शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न  : डॉ. कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 12:09 IST

राष्ट्रीय सेवा योजनेतूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या व्यासपीठाचा उपयोग करून घ्या. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

ठळक मुद्देप्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न  : डॉ. कलशेट्टी‘विवेकानंद’चा गुणी विद्यार्थी गौरव समारंभ संपन्न

कोल्हापूर : राष्ट्रीय सेवा योजनेतूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या व्यासपीठाचा उपयोग करून घ्या. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये सोमवारी आयोजित विवेकानंद कॉलेज (स्वायत)च्या गुणी विद्यार्थी गौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.डॉ. कलशेट्टी म्हणाले, पर्यावरण संवर्धनाकरिता सर्वोच्च क्षमतेने योगदान देत विवेकानंद कॉलेजने शहरात पर्यावरण चळवळ उभी केली आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे ज्ञानदानाचे कार्य आदर्शवत आहे. विद्यार्थ्यांनी हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजाच्या प्रगतीसाठी कार्यशील राहिले पाहिजे.अध्यक्षीय संबोधनात संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले. बापूजींनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. स्वराज्य मिळाल्यानंतर स्वराज्यचे सुराज्य व्हावे यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली.

या शिक्षण संस्थेचा विद्यार्थी ज्ञानी, विज्ञानी आणि सुसंस्कारी बनविण्यासाठी बापूजींचे तत्त्वज्ञान अंमलात आणावे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना वाव देण्याचा मंत्र आपल्या संस्था प्रार्थनेतून व बोध वाक्यातून बापूजींनी दिला आहे.प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. डी. बी. पाटील यांनी आभार मानले. डॉ. प्रभावती पाटील व प्रा. समीक्षा फराकटे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमासाठी जिमखाना चेअरमन प्रा. किरण पाटील, प्रा. सहिदा कच्छी, प्रा. एस. एस. कुंडले, प्रा. समीर पठाण, रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात यावेळी डॉ. शरद साळुंखे, महाविद्यालयातील कला, विज्ञान व वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.गुणवंतांचा सत्कारशैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रांतील नैपुण्य मिळविलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याचा मान मिळविल्याबद्दल सम्मेद शेटे, कला शाखेतून महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार देवयानी जोशी, कॉमर्स शाखेतून महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार रोहित पाटील, विज्ञान शाखेतून महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार ऐश्वर्या मोरे यांना प्रदान करण्यात आला.

 

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर