शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होतोय खड्ड्यांवरच

By admin | Updated: November 11, 2014 00:05 IST

दिवसेंदिवस खड्ड्यात वाढच : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाची अवस्था

राजाराम कांबळे -- मलकापूर -दरवर्षी रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कोट्यवधींचा खर्च करूनही या रस्त्यावरील खड्ड्यात मात्र दिवसेंदिवस वाढच होत आहे. वाहनधारक व नागरिक यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून अनेक करांची आकारणी केली जाते; पण शासकीय अधिकारी व ठेकेदारांच्या साठ्यालोठ्यातून जनतेकडून घेतलेल्या पैशांची कशी लूट केली जाते, याचे जिवंत उदाहरण कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याकडे पाहिल्यास आपणाला दिसेल. कोकणातील रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर, देवरुख, जयगड, गणपतीपुळे, आदी पर्यटनस्थळांना व माल वाहतुकीसाठी कमी वेळेत व कमी खर्चात पोहोचण्यासाठी कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याकडे पाहिले जाते. एवढेच नाही, तर गोव्याकडे पाचालमार्गे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. नाणीजसारख्या माध्यमिक शिक्षणाकडे याच मार्गावरून जाता येते. मुंबईला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा समजला जातो. एवढ्या महत्त्वाच्या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग व रस्ते विकास महामंडळाकडून अक्षम्य दुर्लक्ष झालले दिसते; पण या रस्त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रस्त्यावरील खड्ड्यांत वाढच होत आहे. जवळजवळ २०० वळणांचा व झाडा-झुडूपांनी वेढलेला हा निसर्गरम्य कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात जात असताना महामंडळ मात्र डोळे असून, आंधळ्याचे सोंग घेत असल्याचे दिसत आहे. या मार्गावरील बांधकाम विभागाने लावलेले दिशादर्शक फलक, निवारा शेड गायब होत आहेत. तर रस्त्यावर काहींनी पक्की बांधकामे केली आहेत. मलकापूर ते आंबा दरम्यान नवीन केलेली साईडपट्टी खचली आहे. बांबवडे येथील पुलाचे काम रेंगाळलेले आहे. तर जुळेवाडी येथील मोरीचा पूल गायब आहे. अधिकाऱ्यांनी कागदावरच पूल बांधल्याचे दाखवून सुमारे ४० लाखांचा ढपला पाडला आहे. सदर अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.जनतेने कर रूपाने आपला पैसा सरकारी तिजोरीने जमा करावयाचा व शासकीय अधिकारी व कंत्राटदार यांनी साठेलोटे करीत तो लुटायचा, हेच चित्र पाहायला मिळते. मलकापूर-वारुळ येथील नदीवरील पुलाला सुमारे १३० वर्षे झाली आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. नवीन पूल बांधण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.या मार्गावरून वारणा, विश्वास, उदय, दत्त, निनाई, आदी साखर कारखान्यांची ऊस वाहतूक सुरू होणार आहे. याच मार्गावरून दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने, बॉक्साईट वाहतूक, परिवहनच्या एस. टी. बसेस, ट्रॅव्हल कंपन्यांच्या आराम बस यामुळे या रस्त्यावर चोवीस तास रहदारी जाम असते. अनेकवेळा अपघात हे केवळ खड्डा चुकविणे व वेड्यावाकड्या वळणांमुळे घडले आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. नवीन शासनाने यामध्ये लक्ष घालून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.आंदोलनाचा इशारायेत्या पंधरा दिवसांत या मार्गाचे डांबरीकरण करावे, अन्यथा मलकापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू प्रभावळकर यांनी दिला आहे.कागदोपत्री खर्चशाहूवाडी तालुक्यातील भेरेवाडी ते जुळेवाडी खिंडीतील पुलाचे काम न करता येथील अधिकाऱ्यांनी सुमारे ४० लाख रुपये कागदोपत्री खर्च दाखविला आहे. येथे मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असे सेनेचे तालुकाप्रमुख दत्ता पोवार यांनी सांगितले.