शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होतोय खड्ड्यांवरच

By admin | Updated: November 11, 2014 00:05 IST

दिवसेंदिवस खड्ड्यात वाढच : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाची अवस्था

राजाराम कांबळे -- मलकापूर -दरवर्षी रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कोट्यवधींचा खर्च करूनही या रस्त्यावरील खड्ड्यात मात्र दिवसेंदिवस वाढच होत आहे. वाहनधारक व नागरिक यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून अनेक करांची आकारणी केली जाते; पण शासकीय अधिकारी व ठेकेदारांच्या साठ्यालोठ्यातून जनतेकडून घेतलेल्या पैशांची कशी लूट केली जाते, याचे जिवंत उदाहरण कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याकडे पाहिल्यास आपणाला दिसेल. कोकणातील रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर, देवरुख, जयगड, गणपतीपुळे, आदी पर्यटनस्थळांना व माल वाहतुकीसाठी कमी वेळेत व कमी खर्चात पोहोचण्यासाठी कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याकडे पाहिले जाते. एवढेच नाही, तर गोव्याकडे पाचालमार्गे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. नाणीजसारख्या माध्यमिक शिक्षणाकडे याच मार्गावरून जाता येते. मुंबईला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा समजला जातो. एवढ्या महत्त्वाच्या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग व रस्ते विकास महामंडळाकडून अक्षम्य दुर्लक्ष झालले दिसते; पण या रस्त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रस्त्यावरील खड्ड्यांत वाढच होत आहे. जवळजवळ २०० वळणांचा व झाडा-झुडूपांनी वेढलेला हा निसर्गरम्य कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात जात असताना महामंडळ मात्र डोळे असून, आंधळ्याचे सोंग घेत असल्याचे दिसत आहे. या मार्गावरील बांधकाम विभागाने लावलेले दिशादर्शक फलक, निवारा शेड गायब होत आहेत. तर रस्त्यावर काहींनी पक्की बांधकामे केली आहेत. मलकापूर ते आंबा दरम्यान नवीन केलेली साईडपट्टी खचली आहे. बांबवडे येथील पुलाचे काम रेंगाळलेले आहे. तर जुळेवाडी येथील मोरीचा पूल गायब आहे. अधिकाऱ्यांनी कागदावरच पूल बांधल्याचे दाखवून सुमारे ४० लाखांचा ढपला पाडला आहे. सदर अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.जनतेने कर रूपाने आपला पैसा सरकारी तिजोरीने जमा करावयाचा व शासकीय अधिकारी व कंत्राटदार यांनी साठेलोटे करीत तो लुटायचा, हेच चित्र पाहायला मिळते. मलकापूर-वारुळ येथील नदीवरील पुलाला सुमारे १३० वर्षे झाली आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. नवीन पूल बांधण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.या मार्गावरून वारणा, विश्वास, उदय, दत्त, निनाई, आदी साखर कारखान्यांची ऊस वाहतूक सुरू होणार आहे. याच मार्गावरून दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने, बॉक्साईट वाहतूक, परिवहनच्या एस. टी. बसेस, ट्रॅव्हल कंपन्यांच्या आराम बस यामुळे या रस्त्यावर चोवीस तास रहदारी जाम असते. अनेकवेळा अपघात हे केवळ खड्डा चुकविणे व वेड्यावाकड्या वळणांमुळे घडले आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. नवीन शासनाने यामध्ये लक्ष घालून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.आंदोलनाचा इशारायेत्या पंधरा दिवसांत या मार्गाचे डांबरीकरण करावे, अन्यथा मलकापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू प्रभावळकर यांनी दिला आहे.कागदोपत्री खर्चशाहूवाडी तालुक्यातील भेरेवाडी ते जुळेवाडी खिंडीतील पुलाचे काम न करता येथील अधिकाऱ्यांनी सुमारे ४० लाख रुपये कागदोपत्री खर्च दाखविला आहे. येथे मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असे सेनेचे तालुकाप्रमुख दत्ता पोवार यांनी सांगितले.