शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

साखरसाठा मर्यादेला मुदतवाढ, डिसेंबरनंतर व्यापा-यांसाठी साठा मर्यादा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 05:38 IST

कोल्हापूर : व्यापा-यांसाठी असलेल्या ५०० टन साखरसाठा मर्यादेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत कित्तुरे कोल्हापूर : व्यापा-यांसाठी असलेल्या ५०० टन साखरसाठा मर्यादेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. व्यापाºयांनी सर्वांच्याच हितासाठी डिसेंबरनंतर ही साठा मर्यादा ठेवू नये, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.साठेबाजीला आळा घालण्यासाठी तसेच बाजारातील साखरेचा पुरवठा सुरळीत राहावा, या हेतूने केंद्र सरकारने २९ एप्रिल २०१६ रोजी व्यापाºयांकडील साखरेच्या साठ्यावर मर्यादा घातली. त्यानुसार कोलकाता आणि परिसरातील व्यापाºयांना दरमहा एक हजार टन, तर देशाच्या अन्य भागांतील व्यापाºयांना दरमहा ५०० टन इतकाच साखरेचा साठा करण्याचे बंधन घालण्यात आले होते. हीच साठामर्यादा आणखी सहा महिन्यांसाठी कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या एप्रिलमध्ये घेतला होता. ही मुदत २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे.>केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने व्यापाºयांसाठी असलेल्या साखरेच्या साठा मर्यादेला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी शिफारस केली असली, तरी व्यापाºयांनी मात्र त्याला विरोध केला आहे. मुदतवाढ द्यावयाचीच असेल तर ती ३० नोव्हेंबर किंवा ३१ डिसेंबरपर्यंतच द्यावी, अशी मागणी आॅल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनने गुरुवारी एका निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.