शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

पाणी टंचाईवर हवा नियोजनाचा उतारा

By admin | Updated: March 8, 2016 00:44 IST

इचलकरंजीतील प्रश्न : नदीवेस चौकात आंदोलन; नव्या वसाहतींसाठी टँकरची मागणी

इचलकरंजी : पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत असताना शहरात विविध ठिकाणी होणारी आंदोलने पाहता नियोजनाच्या अभावाबरोबरच गांभीर्य नसल्याचे निदर्शनात येत आहे. पाण्याच्या आणीबाणीवर मात करण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजनेतून सोडले जाणारे पाणी आणि कूपनलिकांच्या पाणी उपशावरही नियंत्रण होणे गरजेचे आहे. शहरातील नव्याने वाढलेल्या सहारानगर, शहापूर यासारख्या वसाहतींमध्ये जून महिन्यापर्यंत टॅँकरने नियमित पाणी पुरवठा होण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे.इचलकरंजीस कृष्णा व पंचगंगा नद्यातून पाण्याचा पुरवठा होत असला तरी पंचगंगा नदीचे पाणी दूषित झाल्याने जानेवारी महिन्यापासून बंद होते. त्यामुळे कृष्णा नदीतूनच मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. जून महिन्यापर्यंत कृष्णा नदीवरच अवलंबून राहावे लागते. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णा नदीतील पात्र फेब्रुवारी अखेरपासूनच कोरडे पडू लागले आहे. मजरेवाडी जॅकवेलच्या इंटकवेलमधील रोझ व्हॉल्व्ह रिकामी पडल्यामुळे इचलकरंजीतील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. त्याचा परिणाम म्हणून शहरवासीयांना कूपनलिकांच्या पाण्यावरच गुजरण करावी लागते.दरम्यानच्या काळात आमदार सुरेश हाळवणकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून चांदोली व त्यानंतर म्हैसाळ बंधाऱ्यातील पाणी राजापूर बंधाऱ्यामध्ये सोडण्यास सांगितले. राजापूर बंधाऱ्यामध्ये पाण्याचा साठा झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला. तरीही पूर्वी दोन किंवा तीन दिवसांतून मिळणारे नळाचे पाणी आता चार आणि पाच दिवसांनी मिळत आहे.शहरात बहुतांश ठिकाणी कमी दाबाचा आणि अपुरा पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम म्हणून ठिकठिकाणी संतप्त नागरिक रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, मोर्चा अशी आंदोलने करीत आहेत. सोमवारीही शहरातील गावभागामधील आंबी गल्ली, नदीवेस नाका, गुजरी पेठ कॉर्नर, जगताप तालीम परिसर अशा व्यापक भागांमध्ये अनियमित, अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबद्दल कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते, नगरसेवक संजय तेलनाडे, युवक कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अमृत भोसले, माजी नगरसेवक अहमद मुजावर, पापालाल मुजावर, आदींच्या नेतृत्वाखाली नदीवेस-मरगुबाई मंदिर चौकात सुमारे दीड तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांना सामोरे जाणाऱ्या नगरपालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना विशेषत: महिला नागरिकांनी पाणी टंचाई व त्याबाबत होणारी अनियमितता याबद्दल अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. पाणी टंचाई संपेपर्यंत जलअभियंता ए. एन. जकीनकर यांना इचलकरंजीतच थांबण्यास सांगण्याविषयी नागरिकांनी सांगितले. यावर प्रज्ञा पोतदार यांनी, जलअभियंता जकीनकर मंगळवारी संबंधित भागांची पाहणी करतील आणि त्यांना पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)पेयजल प्रकल्प सुरू ठेवाशहरात जनता बॅँक, आयको स्पिन, नवमहाराष्ट्र सूतगिरणी यांनी विविध ठिकाणी शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू केले आहेत. अकरा ठिकाणी असलेल्या या प्रकल्पांना उन्हाळ्यात नेहमीच गर्दी होते. मात्र, पाणी टंचाईच्या काळात यापैकी पाच-सहा प्रकल्प पाण्याअभावी बंद पडतात. त्यावेळी प्रकल्पांना सातत्याने पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. शहरातील सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, दानशूर व्यक्ती-विश्वस्त यांनीही नवीन प्रकल्प उभारून ते ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवावेत, अशी मागणी होत आहे.