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते काहीसे अस्वस्थ झाले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मोठी आमिषे दाखविली गेल्याची चर्चा आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीसह कॉँग्रेसचे नेतेही नगरसेवकांना पक्षाशी एकनिष्ट राहण्याचे आवाहन करू लागले आहेत. भाजप-ताराराणी आघाडीचे नेते सत्तेसाठी फारच प्रयत्नशील आहेत. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेच्या नगरसेवकांसह ३७ इतके संख्याबळ आहे. भाजपचा महापौर करण्यासाठी केवळ चार ते पाच नगरसेवक त्यांना पाहिजे आहेत. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सरू आहेत. (प्रतिनिधी)