शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

...तरीही भाजपचे महापौर होणे अशक्यच.. अन्य पदावर होऊ शकतो परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 10:00 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे बरेवाईट परिणाम जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उमटणार असून, बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेता, जिल्ह्याच्या राजकीय पटलावर जसे परिणाम होणार आहेत.

ठळक मुद्देअशा अडचणीतील नगरसेवकांना सत्तेच्या जोरावर घरचा रस्ता दाखवून भाजप-ताराराणी आघाडीकडून आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे बरेवाईट परिणाम जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उमटणार असून, बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेता, जिल्ह्याच्या राजकीय पटलावर जसे परिणाम होणार आहेत, तसेच महानगरपालिकेतील राजकारणावरही ते उमटणार आहेत. थेट महापौर व उपमहापौर या पदांवरील व्यक्तींना त्याचा फटका बसणार नसला तरी स्थायी, परिवहन, शिक्षण, आदी सभापती तसेच विभागीय प्रभाग समिती सभापती या पदांकरिता चढाओढ होऊ शकते.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली होती. तिचे चांगले परिणाम म्हणून त्यांच्या जिल्ह्यातील दोन्ही जागा भक्कम मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत. स्वाभाविकच भाजप-सेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. युतीला कोणतीही गोष्ट आता अशक्य राहिलेली नाही. मनात आणले तर आपण काहीही करू शकतो, इतका विश्वास त्यांच्या मनात तयार झालेला आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याकरिता युतीचे नेते पुन्हा एकदा कंबर कसतील, अशी अपेक्षा आहे.

महानगरपालिकेत कॉँग्रेस-राष्टवादीची सत्ता आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी स्थायी समितीच्या सभापती निवडीवेळी भाजप-ताराराणी आघाडीतर्फे केलेली कुरघोडी वगळता कॉँग्रेस-राष्टÑवादीने शिवसेनेच्या मदतीने सर्व पदे आपल्याकडे राखण्यात यश मिळविले; परंतु लोकसभेच्या निवडणुकीत झालेली भाजप-शिवसेनेची युती तसेच खासदार महाडिक व आमदार पाटील यांच्यातील टोकाला पोहोचलेला संघर्ष पाहता, महापालिकेत विचित्र घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

स्थायी समितीच्या सभापती निवडीवेळी भाजप-ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी राष्टÑवादीच्या दोन नगरसेवकांची पदे रद्द करण्याची यशस्वी खेळी केली होती. त्यामुळे पुढील काळात अशी घातकी खेळी केली जाऊ शकते. कॉँग्रेस-राष्टवादीचे काही नगरसेवक जातीच्या दाखल्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत. तसेच दोन नगरसेवक अवैध बांधकाम प्रकरणात अडचणीत आले आहेत. अशा अडचणीतील नगरसेवकांना सत्तेच्या जोरावर घरचा रस्ता दाखवून भाजप-ताराराणी आघाडीकडून आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेत काय होऊ शकते?

- कॉँग्रेस-राष्टवादी आघाडीचे संख्याबळ : ४२- भाजप-ताराराणी आघाडीचे : ३३- शिवसेनेच्या चार नगरसेवकसह हे संख्याबळ ३७ वर जाईल.- जातीच्या दाखल्यात अडकलेले पाच, तर अवैध बांधकाम प्रकरणात दोषी ठरलेले दोन अशा सात नगरसेवक चे पद रद्द होऊ शकते.- असे घडल्यास कॉँग्रेस -राष्ट्रवादीचे संख्याबळ ३५ पर्यंत खाली येईल.

भाजपचे स्वप्न अपूर्णच राहणारकायदेशीरदृष्ट्या विचार केला तर महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांची मुदत नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. तथापि, मोरे यांना सहा महिन्यांकरिता, तर शेटे यांना एक वर्षाकरिता संधी देण्यात आली आहे. त्यामुळे महापौरांची मुदत १० जून रोजी संपणार आहे. भाजप - ताराराणी आघाडीकडून काही वेगळी व्यूहरचना आखली गेली आणि शह देण्याचा प्रयत्न झाला तर मोरे व शेटे यांनाच राजीनामा देऊ नका, असे सांगून पुढे संधी दिली जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे महापौर-उपमहापौर करण्याचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिका