शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

वर्ग एक करण्यासाठी आता भरावी लागणार जादा रक्कम, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक जमिनींचे प्रस्ताव 'या' तालुक्यातील

By संदीप आडनाईक | Updated: March 13, 2024 17:31 IST

सवलतीच्या दराची मुदत ८ मार्चला संपली

संदीप आडनाईक

कोल्हापूर : भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग १ रूपांतर करण्यासाठी सवलतीच्या दराची मुदत ८ मार्चला संपल्यामुळे आता या कामासाठी संबंधित शेतकऱ्यांना जादा रक्कम भरावी लागणार आहे. वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी सर्वाधिक जमिनींचे प्रस्ताव करवीर आणि गगनबावडा येथील शेतकऱ्यांचे आहेत.कृषी वापरासाठी वितरित केलेल्या जमिनीसाठी सध्या बाजारमूल्याच्या ५० टक्के अधिमूल्य रक्कम भरण्याची सवलत आहे. मुदतवाढ न मिळाल्याने आता ७५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. वाणिज्य, औद्याेगिक वापरासाठी वाटलेल्या जमिनीसाठी ५० टक्के रक्कम भरण्याची सवलत आहे. मुदतवाढ न मिळाल्याने या जमिनींसाठी ६० टक्के रक्कम भरावी लागणार आहे. रहिवाशासाठी कब्जेहक्काने वाटलेल्या जमिनींसाठी १५ टक्के भरण्याची सवलत होती, ती आता ६० टक्के इतकी वाढणार आहे. रहिवासासाठी भाडेपट्ट्याने वाटलेल्या जमिनीसाठी २५ टक्के सवलत होती, ती आता ७५ टक्के इतकी होणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्ट्याने वाटलेल्या जमिनींसाठी १५ टक्के सवलत होती, तीही ७५ टक्के इतकी वाढलेली आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांना कब्जेहक्काने वाटलेल्या जमिनींसाठी १५ टक्के सवलत होती, तीही ६० टक्के इतकी होणार आहे.

पाच वर्षे मिळाली होती सवलत..

  • भोगवटादार वर्ग २ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग १ रूपांतर करण्यासाठी सवलतीचा दर आकारण्याबाबत ८ मार्च २०१९ रोजी शासन निर्णय झाला आणि तीन वर्षांची मुदत दिली होती. 
  • ही मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपली, त्यानंतर त्याला लवकर मुदतवाढ मिळाली नाही. 
  • या जमिनी वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यासाठी ७५ टक्के दर आकारण्यात येऊ लागले. 
  • त्यालाही वर्ष होऊन गेले, तरी त्यावर निर्णय झाला नव्हता. यामुळे विविध लोकप्रतिनिधी, विविध संघटना, नागरिकांनी राज्य सरकारकडे पुन्हा मुदतवाढ मागितली. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या आदेशानुसार राज्य शासनाने ८ मार्च २०२२ पासून ८ मार्च २०२४ पर्यंत दोन वर्षांची मुदतवाढ दिली. ही मुदत आता आज संपत आहे. 
  • आता या सवलतीला पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे; परंतु आता शेवटच्या दिवशी सादर होणारी प्रकरणे तीन महिन्यांत निकाली काढण्यास मात्र सवलत मिळाली आहे. 
टॅग्स :kolhapurकोल्हापूर