शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

बहुमत मिळाले तरी नशिबावर अवलंबून राहावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST

जयसिंगपूर : मतदानासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांकडून घर टू घर प्रचार जोमात सुरू आहे. निवडणुकीनंतर सरपंच ...

जयसिंगपूर : मतदानासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. उमेदवारांकडून घर टू घर प्रचार जोमात सुरू आहे. निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण निघणार असल्याने एखाद्या गटाचे बहुमत झाले तर त्याच्या सदस्यामधील आरक्षण निघाले नाही तर सरपंच करायचे कुणाला, यासह अनेक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बहुमत आले तरीही नशिबावर अवलंबून रहावे लागणार आहे.

ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अनेकांनी कंबर कसली आहे. सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर घेण्याची घोषणा आयोगाने केल्यानंतर अनेकांच्या इच्छेवर विरजण पडले आहे. मात्र गेल्या १५ वर्षातील आरक्षणाचा अंदाज घेत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. सरपंच पदावरून उलाढालही ठरलेलीच असते. सध्या प्रचारामुळे निवडणुकीचे वातावरण ढवळून निघत आहे. बहुमतासाठी गावातील पुढा-यांनी व्यूहरचना आखली आहे. सरपंच आरक्षणाचे नंतर बघू, मात्र ग्रामपंचायतीवर आपल्याच आघाडीचा झेंडा फडकविण्याचा चंग नेत्यांनी बांधला आहे.

सरपंच आरक्षण असेल त्या प्रवर्गाचे अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात बघायला मिळायचे. सरपंच पदासाठी मोठी स्पर्धा असायची. त्यामुळे निवडणुका चुरशीने व्हायच्या. मात्र, शासनाच्या निर्णयामुळे एखादे गटाचे बहुमत होऊनही सरपंच पदासाठी त्यांना आरक्षणाच्या नशिबावर अवलंबून राहावे लागणार आहे, असेच चित्र सध्या तरी आहे.

..............

जर तर वर गणिते

बहुमत मिळूनही आरक्षण विरोधकांच्या सदस्याच्या हाती गेले तर सरपंच करायचे कुणाला, असा मोठा पेचदेखील उभा राहणार आहे. त्यामुळे जर तर वरची गणिते मांडत उमेदवारांसह नेतेमंडळीकडून प्रचार सुरू आहे.