शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

कोल्हापूर महापौर निवडणुकीत कमालीची चुरस

By admin | Updated: November 10, 2015 00:02 IST

परंतु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते काहीसे अस्वस्थ झाले आहेत.

कोल्हापूर : महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. सध्या कॉँग्रेसकडे ४४, तर भाजप-ताराराणी आघाडीकडे ३७ नगरसेवक (शिवसेनेच्या ४ सदस्यांचा पाठिंबा गृहीत धरुन) आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर ‘भाजप’चाच होईल, असे वारंवार सांगितल्यामुळे विशेषत: कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीबाबत उत्कंठा लागून राहिली आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने आघाडी केली आहे. या आघाडीला दोन अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. भाजप-ताराराणी आघाडीनेही या निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु त्यांना नऊ जागा कमी पडल्याने त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला; परंतु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते काहीसे अस्वस्थ झाले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना मोठी आमिषे दाखविली गेल्याची चर्चा आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीसह कॉँग्रेसचे नेतेही नगरसेवकांना पक्षाशी एकनिष्ट राहण्याचे आवाहन करू लागले आहेत. भाजप-ताराराणी आघाडीचे नेते सत्तेसाठी फारच प्रयत्नशील आहेत. सध्या त्यांच्याकडे शिवसेनेच्या नगरसेवकांसह ३७ इतके संख्याबळ आहे. भाजपचा महापौर करण्यासाठी केवळ चार ते पाच नगरसेवक त्यांना पाहिजे आहेत. त्यासाठीच त्यांचे प्रयत्न सरू आहेत. (प्रतिनिधी)