शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

विद्यमान की नवनियुक्त पुजारी ? अंबाबाई मंदिर पुजारी वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:22 IST

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओसंबंधीचा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचा अहवाल आठ दिवसांत शासनाच्या न्याय व विधी खात्याला सादर होणार आहे. अहवाल बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांचा अहवाल आठ दिवसांत शासनाकडे सादर होणारयेत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी हा अहवाल शासनाला सादर होणार श्री अंबाबाई मूर्तीला श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी ९ जून २०१७ ला घागरा-चोली नेसविल्यानंतर पुजारी हटाओ’साठी आंदोलन सुरू

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओसंबंधीचा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचा अहवाल आठ दिवसांत शासनाच्या न्याय व विधी खात्याला सादर होणार आहे. अहवाल बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, त्यावर जिल्हाधिकाºयांच्या अंतिम शेºयाची मोहोर उमटणे बाकी आहे. दरम्यान, कायदा करताना विद्यमान पुजाºयांनाच पगारावर नियुक्त केले जाईल की त्यांना हटवून नवीन पुजारी नेमले जातील, यावर या अहवालानंतरच निर्णय घेण्यात येणार आहे.

श्री अंबाबाई मूर्तीला श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी ९ जून २०१७ ला घागरा-चोली नेसविल्यानंतर कोल्हापुरात ‘श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ’साठी आंदोलन सुरू झाले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली२२ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक घेण्यात आली. त्यात पालकमंत्र्यांनी पुजारी हटाओ मागणीवर जिल्हाधिकाºयांपुढे सुनावणी प्रक्रिया व्हावी व त्यांच्या एक सदस्यीय समितीने याबाबतचा अंतिम अहवाल तीन महिन्यांच्या आत शासनाला पाठवावा, अशी सूचना केली होती.त्यानुसार गेल्या अडीच महिन्यांत अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समिती, हक्कदार श्रीपूजक मंडळ, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्यासह अंबाबाईच्या स्वरूपासंबंधीची माहिती देणाºया घटकांनी जिल्हाधिकाºयांपुढे आपले म्हणणे सादर केले.

त्यामध्ये संस्थानकालीन सनदा, आदेश, वटहुकूम, न्यायालयीन प्रक्रिया, श्रीपूजकांविरोधातील तक्रारी, आधीची प्रकरणे, दुसरीकडे श्रीपूजकांकडून केले जाणारे धार्मिक विधी, वंशपरंपरागत मिळालेले अधिकार, अशा दोन्ही बाजू मांडणाºया कागदपत्रांचा समावेश आहे.पालकमंत्र्यांनी सूचना केलेल्या दिवसापासून पुढे तीन महिन्यांत म्हणजे २२ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकाºयांना आपला अहवाल सादर करण्यासाठीचा कालावधी देण्यात आला होता.

दरम्यान, श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी या प्रक्रियेला स्थगिती आणण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला. मात्र, न्यायालयाने तो दावा फेटाळल्याने जिल्हाधिकाºयांचा अहवाल सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला. दुसरीकडे जिल्हाधिकाºयांकडून अहवाल बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या गुरुवारी किंवा शुक्रवारी हा अहवाल शासनाला सादर होणार आहे.दादांच्या भूमिकेवर तर्कवितर्कपुजारी हटाओ मागणीसंदर्भात तीन-चार वेळा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमवेत बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये पालकमंत्र्यांनी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, विद्यमान पुजाºयांचीच पगारावर नियुक्ती करायची की नवीन पुजारी नेमायचे, उत्पन्नाचा काही वाटा टक्केवारीमध्ये पुजाºयांना द्यायचा का, यावर अभ्यास सुरू असल्याचे सांगितले आहे. गुरुवारी (दि. ७) मुंबईत झालेल्या बैठकीतही त्यांनी अधिवेशनापूर्वी कायदा अस्तित्वात यावा, तसेच वंशपरंपरागत पुजारी आणि पगारी पुजारी यांच्यात समन्वय साधला गेला पाहिजे, असे सूतोवाच केले आहे. त्यांच्या एकूणच वक्तव्यावरून वंशपरंपरागत पुजारी हटणार की त्यांचीच पगारावर नियुक्ती होणार याबाबत तर्कवितर्क बांधले जात आहेत. 

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार तीन महिन्यांच्या आत पगारी पुजारी नेमण्यासंदर्भातील माझा अहवाल बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्या आधारे अहवालावर माझा अभिप्राय देऊन गुरुवारी किंवा शुक्रवारी अहवाल शासनाच्या न्याय व विधी खात्याला पाठविण्यात येणार आहे.- अविनाश सुभेदार (जिल्हाधिकारी)मुंबईतील बैठकीत चंद्रकांतदादांनी ‘कायदा इतका सक्षम करा की त्याला आव्हान दिले गेले तरी न्यायालयात टिकले पाहिजे,’ अशी सूचना केली आहे. जिल्हाधिकाºयांचा अहवाल शासनाला गेल्यानंतरच विद्यमान पुजारी की नवनियुक्त पुजारी यावर निर्णय घेतला जाईल.- महेश जाधव (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र देवस्थानव्यवस्थापन समिती)