शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘राजाराम’च्या विस्तारीकरण, सहवीज प्रकल्पाचा घाट कशासाठी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर सध्या प्रचंड कर्ज असताना पुन्हा नवीन विस्तारीकरण व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा बावडा : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर सध्या प्रचंड कर्ज असताना पुन्हा नवीन विस्तारीकरण व सहवीज प्रकल्पासाठी १०० ते १५० कोटी रुपये खर्च करून कारखान्याला कर्जाच्या खाईत घालण्याचा सत्तारूढ आघाडीच्या डाव परिवर्तन आघाडी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असे पत्रक माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

नुकत्याच राजाराम कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजाराम कारखान्यात १८.५ मेगावॅट क्षमतेचा सहवीज प्रकल्प उभारण्याचा व कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन साडेतीन हजारांवरून पाच हजार करण्यासाठी विस्तारीकरण करण्याचा निर्णय बैठकीत घेतला होता. मुळातच सध्या कारखान्याची गाळप क्षमता ३५०० मेट्रिक टन असताना प्रत्यक्षात आजपर्यंत कधीही या पूर्ण क्षमतेने कारखान्याचे गाळप होऊ शकलेले नाही. असे असताना पुन्हा गाळप क्षमता वाढविण्याचे कारण काय? तसेच सहवीज प्रकल्पातून तयार होणारी वीज खरेदीच्या दराबाबत कोणते धोरण शासनाने अद्याप निश्चित केलेले नाही. असे असताना सहवीज प्रकल्प राबविण्याचा अट्टहास कशासाठी, याचा खुलासा कारखान्याने करावा, अशी मागणीही सालपे यांनी पत्रकात केली आहे.

सध्या होऊ घातलेल्या कारखान्याच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीची सत्ता जाणार याची त्यांना खात्री झाल्याने जाता-जाता कारखान्यावर विस्तारीकरण व सहवीज प्रकल्पाच्या माध्यमातून १५० कोटींचा डोंगर उभा करण्याचे धोरण असल्याचे दिसून येते; पण आम्ही तो डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असेही सालपे यांनी पत्रकात नमूद केले आहे.