कोल्हापूर : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये केलेल्या सैन्य कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेचा ऊर भरून आला. पुलवामा घटनेत ५० जवान शहीद झाले होते. त्याचा बदला भारताने घेतल्याने या कारवाईनंतर कोल्हापुरात नागरिकांनी पेढे, जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी फटाके वाजवूनही जल्लोष करण्यात आला.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पहाटे बिंदु चौक येथे फटाके फोडून, साखर वाटून व भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय सेना जिंदाबाद घोषणा देऊन या कारवाईच स्वागत केले.
पुलवामा घटनेत जवान शहीद होऊन आज १३ दिवस झाले; त्यामुळे भाजपने पक्ष म्हणून तातडीने लगेच आनंद किंवा जल्लोष साजरा केला नाही. त्याबद्दल लोकांतून काय प्रतिक्रिया व्यक्त होते याचा आनंद घेण्यात येत होता.