शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
2
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
3
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
4
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
5
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
6
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
7
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
8
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
9
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
10
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
11
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
12
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
13
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
14
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
15
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
16
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
17
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
18
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
19
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
20
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?

माजी सैनिकांच्या ‘कल्याणा’ची आबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:45 IST

दीपक जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भारतमातेच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या राज्यातील अडीच लाखांहून अधिक माजी सैनिकांच्या कल्याणाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे; कारण राज्यातील ३७ जिल्ह्यांचा कारभार कसाबसा १३ अधिकारीच सांभाळत आहेत; त्यामुळे एकाच अधिकाºयाकडे पाच-पाच जिल्ह्यांचा कार्यभार आहे. सैनिकांच्या कल्याणाचा उदोउदो करणारे सरकार मात्र त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार ...

दीपक जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भारतमातेच्या रक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या राज्यातील अडीच लाखांहून अधिक माजी सैनिकांच्या कल्याणाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे; कारण राज्यातील ३७ जिल्ह्यांचा कारभार कसाबसा १३ अधिकारीच सांभाळत आहेत; त्यामुळे एकाच अधिकाºयाकडे पाच-पाच जिल्ह्यांचा कार्यभार आहे. सैनिकांच्या कल्याणाचा उदोउदो करणारे सरकार मात्र त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला तयार नाही.पुरेसा पगार व आवश्यक सोईसुविधा मिळत नसल्याने कोणी या पदावर काम करण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे. हा विभाग माजी सैनिक कल्याण मंत्र्यांकडे येतो. म्हणून याबाबत मंत्री संभाजीराव निलंगेकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.देशाच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीय व देशसेवेतील माजी सैनिकांच्या कल्याणासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात; त्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आहे; परंतु गेली अनेक वर्षे फक्त १३ अधिकाºयांकडेच संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांचा कार्यभार आहे. कोल्हापूरला मेजर सुभाष सासने हे काम पाहतात; परंतु त्यांच्याकडे कोल्हापूरशिवाय सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांचा कार्यभार आहे. यापूर्वी त्यांच्याकडे सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड व परभणी या जिल्ह्यांचाही पदभार होता.एका अधिकाºयाला एवढे जिल्हे पालथे घालताना जीव मेटाकुटीस येत असे. पुण्यातील अधिकाºयांसाठी तर व्हॅन आहे व त्यांच्याकडे नांदेडचा पदभार आहे. त्यांना इतक्या लांब व्हॅनमधून जाताना अडचणीचे होते. अशीच स्थिती बहुतांश जिल्ह्यांत आहे. प्रत्येक जिल्ह्यास अधिकारी नसल्याने सैनिकांच्या अडचणी सोडविण्यावरही परिणाम होतो.या पदासाठी सैन्यातून मेजर, कर्नल या पदांवरून निवृत्त झालेले अधिकारी पात्र असतात. त्यांना सैन्यातून निवृत्त होताना चांगला पगार असतो. पेन्शनही चांगली मिळते आणि राज्य सरकार मात्र त्यांना जास्तीत जास्त २७ ते ४० हजार रुपयेच पगार देते. लष्करातील अधिकारी म्हणून त्यांना असणारा मानसन्मान मिळत नाही, १0-१0 वर्षे काम केले, तरी पदोन्नती होत नाही; त्यामुळे या पदावर काम करण्यास कोण लष्करातील अधिकारी यायला तयार नाहीत, असेही चित्र आहे.सैनिक कल्याण अधिकाºयांच्या कामाचे स्वरूपमाजी सैनिकांच्या कल्याणार्थ असलेल्या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे व त्यांना व्यक्तिगत लाभ मिळवून देणे. पाल्यांसाठी शिष्यवृत्ती मिळवून देणे.दृष्टिक्षेपात सैनिकांची संख्याराज्यातील एकत्रित माजी सैनिक : २ लाख ५० हजारकोल्हापूर जिल्ह्यात : १७ हजार ५००.