शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

कळंबा परिसरात सगळेच विनामास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:18 IST

कळंबा : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनता कर्फ्यू, लॉकडाऊन यांसारखे कठोर निर्बंध लागू करण्यात आले खरे, मात्र याच ...

कळंबा : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनता कर्फ्यू, लॉकडाऊन यांसारखे कठोर निर्बंध लागू करण्यात आले खरे, मात्र याच नियमांना आता नागरिकांकडून केराची टोपली दाखवली जात आहे. कळंबा परिसरात अनेकजण विनामास्क संचार करत असल्याने कोराेनाचा संसर्ग कसा थांबवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. मात्र, आजही बहुतांश नागरिक घराबाहेर कारण नसताना फिरत असून विनामास्क वावरणाऱ्यांची संख्या कळंबा व लगतच्या उपनगरांत मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. सुरुवातीला दंडात्मक कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल करणारे संबंधित प्रशासनाचेसुद्धा आता याकडे दुर्लक्ष होत असल्याने विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्याची संख्या वाढत आहे.

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर अत्यावश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर संबंधित पालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने आर्थिक दंडाची कारवाई सुरू केली होती. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव कळंबा व लगतच्या उपनगरांत वाढत असून, विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तरीही नागरिकांत जागरुकता नसल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना संबंधित प्रशासनामार्फत राबविण्यात आल्या होत्या. परंतु, कोरोना रोखण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे अत्यावश्यक आणि जरुरीचे असून देखील सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.