शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
4
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
5
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
6
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
7
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
8
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
9
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
10
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
11
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
12
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
13
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
14
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
15
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
16
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
17
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
18
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
19
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
20
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज

कल्याणकारी योजना बंद करणाऱ्यांना हद्दपार करा

By admin | Updated: October 31, 2015 00:25 IST

हसन मुश्रीफ : पांजरपोळ, व्हीनस कॉर्नर, न्यू शाहूपुरी, कनाननगरमध्ये सभा

कोल्हापूर : राज्यात व केंद्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना गोरगरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्या, पण या कल्याणकारी योजना महायुतीच्या सरकारने बंद करण्याचा धडाका लावला आहे. रेशनवरील धान्य बंद करून गरिबांच्या तोंडचा घास काढून घेणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत थारा देऊ नका, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. पांजरपोळ, व्हीनस कॉर्नर, न्यू शाहूपुरी, कनाननगर प्रभागांतील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, जाती-धर्मात भांडणे लावून तेढ निर्माण करायची आणि त्याचा लाभ मिळवायचा एवढाच भाजपचा धंदा सुरू आहे. गोविंद पानसरे यांचा दिवसाढवळ्या खून केला जातो. दादरीत एका गरिबाला ठेचून मारले जाते, कलबुर्गींचा खून होतो, या सर्व घटना देशाला हिटलरशाहीच्या दिशेने घेऊन जाणाऱ्या आहेत. कनाननगर प्रभागातील सभेत बोलताना ते म्हणाले, या भागाची अवस्था आदिवासी भागापेक्षा वाईट आहे. आगामी पाच वर्षांत हे चित्र बदलून टाकण्यासाठी प्रयत्न करणार असून कनाननगर पाहण्यासाठी लोक येतील, असा विकास येथे केला जाईल. दहा वर्षांपूर्वी ‘मंत्री आपल्या गावोगावी’ हा उपक्रम राबवून समस्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीने आगामी काळात या परिसराकडे लक्ष दिले जाईल, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली. यावेळी आर. के. पोवार, वसंत कोगेकर, सुवर्णा कोगेकर, मधुकर काकडे, राजेंद्र पाटील, बळवंतराव माने, अनिल घाटगे, फिरोज जमादार, पी. जी. मांडरे, निसार पठाण आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)