शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
3
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
4
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
5
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
6
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
7
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
8
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
9
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
10
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
11
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
12
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
13
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
14
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
15
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
16
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
17
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
18
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
19
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
20
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी २० हजार विविध बियांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:17 IST

कोल्हापूर : ‘आपण समाजाचं देणं लागतो’ या उक्तीप्रमाणे काही माणसं निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतात. असेच एक ध्येयवेडे आहेत पर्यावरणीप्रेमी पिशवी (ता. शाहूवाडी) येथील मानसिंग पाटील. ते प्रत्येकवर्षी २० हजार बिया गोळा करून त्याचे रोपण करतात. गत तीन वर्षांपासून ते हा उपक्रमराबवित असून, इतरांसाठी तो उपफक्रम प्रेरणादायी आहे.मानसिंग ...

कोल्हापूर : ‘आपण समाजाचं देणं लागतो’ या उक्तीप्रमाणे काही माणसं निरपेक्ष भावनेने सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतात. असेच एक ध्येयवेडे आहेत पर्यावरणीप्रेमी पिशवी (ता. शाहूवाडी) येथील मानसिंग पाटील. ते प्रत्येकवर्षी २० हजार बिया गोळा करून त्याचे रोपण करतात. गत तीन वर्षांपासून ते हा उपक्रमराबवित असून, इतरांसाठी तो उपफक्रम प्रेरणादायी आहे.मानसिंग मधुकर पाटील यांनी एम. ए., बी.पी.एड., एम.फिल. केले आहे. मात्र, नोकरीच्या मागे न लागता युवकांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांनी बांबवडे येथे व्यायामशाळा सुरू केली. त्यांना ट्रेकिंगचीही आवड आहे. यातूनच पर्यावरण रक्षणासाठी वर्षभरात २० हजार बिया जमा करण्याचा संकल्प केला. यातूनच ट्रेकिंगला गेल्यावर मिळेल त्या बिया गोळा करतात. नवरात्र उत्सवात भक्तांनी विविध फळे खाऊन फेकून दिलेल्या बिया गोळा करतात. या सर्व बिया खराब होऊ नयेत यासाठी स्वच्छ धुऊन, औषध फवारणी करून पॅकबंद पिशव्यांमध्ये साठवितात. पावसाळा सुरू झाला की, ते या बियांचे माळरानासह रोपण करतात. त्यांना अजय पाटील सहकार्य करतात.वाढदिवसाचा खर्च सामाजिक संस्थेसमानसिंग पाटील यांनी मुलगा मानस याच्या वाढदिवसाला येणाऱ्या खर्चाची सर्व रक्कम भैरवनाथ पर्यावरण व सामाजिक संस्थेस देतात. केक, फुगे, रोषणाई, जेवणावळी यावर होणाºया वायफळ खर्चाला फाटा देत ते सामाजिक कार्यातून मुलाच्या वाढदिवसाचा क्षण अविस्मरणीय बनवितात.