शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न  : डॉ. कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 12:09 IST

राष्ट्रीय सेवा योजनेतूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या व्यासपीठाचा उपयोग करून घ्या. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

ठळक मुद्देप्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न  : डॉ. कलशेट्टी‘विवेकानंद’चा गुणी विद्यार्थी गौरव समारंभ संपन्न

कोल्हापूर : राष्ट्रीय सेवा योजनेतूनच व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या व्यासपीठाचा उपयोग करून घ्या. प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनमध्ये सोमवारी आयोजित विवेकानंद कॉलेज (स्वायत)च्या गुणी विद्यार्थी गौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते.डॉ. कलशेट्टी म्हणाले, पर्यावरण संवर्धनाकरिता सर्वोच्च क्षमतेने योगदान देत विवेकानंद कॉलेजने शहरात पर्यावरण चळवळ उभी केली आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे ज्ञानदानाचे कार्य आदर्शवत आहे. विद्यार्थ्यांनी हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजाच्या प्रगतीसाठी कार्यशील राहिले पाहिजे.अध्यक्षीय संबोधनात संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले. बापूजींनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. स्वराज्य मिळाल्यानंतर स्वराज्यचे सुराज्य व्हावे यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली.

या शिक्षण संस्थेचा विद्यार्थी ज्ञानी, विज्ञानी आणि सुसंस्कारी बनविण्यासाठी बापूजींचे तत्त्वज्ञान अंमलात आणावे. विद्यार्थ्यांमधील सुप्त कला गुणांना वाव देण्याचा मंत्र आपल्या संस्था प्रार्थनेतून व बोध वाक्यातून बापूजींनी दिला आहे.प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. डी. बी. पाटील यांनी आभार मानले. डॉ. प्रभावती पाटील व प्रा. समीक्षा फराकटे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमासाठी जिमखाना चेअरमन प्रा. किरण पाटील, प्रा. सहिदा कच्छी, प्रा. एस. एस. कुंडले, प्रा. समीर पठाण, रजिस्ट्रार सी. बी. दोडमणी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमात यावेळी डॉ. शरद साळुंखे, महाविद्यालयातील कला, विज्ञान व वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.गुणवंतांचा सत्कारशैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रांतील नैपुण्य मिळविलेल्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याचा मान मिळविल्याबद्दल सम्मेद शेटे, कला शाखेतून महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार देवयानी जोशी, कॉमर्स शाखेतून महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार रोहित पाटील, विज्ञान शाखेतून महाविद्यालयात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार ऐश्वर्या मोरे यांना प्रदान करण्यात आला.

 

 

टॅग्स :collegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर