शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पुराव्यांवरून ‘अंबाबाई’ असल्याचेच सिद्ध

By admin | Updated: November 30, 2015 01:10 IST

रमेश कुलकर्णी यांचे आव्हान : कोणाला चर्चा करायची असल्यास इतिहास परिषदेचीही तयारी

कोल्हापूर : अंबाबाई संदर्भातील मूर्ती शास्त्र, वेद साहित्य आणि वेदांपूर्वीचे पुरावे हे ती आदिमाया अंबाबाईच असल्याचे अधोरेखित करतात. यावर जर कुणा तज्ज्ञांना वा पंडितांना चर्चा करायची असल्यास दोन दिवस शाहू स्मारक भवनमध्ये इतिहास परिषद घेण्याची तयारी आहे, असे आव्हान अ‍ॅड. रमेश कुलकर्णी यांनी रविवारी येथे दिले.करवीरनिवासिनी अंबाबाई भक्त मंडळातर्फे शाहू स्मारक भवन येथे ‘आदिमाया अंबाबाई, पार्वती की लक्ष्मी?’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत होते. यावेळी मंडळाचे कार्यवाह दिलीप पाटील, सहकार्यवाह वसंतराव मुळीक, बबनराव रानगे, निवासराव साळोखे, डॉ. शिवाजीराव हिलगे, शैलजा भोसले, आदी प्रमुख उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, याबाबत जर कोणी मौन बाळगत असेल तर आपल्या मताशी सहमतीच असेल असे गृहीत धरू, असेही अ‍ॅड. कुलकर्णी म्हणाले. अंबाबाईचा महालक्ष्मी किंवा लक्ष्मीशी काहीही संबंध नाही. तसेच महालक्ष्मीचा तिरुपतीशीही काहीही संबंध नाही. मूर्ती शास्त्र, वेद साहित्य आणि वेदांपूर्वीच्या काळातील पुरावे हे आदिमाया अंबाबाई असल्याचेच सिद्ध करतात. बौद्ध धर्माचा प्रसार वाढल्यावर आंध्र प्रदेशमध्ये वैष्णव पंथाच्या लोकांनी इ.स. ८२६ मध्ये तिरुपती मंदिराची स्थापना केली; तर त्यापूर्वी चालुक्य राजाने इ.स. ५५० मध्ये अंबाबाईचे मंदिर कोल्हापुरात बांधले. यावरून तिरुपती मंदिर हे अंबाबाई मंदिरानंतर झाल्याचे स्पष्ट होेते. मग अंबाबाई तिरुपतीची पत्नी कशी काय होऊ शकते, हा प्रश्न आहे. जर कोणाला हे योग्य वाटत नसेल तर त्यांनी याचे पुरावे द्यावेत. अंबाबाईच्या मूर्तीवरील नागासह असंख्य पुरावे या मूर्तीसह मंदिरात मिळतात. त्यानुसार हे मंदिर शैव असल्याचे स्पष्ट होते. इतर पुराव्यांमध्ये लक्ष्मीचे स्वतंत्र असे मंदिर भारतात कोठेही नाही. ती नेहमी विष्णूबरोबर असल्याने त्या दोघांचीच मंदिरे आढळतात. एकट्या देवीचे मंदिर हे फक्त पार्वतीच्या रूपातील देवीचेच असते. (उदा. काली, दुर्गा, महामाया, महालक्ष्मी) अशी मंदिरे देशभर आहेत. या पुराव्यांवरून अंबाबाईच असल्याचे सिद्ध होते. आमची सर्व देवींवर श्रद्धा आहे. परंतु, ज्या देवीचे जिथे स्थान आहे, तिथेच ते रहावे, आपल्याला हवे म्हणून नको तो खेळ करू नये. (प्रतिनिधी)प्रशासन, पुजाऱ्यांना आवाहन : पुरावे ग्राह्य धरादेवीचे स्वरूप हे पार्वतीचे असताना अंबाबाईची कमळामध्ये बसलेल्या लक्ष्मीची पूजा बांधण्याचा पुजाऱ्यांचा हेतू स्वच्छ दिसत नाही. यामागे मोठे अर्थकारण दडले आहे. येथील ७५ टक्के उत्पन्न हे नाहक पुजाऱ्यांच्या खिशात जाते. त्याचा उपयोग मंदिर संवर्धनासाठी अथवा अन्य कामांसाठी होत नाही. सर्व पुरावे अंबाबाई असल्याचे स्पष्ट असताना जिल्हा प्रशासन व पुजारी हे का मानत नाहीत? असा सवाल इंद्रजित सावंत यांनी केला.अंबाबाई भक्तांच्या मागण्याजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे मूर्तीवर नाग घडविण्यासाठी शासनाने तातडीने सर्व समावेशक समिती स्थापन करावी.कोल्हापुरातील सर्व संस्था व शासकीय कार्यालयांनी मंदिराचा उल्लेख अंबाबाई असा करावा.भक्तांनी देवीला अर्पण केलेली दक्षिणा योग्य ठिकाणी जमा होण्यासाठी दर्शन रांगेत फलक व ध्वनिक्षेपकामार्फत आवाहन करण्यात यावे.