शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

वायूदलाच्या कारवाईबद्दल कोल्हापुरात आनंद व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:12 IST

भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये केलेल्या सैन्य कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेचा ऊर भरून आला. पुलवामा घटनेत ५० जवान शहीद झाले होते. त्याचा बदला भारताने घेतल्याने या कारवाईनंतर कोल्हापुरात नागरिकांनी पेढे, जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी फटाके वाजवूनही जल्लोष करण्यात आला.

ठळक मुद्देवायूदलाच्या कारवाईबद्दल कोल्हापुरात आनंद व्यक्तपेढे, जिलेबी वाटून, फटाके वाजवून आनंद

कोल्हापूर : भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये केलेल्या सैन्य कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेचा ऊर भरून आला. पुलवामा घटनेत ५० जवान शहीद झाले होते. त्याचा बदला भारताने घेतल्याने या कारवाईनंतर कोल्हापुरात नागरिकांनी पेढे, जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी फटाके वाजवूनही जल्लोष करण्यात आला.

भारतीय वायूसेनेने पाकिस्तानमध्ये सैनिकी कारवाई केल्यानंतर मंगळवारी कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिर परिसरात भारतीय वायूदलाचे अभिनंदन करणारा असा फलक लगेच झळकला.येथील बिनखांबी गणेश मंदिर परिसरात भारतीय हवाई दलाचे अभिनंदन करणारा भला मोठा डिजिटल फलक दुपारीच झळकला. महाद्वार रोडवर व्यापारी, फेरीवाले, सर्वसामान्य नागरिक एकत्र आले व त्यांनी पेढे-साखर वाटून या कारवाईचा आनंद साजरा केला. येथील मध्यवर्ती शिवाजी चौकातही असेच सर्वसामान्य नागरिक एकत्र झाले. त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली व जिलेबीचे वाटप केले. भारतमाता की... जय! अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पहाटे बिंदु चौक येथे फटाके फोडून, साखर वाटून व भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय सेना जिंदाबाद घोषणा देऊन या कारवाईच स्वागत केले.

पुलवामा घटनेत जवान शहीद होऊन आज १३ दिवस झाले; त्यामुळे भाजपने पक्ष म्हणून तातडीने लगेच आनंद किंवा जल्लोष साजरा केला नाही. त्याबद्दल लोकांतून काय प्रतिक्रिया व्यक्त होते याचा आनंद घेण्यात येत होता. 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाkolhapurकोल्हापूर