शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

आंबेओहोळ प्रकल्पाचा वनवास संपता-संपेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:20 IST

* व्यथा आंबेओहळ धरणग्रस्तांची : बंधाऱ्याचे उद्घाटन झाले...कामाचा पत्त्या नाही..! रवींद्र येसादे उत्तूर : १९९८ मध्ये मंजूर झालेला आजरा ...

* व्यथा आंबेओहळ धरणग्रस्तांची : बंधाऱ्याचे उद्घाटन झाले...कामाचा पत्त्या नाही..!

रवींद्र येसादे

उत्तूर : १९९८ मध्ये मंजूर झालेला आजरा तालुक्यातील बहुचर्चित आंबेओहळ प्रकल्प तब्बल २१ वर्षांपासून रखडला आहे. प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा वनवास संपता संपेनासा झाला आहे. ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय होणार का, असा प्रश्न विस्थापितांना पडला आहे. बंधाऱ्याचे उद्घाटन झालेल्या कामाचा पत्ता नाही. ३० कोटींचा प्रकल्प २३० कोटींवर गेला आहे. या प्रकल्पात १.२४ द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा होणार आहे. या प्रकल्पामुळे आजरा तालुक्यातील २१२२ हेक्टर व गडहिंग्लज तालुक्यातील ४२२० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी कोल्हापूर पद्धतीच्या सात बंधाऱ्यांच्या कामाचा उद्घाटनानंतरही परवड कायम आहे. २१ वर्षांत धरणाचे पूर्ण झालेले काम सरकारी कागदावर ८५ टक्के असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात हे काम कमीच असल्याचे वास्तव आहे. धरणग्रस्तांच्या दाखल्यात अनेक त्रुटी आहेत. नोकरीत धरणग्रस्तांना प्राधान्य देणे गरजेचे असताना अनेक युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत प्रकल्पातील धरणग्रस्तांना नोकरीचा लाभ मिळाला नाही. जमीन दाखविण्यासाठी क्रमपाळीनुसार जमीन देणे बंधनकारक असताना ‘हाजीर तो वजीर’ अशी अवस्था आहे. फक्त जमिनीची यादी दिली जाते.

जमीन शोधणे शेतकऱ्यांना अडचणींचे ठरत आहे. जमिनी पाहायला गेल्यानंतर वादाचे प्रकारही घडत आहेत. धरणात जमिनी गेल्या, पर्यायी जमिनी नाही, भरपाईदेखील नाही, त्यामुळे धरणग्रस्तांवर उपासमारीची वेळ आली आहे. पुनर्वसनासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. परिपूर्ण माहिती कोणत्याही कार्यालयातून मिळत नाही.

-------------------

* सर्वसामान्यांना वाली कोण

अनेक प्रकल्पग्रस्त अनपढ आहेत. गेल्या २१ वर्षांत केवळ शासनाच्या भरवशावर अवलंबून आहेत. कांही विस्थापितांचे सत्ताधारी मंडळींशी लागेबांधे आहेत. त्यांची कामे निमूटपणे करतात. एजंटगिरीमुळे काही कामे झाली. पुनर्वसनासाठी प्रकल्पाच्या कामास विरोध करणाऱ्यांना बाजूला सारले जातात अशा सर्वसामान्यांना वाली कोण? अशी विचारणाही होत आहे.

-------------------------

*

उद्घाटन, पॅकेज

हसन मुश्रीफ आमदार असताना कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे उद्घाटन झाले. ३६ लाखांच्या पॅकेजला सुरुवात झाली. मात्र, त्यातही अडचणींचा डोंगर उभा आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे काम कोठेही सुरू नाही. पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी प्रकल्प पूर्ततेची घोषणा केली होती त्यांचेही प्रयत्नही अपुरे ठरले.

---------------------

* बैठका नको कार्यवाही हवी ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीस धरणग्रस्तांचे लक्ष लागून राहले आहे. २१ वर्षांत अनेक बैठका झाल्या. मात्र, प्रश्न तसाच राहिला. बैठका करून वेळ मारून काम करण्यापेक्षा काम पूर्तता झाली झाली पाहिजे, अन्यथा पुनर्वसनासाठी आंदोलन छेडावे लागेल.

- शिवाजी गुरव, धरणग्रस्त.

-----------------

* लिपिकाची बदली केव्हा

गडहिंग्लजच्या प्रांत कार्यालयातील गेली कित्येक वर्षे लिपिकांकडे धरणग्रस्तांच्या कागदपत्रांचे काम पाहतो. हा लिपिक धरणग्रस्थांना नाहक त्रास देतो. एकाच ठिकाणी ठाण मांडून असणारा लिपिक धरणग्रस्तांना वेठीस धरतो. मागणी करूनही बदली नाही याचे गौडबंगाल काय ?

- महादेव खाडे, धरणग्रस्त.

-------------------------

फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्पातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे वर्षापूर्वी उद्घाटन झाले; मात्र अद्याप कामाचा पत्ता नाही.

क्रमांक : ०७१२२०२०-गड-०३