शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

साखरसाठा मर्यादेला मुदतवाढ, डिसेंबरनंतर व्यापा-यांसाठी साठा मर्यादा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 05:38 IST

कोल्हापूर : व्यापा-यांसाठी असलेल्या ५०० टन साखरसाठा मर्यादेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : व्यापा-यांसाठी असलेल्या ५०० टन साखरसाठा मर्यादेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाºयांनी सर्वांच्याच हितासाठी डिसेंबरनंतर ही साठा मर्यादा ठेवू नये, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.साठेबाजीला आळा घालण्यासाठी तसेच बाजारातील साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा, या हेतूने केंद्र सरकारने २९ एप्रिल २०१६ रोजी व्यापाºयांकडील साखरेच्या साठ्यावर मर्यादा घातली. त्यानुसार कोलकाता आणि परिसरातील व्यापाºयांना दरमहा एक हजार टन, तर देशाच्या अन्य भागांतील व्यापाºयांना दरमहा ५०० टन इतकाच साखरेचा साठा करण्याचे बंधन घालण्यात आले होते. हीच साठामर्यादा आणखी सहा महिन्यांसाठी कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या एप्रिलमध्ये घेतला होता. ही मुदत २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे.>केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने व्यापाºयांसाठी असलेल्या साखरेच्या साठा मर्यादेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी शिफारस केली असली, तरी व्यापाºयांनी मात्र त्याला विरोध केला आहे. मुदतवाढ द्यावयाचीच असेल तर ती ३० नोव्हेंबर किंवा ३१ डिसेंबरपर्यंतच द्यावी, अशी मागणी आॅल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनने गुरुवारी एका निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.