शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘भाजप’च्या विस्तारकांना दादांचा ‘कानमंत्र’

By admin | Updated: May 10, 2017 18:08 IST

व्यवहारातून पक्षविचार पोहोचवण्याचे आवाहन

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि.१0 : पक्षाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही भागात पंधरा दिवसांसाठी जात आहात.एकवेळ पक्षाचा फायदा नाही झाला तरी चालेल परंतू हा माणूस आमच्याकडं पाठवला नसता तर बरं झालं असतं अशी कुणाचीही प्रतिक्रिया येता कामा नये. तुमच्या व्यवहारातून, वर्तनातून पक्ष विचार समाजाला समजला पाहिजे इतक्या स्पष्ट शब्दात भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ‘भाजप विस्तारकांना’ कानमंत्र दिला.

पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी कार्यविस्तार मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील विस्तारकांचा वर्ग येथील एका हॉटेलवर बुधवारी दिवसभर घेण्यात आला. दिवसभर चाललेल्या या वर्गामध्ये दुपारी हजेरी लावत चंद्रकांतदादांनी अतिशय मोजक्या शब्दात कार्यकर्त्यांना विस्तारक म्हणून काम कसे करावे याची दिशा दिली.

पाटील म्हणाले,अतिशय साधेपणाने वागणूक ठेवा. सुसंस्कृत पक्ष आहे हे व्यवहारातून दिसले पाहिजे. गावात मुक्कामाला गेल्यानंतर हॉटेलवर, रेस्ट हाऊसवर राहू नका. घरात गेल्यावर खुर्चीच पाहिजे आणि जेवणात ताकच पाहिजे असा आग्रह धरू नका. तुमच्या तिथल्या वास्तव्याने त्या घराला, गावाला, विभागाला पुढे नेण्याचे काही तरी नियोजन झाले पाहिजे. कुणाच्या तरी आयुष्यात बदल झाला पाहिजे. पक्षाच्या योजना सांगा,तिथल्या युवकांशी बोला. चांगल्या कामांसाठी आपल्याकडे निधीची कमतरता नाही. कामं करणारी चांगली माणसं समाज शोधत असतो. त्यामुळे तो विधायक कामांसाठी खिशात हात घालायला मागे पुढे बघत नाही.

भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवि अनासपुरे म्हणाले,भाजपमध्ये गट तट नाही. मी या गटाचा, मी या नेत्याचा असे प्रकार नाहीत. त्यामुळे भाजप हाच गट मानून कार्यकर्र्त्यांनी कार्यरत राहण्याची गरज आहे. आपला दिनक्रम ठरवा, वेळेचे नियोजन करा, अगदी मंत्र्यांचे जसे नियोजनपूर्वक दौरे असतात तसेच आपले दौरे तयार करून त्याची अंमलबजावणी करा.

यावेळी व्यासपीठावर भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य सुभाष वोरा हे व्यासपीठावर उपस्थित होते. संघटनमंत्री बाबा देसाई, विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे,प्रदेशचे सदस्य सुहास लटोरे, महापालिकेतील भाजपचे गटनेते विजय सुर्यवंशी, ताराराणीचे गटनेते सत्यजित कदम, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते अरूण इंगवले, महानगरपालिकेचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, बाराही तालुक्यांचे पदाधिकारी व विस्तारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आधी लगीन कोंढाण्याचे

भाजपच्या अनेक सत्रांमध्ये, कार्यक्रमांमध्ये चंद्रकांतदादा येण्याआधी वातावरण तयार करण्याची महत्वाची भूमिका आमदार सुरेश हाळवणकर बजावत असतात. या ही शिबीरामध्ये त्यांनी भाषणात अनेकांना चिमटे काढत वातावरण हलके फुलके करताना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना सांगितल्या. माझ्या मुलांचे १९ मे रोजी इचलकरंजीला लग्न आहे. त्या तयारीत मी आहे. मात्र बाबा देसाई यांचा फोन आला की शिबीरात मार्गदर्शन करायला या.. तेव्हा आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे या न्यायाने मी या ठिकाणी आलो असे सांगत हाळवणकर यांनी टाळ्या घेतल्या.