शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

एलबीटी रद्दबाबत अपेक्षा वाढल्या

By admin | Updated: November 25, 2014 00:31 IST

शासनाच्या निर्णयाकडे लक्ष : महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत ६१ कोटी जमा

कोल्हापूर : सत्तेवर आल्यास राज्यातील स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी घालवू, अशी गर्जना विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने केली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या एलबीटी बंद होण्याबाबत या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. राज्य शासनाच्या निर्णयाकडे त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, एलबीटीमधून आज, सोमवारअखेर महापालिकेच्या तिजोरीत सुमारे ६१ कोटी रुपये जमा झाले आहेत.राज्यातील महापालिका क्षेत्रात गत काँग्रेस आघाडी सरकारने एलबीटी हा कर लागू केला. हा कर जाचक असून, यामध्ये त्रुटी असल्याचा आरोप करत २६ महापालिकांच्या हद्दीमधील व्यापाऱ्यांनी यास विरोध दर्शविला आहे. एकंदरीत, व्यापाऱ्यांनी विविध मार्गांनी आंदोलने करून या सरकारला धारेवर धरले होते. महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने निवडणुकीच्या काळात एलबीटी कोणत्याही स्थितीत घालवू, अशी भीमगर्जना केली होती. मात्र, अद्याप यावर निर्णय झालेला नाही.गत आठवड्यात नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या ‘फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र’ (फाम)च्या पदाधिकाऱ्यांसमवेत व महापालिकांचे आयुक्त यांची बैठक घेतली. या बैठकीत, एलबीटी रद्द केला तर महापालिकांचे या कराच्या माध्यमातून किती उत्पन्न बुडेल? ही तूट कुठे भरून काढता येईल? याचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला होता. यावेळी केंद्र सरकारने मदत केल्यास एलबीटी घालवू, असे आश्वासनही फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना दिले आहे; पण केंद्र सरकार देशात वस्तू व सेवा कर (जीएसटी) हा एकच कर लागू करण्याचे धोरण अवलंबत आहे. त्यासाठी २०१६ साल उजडेल, असे या सरकारने सांगितले आहे.कोल्हापूर महापालिकेकडे सुमारे १५ हजार व्यापाऱ्यांची नोंदणी आहे. परंतु, प्रत्यक्षात ही संख्या सुमारे २० हजारांपर्यंत जाते. एक एप्रिल ते आजअखेर मनपाला व्यापाऱ्यांकडून ६१ कोटी जमा झाले आहेत. ज्यावेळी जकात बंद होऊन एलबीटी सुरू झाला, तेव्हा एका वर्षात सुमारे ९८ कोटी रुपये जमा झाले होते. सध्या एलबीटीच्या माध्यमातून ३१ मार्च २०१५ पर्यंत ९६ कोटींचे उद्दिष्ट आहे.बँक खाती सील होणार शहरातील एलबीटी न भरणाऱ्या सुमारे ३०० व्यापाऱ्यांना महापालिका प्रशासनाने सुनावणीसाठी नोटिसा पाठविल्या. दोन दिवसांपूर्वी त्याची सुनावणी झाली. त्यावेळी निम्मे व्यापारी गैरहजर राहिले. त्यामुळे जे व्यापारी गैरहजर राहिले त्यांची बँक खाती पुढील दोन दिवसांत सील केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.गतआठवड्यात ‘फाम’चे पदाधिकारी व आयुक्तांची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली आहे. एलबीटीवर अभ्यास करून मुख्यमंत्री महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बैठक बोलाविण्याची शक्यता आहे. या बैठकीची आम्ही वाट पाहतो आहे.-सदानंद कोरगांवकर,अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघ,कोल्हापूर.एलबीटी न भरणाऱ्या सुमारे दीडशे व्यापाऱ्यांचे म्हणणे सुनावणीत घेतले आहे. जे गैरहजर राहिले आहेत, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार आहे.- संजय सरनाईक, मुख्य लेखापाल, कोल्हापूर महापालिका.