शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

पाणी टंचाईवर हवा नियोजनाचा उतारा

By admin | Updated: March 8, 2016 00:44 IST

इचलकरंजीतील प्रश्न : नदीवेस चौकात आंदोलन; नव्या वसाहतींसाठी टँकरची मागणी

इचलकरंजी : पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत असताना शहरात विविध ठिकाणी होणारी आंदोलने पाहता नियोजनाच्या अभावाबरोबरच गांभीर्य नसल्याचे निदर्शनात येत आहे. पाण्याच्या आणीबाणीवर मात करण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजनेतून सोडले जाणारे पाणी आणि कूपनलिकांच्या पाणी उपशावरही नियंत्रण होणे गरजेचे आहे. शहरातील नव्याने वाढलेल्या सहारानगर, शहापूर यासारख्या वसाहतींमध्ये जून महिन्यापर्यंत टॅँकरने नियमित पाणी पुरवठा होण्याची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे.इचलकरंजीस कृष्णा व पंचगंगा नद्यातून पाण्याचा पुरवठा होत असला तरी पंचगंगा नदीचे पाणी दूषित झाल्याने जानेवारी महिन्यापासून बंद होते. त्यामुळे कृष्णा नदीतूनच मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील जॅकवेलमधून पाणीपुरवठा केला जातो. जून महिन्यापर्यंत कृष्णा नदीवरच अवलंबून राहावे लागते. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णा नदीतील पात्र फेब्रुवारी अखेरपासूनच कोरडे पडू लागले आहे. मजरेवाडी जॅकवेलच्या इंटकवेलमधील रोझ व्हॉल्व्ह रिकामी पडल्यामुळे इचलकरंजीतील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. त्याचा परिणाम म्हणून शहरवासीयांना कूपनलिकांच्या पाण्यावरच गुजरण करावी लागते.दरम्यानच्या काळात आमदार सुरेश हाळवणकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून चांदोली व त्यानंतर म्हैसाळ बंधाऱ्यातील पाणी राजापूर बंधाऱ्यामध्ये सोडण्यास सांगितले. राजापूर बंधाऱ्यामध्ये पाण्याचा साठा झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाला. तरीही पूर्वी दोन किंवा तीन दिवसांतून मिळणारे नळाचे पाणी आता चार आणि पाच दिवसांनी मिळत आहे.शहरात बहुतांश ठिकाणी कमी दाबाचा आणि अपुरा पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम म्हणून ठिकठिकाणी संतप्त नागरिक रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, मोर्चा अशी आंदोलने करीत आहेत. सोमवारीही शहरातील गावभागामधील आंबी गल्ली, नदीवेस नाका, गुजरी पेठ कॉर्नर, जगताप तालीम परिसर अशा व्यापक भागांमध्ये अनियमित, अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबद्दल कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते, नगरसेवक संजय तेलनाडे, युवक कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अमृत भोसले, माजी नगरसेवक अहमद मुजावर, पापालाल मुजावर, आदींच्या नेतृत्वाखाली नदीवेस-मरगुबाई मंदिर चौकात सुमारे दीड तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांना सामोरे जाणाऱ्या नगरपालिकेच्या अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना विशेषत: महिला नागरिकांनी पाणी टंचाई व त्याबाबत होणारी अनियमितता याबद्दल अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. पाणी टंचाई संपेपर्यंत जलअभियंता ए. एन. जकीनकर यांना इचलकरंजीतच थांबण्यास सांगण्याविषयी नागरिकांनी सांगितले. यावर प्रज्ञा पोतदार यांनी, जलअभियंता जकीनकर मंगळवारी संबंधित भागांची पाहणी करतील आणि त्यांना पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)पेयजल प्रकल्प सुरू ठेवाशहरात जनता बॅँक, आयको स्पिन, नवमहाराष्ट्र सूतगिरणी यांनी विविध ठिकाणी शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू केले आहेत. अकरा ठिकाणी असलेल्या या प्रकल्पांना उन्हाळ्यात नेहमीच गर्दी होते. मात्र, पाणी टंचाईच्या काळात यापैकी पाच-सहा प्रकल्प पाण्याअभावी बंद पडतात. त्यावेळी प्रकल्पांना सातत्याने पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. शहरातील सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, दानशूर व्यक्ती-विश्वस्त यांनीही नवीन प्रकल्प उभारून ते ना नफा ना तोटा तत्त्वावर चालवावेत, अशी मागणी होत आहे.