शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दामदुप्पटीचं आमिष दाखवून एकास १० लाखांस गंडा; कोल्हापूरमधील घटना

By भीमगोंड देसाई | Updated: September 20, 2022 17:13 IST

पाटील यांनी २८ मे ते २६ जुलै, २०२२ या कालावधीत १० लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली.

कोल्हापूर : एका बड्या कंपनीत गुंतवणूक केल्यास ४० ते ५० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह दोघा भामट्यांनी पन्हाळा तालुक्यातील केखले येथील एकाची १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली.

बाबासाहेब आनंदराव पाटील असे फसलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयित राहूल शर्मा आणि स्नेहा शर्मा यांच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, संशयीत स्नेहा आणि राहुल या दोघांनी वेगवेगळ्या फोन नंबरवरून मेसेज व फोन करून फिर्यादी बाबासाहेब पाटील यांना मार्केट कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

पाटील यांनी २८ मे ते २६ जुलै, २०२२ या कालावधीत १० लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही. आपली फसगत झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. वारंवार फोन करूनही परतावा मिळाला नाही. गुंतवलेल्या पैशाची मागणी केल्यानंतर उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. म्हणून पाटील यांनी सोमवारी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या भामट्यांकडून जिल्ह्यात आणखी काही लोकांची फसगत झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर