शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

दरवर्षी हजारो सेट-नेटधारक बेरोजगारीच्या खाईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:51 IST

कोल्हापूर : एकीकडे एम.फिल., पीएच.डी. करण्याकडे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा वाढलेला कल, राष्ट्रीय

ठळक मुद्दे भरती बंदीचा परिणाम : सरकारविरोधात वाढता रोष; अनेकांचे करिअर पणाला

संतोष मिठारी ।कोल्हापूर : एकीकडे एम.फिल., पीएच.डी. करण्याकडे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा वाढलेला कल, राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) व राज्य पात्रता परीक्षा (सेट) यामध्ये उत्तीर्णतेची वाढलेली टक्केवारी आणि दुसरीकडे सहायक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी गेल्या सहा वर्षांपासून असलेली बंदी यामुळे शिक्षणक्षेत्रातील बेरोजगारांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. तरीही शासनाला याबाबत गांभीर्य आलेले नाही.

सध्या विद्यापीठामध्ये पीएच. डी.च्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी किमान तीन वर्षे लागतात. त्यामुळे पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा एम.फिल., पीएच.डी. करण्याकडे कल वाढू लागला आहे. त्यासह नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सहायक प्राध्यापकपदाच्या नोकरीसाठीची शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाºया उमेदवारांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. सहायक प्राध्यापक होण्याची पूर्ण पात्रता असूनही नोकरी मिळत नाही.काही सी.एच.बी.धारक हे वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहेत. किमान दहा वर्षे तरी कायमस्वरूपी नोकरी करून काहीसे सुखाने जगता येईल, या आशेने ‘सीएचबी’वर कार्यरत आहेत. सहायक प्राध्यापकांची ९ हजार ५११ पदे रिक्त असूनही भरती करीत नसल्याने राज्य सरकारविरोधात बेरोजगारांचा रोष वाढत आहे.समन्वय महत्त्वाचाशासनाकडून पदभरतीला मान्यता दिली जात नाही. आतापर्यंत किती विद्यार्थी नेट-सेट उत्तीर्ण झाले आहेत, याची कोणतीही माहिती यूजीसी, राज्य शासनाकडे उपलब्ध नाही.एखाद्या विषयाचा दर्जा वाढवायचा असेल, तर यूजीसी आणि शासनामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.आत्महत्येचा प्रयत्न ?मुखेड (ता. नांदेड) येथील एका विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाºया प्रा. बाबूराव पवळे यांना गेल्या चार वर्षांपासून वेतन मिळाले नसल्याने आॅगस्ट २०१७ मध्ये विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.