शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

‘भाजप’च्या विस्तारकांना दादांचा ‘कानमंत्र’

By admin | Updated: May 10, 2017 18:08 IST

व्यवहारातून पक्षविचार पोहोचवण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.१0 : पक्षाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही भागात पंधरा दिवसांसाठी जात आहात.एकवेळ पक्षाचा फायदा नाही झाला तरी चालेल परंतू हा माणूस आमच्याकडं पाठवला नसता तर बरं झालं असतं अशी कुणाचीही प्रतिक्रिया येता कामा नये. तुमच्या व्यवहारातून, वर्तनातून पक्ष विचार समाजाला समजला पाहिजे इतक्या स्पष्ट शब्दात भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ‘भाजप विस्तारकांना’ कानमंत्र दिला.

पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी कार्यविस्तार मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील विस्तारकांचा वर्ग येथील एका हॉटेलवर बुधवारी दिवसभर घेण्यात आला. दिवसभर चाललेल्या या वर्गामध्ये दुपारी हजेरी लावत चंद्रकांतदादांनी अतिशय मोजक्या शब्दात कार्यकर्त्यांना विस्तारक म्हणून काम कसे करावे याची दिशा दिली.

पाटील म्हणाले,अतिशय साधेपणाने वागणूक ठेवा. सुसंस्कृत पक्ष आहे हे व्यवहारातून दिसले पाहिजे. गावात मुक्कामाला गेल्यानंतर हॉटेलवर, रेस्ट हाऊसवर राहू नका. घरात गेल्यावर खुर्चीच पाहिजे आणि जेवणात ताकच पाहिजे असा आग्रह धरू नका. तुमच्या तिथल्या वास्तव्याने त्या घराला, गावाला, विभागाला पुढे नेण्याचे काही तरी नियोजन झाले पाहिजे. कुणाच्या तरी आयुष्यात बदल झाला पाहिजे. पक्षाच्या योजना सांगा,तिथल्या युवकांशी बोला. चांगल्या कामांसाठी आपल्याकडे निधीची कमतरता नाही. कामं करणारी चांगली माणसं समाज शोधत असतो. त्यामुळे तो विधायक कामांसाठी खिशात हात घालायला मागे पुढे बघत नाही.

भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवि अनासपुरे म्हणाले,भाजपमध्ये गट तट नाही. मी या गटाचा, मी या नेत्याचा असे प्रकार नाहीत. त्यामुळे भाजप हाच गट मानून कार्यकर्र्त्यांनी कार्यरत राहण्याची गरज आहे. आपला दिनक्रम ठरवा, वेळेचे नियोजन करा, अगदी मंत्र्यांचे जसे नियोजनपूर्वक दौरे असतात तसेच आपले दौरे तयार करून त्याची अंमलबजावणी करा.

यावेळी व्यासपीठावर भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य सुभाष वोरा हे व्यासपीठावर उपस्थित होते. संघटनमंत्री बाबा देसाई, विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे,प्रदेशचे सदस्य सुहास लटोरे, महापालिकेतील भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी, ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते अरूण इंगवले, महानगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, बाराही तालुक्यांचे पदाधिकारी व विस्तारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आधी लगीन कोंढाण्याचे

भाजपच्या अनेक सत्रांमध्ये, कार्यक्रमांमध्ये चंद्रकांतदादा येण्याआधी वातावरण तयार करण्याची महत्वाची भूमिका आमदार सुरेश हाळवणकर बजावत असतात. या ही शिबीरामध्ये त्यांनी भाषणात अनेकांना चिमटे काढत वातावरण हलके फुलके करताना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सांगितल्या. माझ्या मुलांचे १९ मे रोजी इचलकरंजीला लग्न आहे. त्या तयारीत मी आहे. मात्र बाबा देसाई यांचा फोन आला की शिबीरात मार्गदर्शन करायला या.. तेव्हा आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे या न्यायाने मी या ठिकाणी आलो असे सांगत हाळवणकर यांनी टाळ्या घेतल्या.