शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रदर्शनातून कुरुंदवाडच्या यात्रेला गतवैभव

By admin | Updated: March 14, 2016 00:06 IST

यात्रेकरूंत समाधान : सत्तर वर्षांपूर्वी पटवर्धन सरकारांनी सुरू केलेली परंपरा पालिकेकडून पुन्हा सुरू

गणपती कोळी -- कुरूंदवाड -कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील शेतकऱ्यांमध्ये शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, जनावरांची देवाण-घेवाण व्हावी, या उद्देशाने सुमारे ७0 वर्षांपूर्वी येथील पटवर्धन सरकारांनी महाशिवरात्रीनिमित्त पशू व कृषी प्रदर्शन चालू केले होते़ बदलत्या काळात कृषी प्रदर्शन गायब होऊन केवळ यात्राच शिल्लक राहिली होती़ नगरपालिकेने यंदा भव्य कृषी प्रदर्शन भरवून या यात्रेला गतवैभव मिळवून दिल्याने यात्रेकरूंमधून समाधान व्यक्त होत असून, ही परंपरा कायम राखण्याची गरज व्यक्त केली जात आहे़कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर आहे़ या संस्थानात बेळगावपर्यंत कर्नाटक- महाराष्ट्रातील गावांचा समावेश होता़ या भागातील शेतकऱ्यांना शेतातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, जातिवंत जनावरांची देवाण-घेवाण व्हावी़ या उद्देशाने चिंतामणराव पटवर्धन सरकारने १९४३ साली ऐतिहासिक पंचगंगा कृष्णा घाट रस्त्यावर सुमारे दीडशे एकर क्षेत्रात प्रदर्शन भरविले होते़ ते पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे पशू व कृषी प्रदर्शन म्हणून गणले जात होते़ यात्रा व प्रदर्शनासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह चिक्कोडी, अथणी, निपाणी, बेळगाव, आदी भागांतील शेतकरी बैलगाडीने यात्रेस येत़ त्याशिवाय जनावरांचे व्यापारी, शौकीन आदी आवर्जून उपस्थिती लावतात. यात्रेकरूंचा चार-चार दिवस मुक्काम होत असे़नगरपालिकेच्या स्थापनेनंतर या यात्रेचे नियोजन पालिकेकडे आले़ मात्र, परिस्थिती बदलली़ अनेक ठिकाणी भरत असलेले शेती प्रदर्शन, नवीन कृषी तंत्रज्ञानामुळे जनावरांची घटती संख्या, वाहतुकीची निर्माण झालेली साधने याबरोबरच यात्रा समितीच्या नियोजनाचा व निधीचा अभाव, जागेची कमतरता, आदी कारणांमुळे यात्रेतील प्रदर्शन गायब होऊन केवळ यात्राच शिल्लक राहिली होती़यात्रेतील कृषी प्रदर्शनाला गतवैभव मिळवून देण्यासाठी यात्रा कमिटीने भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे़ यामध्ये शेतापासून ते माणसाला लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे सुमारे दीडशेहून अधिक स्टॉल या प्रदर्शनात सहभागी झाले असून, प्रदर्शनाला यात्रेकरूंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे़ यात्रेतील लोप पावत असलेले कृषी प्रदर्शन पालिका व यात्रा समितीने पुन्हा चालू केल्याने यात्रेकरूंतून समाधान व्यक्त होत असून ही परंपरा कायम राखण्याची गरज आहे़बालचमू व विद्यार्थ्यांसाठी हस्तकला (चित्रकला, पोस्टर्स) प्रदर्शन ठेवून या कलेसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते़ प्रदर्शनातील ही परंपरा आजही जिवंत असून विद्यार्थ्यांकडून या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे़प्रथमच मोठ्या प्रमाणात भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनावर विधान परिषदेचे सावट पसरले होते़ प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते झाले़ यावेळी झालेल्या सभेत नगराध्यक्षा मनीषा डांगे यांनी प्रदर्शनात विरोधी नगरसेवकांतून केले जात असलेले अडथळे, अनेकांनी दिलेला चकवा या संघर्षातून डोळ्यातून आलेले अश्रू, विठ्ठलराव निंबाळकर यांनी दिलीप पाटील यांना ‘गोकुळ’मध्ये पुन्हा स्थान देण्याची केलेली मागणी, या सर्वांचा धागा धरून महाडिकांनी विरोधकांना दिलेले आव्हान व समर्थक यात्रा समितीला दिलेला आधार व प्रोत्साहन यामुळे कृषी प्रदर्शन हे राजकीय प्रदर्शनच जाणवत होते़