शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

कृषी प्रदर्शनातून कुरुंदवाडच्या यात्रेला गतवैभव

By admin | Updated: March 14, 2016 00:06 IST

यात्रेकरूंत समाधान : सत्तर वर्षांपूर्वी पटवर्धन सरकारांनी सुरू केलेली परंपरा पालिकेकडून पुन्हा सुरू

गणपती कोळी -- कुरूंदवाड -कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, जनावरांची देवाण-घेवाण व्हावी, या उद्देशाने सुमारे ७0 वर्षांपूर्वी येथील पटवर्धन सरकारांनी महाशिवरात्रीनिमित्त पशू व कृषी प्रदर्शन चालू केले होते़ बदलत्या काळात कृषी प्रदर्शन गायब होऊन केवळ यात्राच शिल्लक राहिली होती़ नगरपालिकेने यंदा भव्य कृषी प्रदर्शन भरवून या यात्रेला गतवैभव मिळवून दिल्याने यात्रेकरूंमधून समाधान व्यक्त होत असून, ही परंपरा कायम राखण्याची गरज व्यक्त केली जात आहे़कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर आहे़ या संस्थानात बेळगावपर्यंत कर्नाटक- महाराष्ट्रातील गावांचा समावेश होता़ या भागातील शेतकऱ्यांना शेतातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, जातिवंत जनावरांची देवाण-घेवाण व्हावी़ या उद्देशाने चिंतामणराव पटवर्धन सरकारने १९४३ साली ऐतिहासिक पंचगंगा कृष्णा घाट रस्त्यावर सुमारे दीडशे एकर क्षेत्रात प्रदर्शन भरविले होते़ ते पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे पशू व कृषी प्रदर्शन म्हणून गणले जात होते़ यात्रा व प्रदर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह चिक्कोडी, अथणी, निपाणी, बेळगाव, आदी भागांतील शेतकरी बैलगाडीने यात्रेस येत़ त्याशिवाय जनावरांचे व्यापारी, शौकीन आदी आवर्जून उपस्थिती लावतात. यात्रेकरूंचा चार-चार दिवस मुक्काम होत असे़नगरपालिकेच्या स्थापनेनंतर या यात्रेचे नियोजन पालिकेकडे आले़ मात्र, परिस्थिती बदलली़ अनेक ठिकाणी भरत असलेले शेती प्रदर्शन, नवीन कृषी तंत्रज्ञानामुळे जनावरांची घटती संख्या, वाहतुकीची निर्माण झालेली साधने याबरोबरच यात्रा समितीच्या नियोजनाचा व निधीचा अभाव, जागेची कमतरता, आदी कारणांमुळे यात्रेतील प्रदर्शन गायब होऊन केवळ यात्राच शिल्लक राहिली होती़यात्रेतील कृषी प्रदर्शनाला गतवैभव मिळवून देण्यासाठी यात्रा कमिटीने भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे़ यामध्ये शेतापासून ते माणसाला लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे सुमारे दीडशेहून अधिक स्टॉल या प्रदर्शनात सहभागी झाले असून, प्रदर्शनाला यात्रेकरूंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे़ यात्रेतील लोप पावत असलेले कृषी प्रदर्शन पालिका व यात्रा समितीने पुन्हा चालू केल्याने यात्रेकरूंतून समाधान व्यक्त होत असून ही परंपरा कायम राखण्याची गरज आहे़बालचमू व विद्यार्थ्यांसाठी हस्तकला (चित्रकला, पोस्टर्स) प्रदर्शन ठेवून या कलेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते़ प्रदर्शनातील ही परंपरा आजही जिवंत असून विद्यार्थ्यांकडून या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे़प्रथमच मोठ्या प्रमाणात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनावर विधान परिषदेचे सावट पसरले होते़ प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते झाले़ यावेळी झालेल्या सभेत नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी प्रदर्शनात विरोधी नगरसेवकांतून केले जात असलेले अडथळे, अनेकांनी दिलेला चकवा या संघर्षातून डोळ्यातून आलेले अश्रू, विठ्ठलराव निंबाळकर यांनी दिलीप पाटील यांना ‘गोकुळ’मध्ये पुन्हा स्थान देण्याची केलेली मागणी, या सर्वांचा धागा धरून महाडिकांनी विरोधकांना दिलेले आव्हान व समर्थक यात्रा समितीला दिलेला आधार व प्रोत्साहन यामुळे कृषी प्रदर्शन हे राजकीय प्रदर्शनच जाणवत होते़