शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

...तरीही भाजपचे महापौर होणे अशक्यच.. अन्य पदावर होऊ शकतो परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 10:00 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे बरेवाईट परिणाम जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उमटणार असून, बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेता, जिल्ह्याच्या राजकीय पटलावर जसे परिणाम होणार आहेत.

ठळक मुद्देअशा अडचणीतील नगरसेवकांना सत्तेच्या जोरावर घरचा रस्ता दाखवून भाजप-ताराराणी आघाडीकडून आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे बरेवाईट परिणाम जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उमटणार असून, बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेता, जिल्ह्याच्या राजकीय पटलावर जसे परिणाम होणार आहेत, तसेच महानगरपालिकेतील राजकारणावरही ते उमटणार आहेत. थेट महापौर व उपमहापौर या पदांवरील व्यक्तींना त्याचा फटका बसणार नसला तरी स्थायी, परिवहन, शिक्षण, आदी सभापती तसेच विभागीय प्रभाग समिती सभापती या पदांकरिता चढाओढ होऊ शकते.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती झाली होती. तिचे चांगले परिणाम म्हणून त्यांच्या जिल्ह्यातील दोन्ही जागा भक्कम मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत. स्वाभाविकच भाजप-सेनेचा आत्मविश्वास वाढला आहे. युतीला कोणतीही गोष्ट आता अशक्य राहिलेली नाही. मनात आणले तर आपण काहीही करू शकतो, इतका विश्वास त्यांच्या मनात तयार झालेला आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याकरिता युतीचे नेते पुन्हा एकदा कंबर कसतील, अशी अपेक्षा आहे.

महानगरपालिकेत कॉँग्रेस-राष्टवादीची सत्ता आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी स्थायी समितीच्या सभापती निवडीवेळी भाजप-ताराराणी आघाडीतर्फे केलेली कुरघोडी वगळता कॉँग्रेस-राष्टÑवादीने शिवसेनेच्या मदतीने सर्व पदे आपल्याकडे राखण्यात यश मिळविले; परंतु लोकसभेच्या निवडणुकीत झालेली भाजप-शिवसेनेची युती तसेच खासदार महाडिक व आमदार पाटील यांच्यातील टोकाला पोहोचलेला संघर्ष पाहता, महापालिकेत विचित्र घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

स्थायी समितीच्या सभापती निवडीवेळी भाजप-ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी राष्टÑवादीच्या दोन नगरसेवकांची पदे रद्द करण्याची यशस्वी खेळी केली होती. त्यामुळे पुढील काळात अशी घातकी खेळी केली जाऊ शकते. कॉँग्रेस-राष्टवादीचे काही नगरसेवक जातीच्या दाखल्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत. तसेच दोन नगरसेवक अवैध बांधकाम प्रकरणात अडचणीत आले आहेत. अशा अडचणीतील नगरसेवकांना सत्तेच्या जोरावर घरचा रस्ता दाखवून भाजप-ताराराणी आघाडीकडून आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेत काय होऊ शकते?

- कॉँग्रेस-राष्टवादी आघाडीचे संख्याबळ : ४२- भाजप-ताराराणी आघाडीचे : ३३- शिवसेनेच्या चार नगरसेवकसह हे संख्याबळ ३७ वर जाईल.- जातीच्या दाखल्यात अडकलेले पाच, तर अवैध बांधकाम प्रकरणात दोषी ठरलेले दोन अशा सात नगरसेवक चे पद रद्द होऊ शकते.- असे घडल्यास कॉँग्रेस -राष्ट्रवादीचे संख्याबळ ३५ पर्यंत खाली येईल.

भाजपचे स्वप्न अपूर्णच राहणारकायदेशीरदृष्ट्या विचार केला तर महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांची मुदत नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे. तथापि, मोरे यांना सहा महिन्यांकरिता, तर शेटे यांना एक वर्षाकरिता संधी देण्यात आली आहे. त्यामुळे महापौरांची मुदत १० जून रोजी संपणार आहे. भाजप - ताराराणी आघाडीकडून काही वेगळी व्यूहरचना आखली गेली आणि शह देण्याचा प्रयत्न झाला तर मोरे व शेटे यांनाच राजीनामा देऊ नका, असे सांगून पुढे संधी दिली जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे महापौर-उपमहापौर करण्याचे स्वप्न अपूर्णच राहणार आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिका