शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

‘भूविकास’च्या परतफेडीला मुदतवाढ

By admin | Updated: July 28, 2015 23:34 IST

कोल्हापूर शाखेच्या आशा पल्लवीत झाल्या असून, थकीत कर्जाच्या वसुलीला गती आली आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बॅँकेच्या थकबाकीदारांसाठी शासनाने एकरकमी परतफेड योजनेस (ओटीएस) मार्च २०१६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे बॅँकेच्या थकीत कर्जदारांना मोठा फायदा होणार असून, त्या माध्यमातून बॅँकेच्या वसुलीला गती मिळणार आहे. राज्य सरकारने भूविकास बॅँका अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयातून कोल्हापूर शाखेस वगळण्यात आले असून, याबाबतचा निर्णय जिल्हा उपनिबंधक यांच्यावर सोपविण्यात आला आहे. बॅँकेचा ताळेबंद पाहून निर्णय घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शाखेच्या आशा पल्लवीत झाल्या असून, थकीत कर्जाच्या वसुलीला गती आली आहे. या बॅँकेच्या थकबाकीदारांसाठी सरकारने सप्टेंबर २००७ मध्ये एकरकमी परतफेड योजना सुरू केली. त्यातून बऱ्यापैकी वसुलीही झाली. सरकारने सातत्याने मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे प्रयत्न केले. मार्च २०१४ ला या योजनेची मुदत संपली होती. त्यानंतर बॅँकेच्या अस्तित्वाबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने मुदतवाढ दिली नाहीच; पण वसुलीही ठप्प झाली होती. भूविकास बँकेच्या कोल्हापूर शाखेची जबाबदारी शासनाने जिल्हा उपनिबंधक यांच्यावर सोपविली आहे. त्यामुळे बॅँक पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. थकीत कर्जाची वसुली व्हावी, यासाठी एकरकमी परतफेड योजना पुन्हा राबविण्याची मागणी बॅँकेच्यावतीने करण्यात आली होती. त्यानुसार शासनाने मार्च २०१६ पर्यंत त्याला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या योजनेला राज्यात कर्जदारांकडून कितपत सहकार्य मिळेल यावर बँकेचे भवितव्य अवलंबून आहे.शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बॅँकेचे अध्यक्ष एम. एम. पाटील, व्यवस्थापक व्ही. बी. मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे. मार्च २०१६ अखेर या योजनेत सहभागी होऊन कर्जमुक्त न होणाऱ्या थकबाकीदारांवर वसुलीची पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी) शेतकऱ्यांचा असा होणार फायदामार्च २००४ अखेर येणे असलेल्या मुद्दल रकमेवर सहा टक्के सरळव्याज दराने आकारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण थकबाकीच्या निम्म्यापेक्षा कमी रक्कमच शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.