शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईवर हवा नियोजनाचा उतारा

By admin | Updated: March 8, 2016 00:44 IST

इचलकरंजीतील प्रश्न : नदीवेस चौकात आंदोलन; नव्या वसाहतींसाठी टँकरची मागणी

इचलकरंजी : पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत असताना शहरात विविध ठिकाणी होणारी आंदोलने पाहता नियोजनाच्या अभावाबरोबरच गांभीर्य नसल्याचे निदर्शनात येत आहे. पाण्याच्या आणीबाणीवर मात करण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजनेतून सोडले जाणारे पाणी आणि कूपनलिकांच्या पाणी उपशावरही नियंत्रण होणे गरजेचे आहे. शहरातील नव्याने वाढलेल्या सहारानगर, शहापूर यासारख्या वसाहतींमध्ये जून महिन्यापर्यंत टॅँकरने नियमित पाणी पुरवठा होण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे.इचलकरंजीस कृष्णा व पंचगंगा नद्यातून पाण्याचा पुरवठा होत असला तरी पंचगंगा नदीचे पाणी दूषित झाल्याने जानेवारी महिन्यापासून बंद होते. त्यामुळे कृष्णा नदीतूनच मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. जून महिन्यापर्यंत कृष्णा नदीवरच अवलंबून राहावे लागते. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णा नदीतील पात्र फेब्रुवारी अखेरपासूनच कोरडे पडू लागले आहे. मजरेवाडी जॅकवेलच्या इंटकवेलमधील रोझ व्हॉल्व्ह रिकामी पडल्यामुळे इचलकरंजीतील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. त्याचा परिणाम म्हणून शहरवासीयांना कूपनलिकांच्या पाण्यावरच गुजरण करावी लागते.दरम्यानच्या काळात आमदार सुरेश हाळवणकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून चांदोली व त्यानंतर म्हैसाळ बंधाऱ्यातील पाणी राजापूर बंधाऱ्यामध्ये सोडण्यास सांगितले. राजापूर बंधाऱ्यामध्ये पाण्याचा साठा झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला. तरीही पूर्वी दोन किंवा तीन दिवसांतून मिळणारे नळाचे पाणी आता चार आणि पाच दिवसांनी मिळत आहे.शहरात बहुतांश ठिकाणी कमी दाबाचा आणि अपुरा पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम म्हणून ठिकठिकाणी संतप्त नागरिक रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, मोर्चा अशी आंदोलने करीत आहेत. सोमवारीही शहरातील गावभागामधील आंबी गल्ली, नदीवेस नाका, गुजरी पेठ कॉर्नर, जगताप तालीम परिसर अशा व्यापक भागांमध्ये अनियमित, अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबद्दल कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते, नगरसेवक संजय तेलनाडे, युवक कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अमृत भोसले, माजी नगरसेवक अहमद मुजावर, पापालाल मुजावर, आदींच्या नेतृत्वाखाली नदीवेस-मरगुबाई मंदिर चौकात सुमारे दीड तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांना सामोरे जाणाऱ्या नगरपालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना विशेषत: महिला नागरिकांनी पाणी टंचाई व त्याबाबत होणारी अनियमितता याबद्दल अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. पाणी टंचाई संपेपर्यंत जलअभियंता ए. एन. जकीनकर यांना इचलकरंजीतच थांबण्यास सांगण्याविषयी नागरिकांनी सांगितले. यावर प्रज्ञा पोतदार यांनी, जलअभियंता जकीनकर मंगळवारी संबंधित भागांची पाहणी करतील आणि त्यांना पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)पेयजल प्रकल्प सुरू ठेवाशहरात जनता बॅँक, आयको स्पिन, नवमहाराष्ट्र सूतगिरणी यांनी विविध ठिकाणी शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू केले आहेत. अकरा ठिकाणी असलेल्या या प्रकल्पांना उन्हाळ्यात नेहमीच गर्दी होते. मात्र, पाणी टंचाईच्या काळात यापैकी पाच-सहा प्रकल्प पाण्याअभावी बंद पडतात. त्यावेळी प्रकल्पांना सातत्याने पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. शहरातील सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, दानशूर व्यक्ती-विश्वस्त यांनीही नवीन प्रकल्प उभारून ते ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवावेत, अशी मागणी होत आहे.