शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जयसिंगपुरात सुविधांची एक्स्प्रेस रखडली

By admin | Updated: May 15, 2015 23:39 IST

आदर्श रेल्वेस्थानक कागदावरच : प्रशासकीय काम रेंगाळले, ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ म्हणीप्रमाणे कारभार

संदीप बावचे - जयसिंगपूर -आदर्श रेल्वेस्थानक म्हणून जयसिंगपूर रेल्वेस्थानक कागदावरच राहिले आहे. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा मिळणार ही अपेक्षाच राहिल्याचे दिसून येत आहे. प्रशासकीय काम रेंगाळल्यामुळे येथील रेल्वेस्थानकाचा कायापालट होण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. लोकप्रतिनिधींकडून सोयीसुविधा बाबत पाठपुरावा केला जातो. मात्र, प्रशासकीय अडचणींमुळे जयसिंगपूर रेल्वेस्थानकात सुविधा मिळण्यास अडचणी ठरत असल्याने सुविधांची एक्स्प्रेस केव्हा धावणार? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.नोकरी, कामानिमित्ताने शेकडो प्रवासी दररोज जयसिंगपूर रेल्वेस्थानकावरून प्रवास करतात. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे नाते रेल्वेस्थानकाशी अगदी घट्ट झाले आहे. लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या या ठिकाणी थांबत असल्यामुळे प्रवास सोयीस्कर ठरत आहे. गेल्या चार-पाच वर्षांच्या कालावधीत थोडाफार या ठिकाणी विकासात्मक बदल झाल्यामुळे प्लॅटफार्म, ओव्हरब्रीज, तिकीट व्यवस्था, अशी सुविधा सुरू झाली. मात्र, शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावातील प्रवाशांची नाळ जोडणाऱ्या या स्थानकात भरीव सुविधा नसल्यामुळे केवळ थांब्याचेच ठिकाण म्हणून या स्थानकाकडे पाहिले जात असताना रेल्वे मंत्रालयाने आदर्श स्थानक योजनेमध्ये जयसिंगपूर रेल्वेस्थानकाचा समावेश केला. डिसेंबर २०१४ मध्ये ही घोषणा करण्यात आली. या योजनेत येथील रेल्वेस्थानकाचा समावेश झाल्यामुळे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार ही अपेक्षा होती. शिवाय या स्थानकावर बहुतेक सुविधा नसल्यामुळे आजपर्यंत विकासात्मक दृष्टिकोन दिसून आला नव्हता. खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर रेल्वेस्थानकावरील सोयी-सुविधेसाठी विशेष प्रयत्न करून आदर्श स्थानक योजनेमध्ये समावेश करण्यासाठी पाठपुरावा केला होता. एकीकडे लोकप्रतिनिधींनी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पाठपुरावा करायचा, तर दुसरीकडे प्रशासनातील ‘शासकीय काम, सहा महिने थांब’ या म्हणीप्रमाणे कारभार करायचा, अशी वस्तुस्थिती बनली आहे. यामुळे जयसिंगपुरातील सुविधांची एक्स्प्रेस केव्हा धावणार, असाच प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित केला जात आहे.आदर्श रेल्वेस्थानक योजनेंतर्गत स्थानकाचे सौंदर्यकरण, वॉटर कुलर, अत्याधुनिक सिग्नल व्यवस्था, प्रतीक्षालय, अंघोळीच्या सुविधेसह विश्रांतीगृह, आवश्यक प्रकाशयोजना, संगणकावर आधारित ग्राहक सूचना, पादचाऱ्यांसाठी ओव्हर ब्रिज, एटीएम सुविधा, स्वच्छतागृह, प्लॅटफार्म दुरुस्ती, बुक स्टॉल अशा सुविधांचा समावेश आहे.ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकस्वातंत्र्यपूर्व काळापासून जयसिंगपूर येथे रेल्वेस्थानकाची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे या स्थानकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिरोळला कृषिप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. या भागातील भाजीपाला मुंबईसह अन्य मोठ्या बाजारपेठेत पाठविला जातो.