शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

विद्यमान की नवनियुक्त पुजारी ? अंबाबाई मंदिर पुजारी वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 12:20 AM

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओसंबंधीचा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचा अहवाल आठ दिवसांत शासनाच्या न्याय व विधी खात्याला सादर होणार आहे. अहवाल बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांचा अहवाल आठ दिवसांत शासनाकडे सादर होणारयेत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी हा अहवाल शासनाला सादर होणार श्री अंबाबाई मूर्तीला श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी ९ जून २०१७ ला घागरा-चोली नेसविल्यानंतर पुजारी हटाओ’साठी आंदोलन सुरू

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओसंबंधीचा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचा अहवाल आठ दिवसांत शासनाच्या न्याय व विधी खात्याला सादर होणार आहे. अहवाल बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, त्यावर जिल्हाधिकाºयांच्या अंतिम शेºयाची मोहोर उमटणे बाकी आहे. दरम्यान, कायदा करताना विद्यमान पुजाºयांनाच पगारावर नियुक्त केले जाईल की त्यांना हटवून नवीन पुजारी नेमले जातील, यावर या अहवालानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.

श्री अंबाबाई मूर्तीला श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी ९ जून २०१७ ला घागरा-चोली नेसविल्यानंतर कोल्हापुरात ‘श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ’साठी आंदोलन सुरू झाले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली२२ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक घेण्यात आली. त्यात पालकमंत्र्यांनी पुजारी हटाओ मागणीवर जिल्हाधिकाºयांपुढे सुनावणी प्रक्रिया व्हावी व त्यांच्या एक सदस्यीय समितीने याबाबतचा अंतिम अहवाल तीन महिन्यांच्या आत शासनाला पाठवावा, अशी सूचना केली होती.त्यानुसार गेल्या अडीच महिन्यांत अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समिती, हक्कदार श्रीपूजक मंडळ, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्यासह अंबाबाईच्या स्वरूपासंबंधीची माहिती देणाºया घटकांनी जिल्हाधिकाºयांपुढे आपले म्हणणे सादर केले.

त्यामध्ये संस्थानकालीन सनदा, आदेश, वटहुकूम, न्यायालयीन प्रक्रिया, श्रीपूजकांविरोधातील तक्रारी, आधीची प्रकरणे, दुसरीकडे श्रीपूजकांकडून केले जाणारे धार्मिक विधी, वंशपरंपरागत मिळालेले अधिकार, अशा दोन्ही बाजू मांडणाºया कागदपत्रांचा समावेश आहे.पालकमंत्र्यांनी सूचना केलेल्या दिवसापासून पुढे तीन महिन्यांत म्हणजे २२ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकाºयांना आपला अहवाल सादर करण्यासाठीचा कालावधी देण्यात आला होता.

दरम्यान, श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी या प्रक्रियेला स्थगिती आणण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला. मात्र, न्यायालयाने तो दावा फेटाळल्याने जिल्हाधिकाºयांचा अहवाल सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला. दुसरीकडे जिल्हाधिकाºयांकडून अहवाल बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी हा अहवाल शासनाला सादर होणार आहे.दादांच्या भूमिकेवर तर्कवितर्कपुजारी हटाओ मागणीसंदर्भात तीन-चार वेळा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये पालकमंत्र्यांनी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, विद्यमान पुजाºयांचीच पगारावर नियुक्ती करायची की नवीन पुजारी नेमायचे, उत्पन्नाचा काही वाटा टक्केवारीमध्ये पुजाºयांना द्यायचा का, यावर अभ्यास सुरू असल्याचे सांगितले आहे. गुरुवारी (दि. ७) मुंबईत झालेल्या बैठकीतही त्यांनी अधिवेशनापूर्वी कायदा अस्तित्वात यावा, तसेच वंशपरंपरागत पुजारी आणि पगारी पुजारी यांच्यात समन्वय साधला गेला पाहिजे, असे सूतोवाच केले आहे. त्यांच्या एकूणच वक्तव्यावरून वंशपरंपरागत पुजारी हटणार की त्यांचीच पगारावर नियुक्ती होणार याबाबत तर्कवितर्क बांधले जात आहेत. 

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार तीन महिन्यांच्या आत पगारी पुजारी नेमण्यासंदर्भातील माझा अहवाल बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या आधारे अहवालावर माझा अभिप्राय देऊन गुरुवारी किंवा शुक्रवारी अहवाल शासनाच्या न्याय व विधी खात्याला पाठविण्यात येणार आहे.- अविनाश सुभेदार (जिल्हाधिकारी)मुंबईतील बैठकीत चंद्रकांतदादांनी ‘कायदा इतका सक्षम करा की त्याला आव्हान दिले गेले तरी न्यायालयात टिकले पाहिजे,’ अशी सूचना केली आहे. जिल्हाधिकाºयांचा अहवाल शासनाला गेल्यानंतरच विद्यमान पुजारी की नवनियुक्त पुजारी यावर निर्णय घेतला जाईल.- महेश जाधव (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थानव्यवस्थापन समिती)