शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

एलबीटी रद्दबाबत अपेक्षा वाढल्या

By admin | Updated: November 25, 2014 00:31 IST

शासनाच्या निर्णयाकडे लक्ष : महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ६१ कोटी जमा

कोल्हापूर : सत्तेवर आल्यास राज्यातील स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी घालवू, अशी गर्जना विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने केली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या एलबीटी बंद होण्याबाबत या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. राज्य शासनाच्या निर्णयाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, एलबीटीमधून आज, सोमवारअखेर महापालिकेच्या तिजोरीत सुमारे ६१ कोटी रुपये जमा झाले आहेत.राज्यातील महापालिका क्षेत्रात गत काँग्रेस आघाडी सरकारने एलबीटी हा कर लागू केला. हा कर जाचक असून, यामध्ये त्रुटी असल्याचा आरोप करत २६ महापालिकांच्या हद्दीमधील व्यापाऱ्यांनी यास विरोध दर्शविला आहे. एकंदरीत, व्यापाऱ्यांनी विविध मार्गांनी आंदोलने करून या सरकारला धारेवर धरले होते. महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने निवडणुकीच्या काळात एलबीटी कोणत्याही स्थितीत घालवू, अशी भीमगर्जना केली होती. मात्र, अद्याप यावर निर्णय झालेला नाही.गत आठवड्यात नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या ‘फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’ (फाम)च्या पदाधिकाऱ्यांसमवेत व महापालिकांचे आयुक्त यांची बैठक घेतली. या बैठकीत, एलबीटी रद्द केला तर महापालिकांचे या कराच्या माध्यमातून किती उत्पन्न बुडेल? ही तूट कुठे भरून काढता येईल? याचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला होता. यावेळी केंद्र सरकारने मदत केल्यास एलबीटी घालवू, असे आश्वासनही फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना दिले आहे; पण केंद्र सरकार देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) हा एकच कर लागू करण्याचे धोरण अवलंबत आहे. त्यासाठी २०१६ साल उजडेल, असे या सरकारने सांगितले आहे.कोल्हापूर महापालिकेकडे सुमारे १५ हजार व्यापाऱ्यांची नोंदणी आहे. परंतु, प्रत्यक्षात ही संख्या सुमारे २० हजारांपर्यंत जाते. एक एप्रिल ते आजअखेर मनपाला व्यापाऱ्यांकडून ६१ कोटी जमा झाले आहेत. ज्यावेळी जकात बंद होऊन एलबीटी सुरू झाला, तेव्हा एका वर्षात सुमारे ९८ कोटी रुपये जमा झाले होते. सध्या एलबीटीच्या माध्यमातून ३१ मार्च २०१५ पर्यंत ९६ कोटींचे उद्दिष्ट आहे.बँक खाती सील होणार शहरातील एलबीटी न भरणाऱ्या सुमारे ३०० व्यापाऱ्यांना महापालिका प्रशासनाने सुनावणीसाठी नोटिसा पाठविल्या. दोन दिवसांपूर्वी त्याची सुनावणी झाली. त्यावेळी निम्मे व्यापारी गैरहजर राहिले. त्यामुळे जे व्यापारी गैरहजर राहिले त्यांची बँक खाती पुढील दोन दिवसांत सील केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.गतआठवड्यात ‘फाम’चे पदाधिकारी व आयुक्तांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली आहे. एलबीटीवर अभ्यास करून मुख्यमंत्री महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बैठक बोलाविण्याची शक्यता आहे. या बैठकीची आम्ही वाट पाहतो आहे.-सदानंद कोरगांवकर,अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघ,कोल्हापूर.एलबीटी न भरणाऱ्या सुमारे दीडशे व्यापाऱ्यांचे म्हणणे सुनावणीत घेतले आहे. जे गैरहजर राहिले आहेत, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार आहे.- संजय सरनाईक, मुख्य लेखापाल, कोल्हापूर महापालिका.