शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संविधानापूर्वीच त्याची मूल्ये शाहूंनी संस्थानात रुजवली;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांनी संविधान अस्तित्वात येण्यापूर्वीच संविधानाच्या प्रास्ताविकेमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांनी संविधान अस्तित्वात येण्यापूर्वीच संविधानाच्या प्रास्ताविकेमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची कसोशीने अंमलबजावणी केली. शिक्षणाचा हक्क, आंतरजातीय विवाह, सक्तीचे मोफत शिक्षण, वेदोक्त प्रकरणानंतरची पुरोगामी चळवळ, त्यादृष्टीने संस्थानात लागू केलेले कायदे यातून संविधानिक मूल्ये रुजवली व त्या दिशेने कृतिशील पावले उचलली. संविधानाची संस्थानात रुजवात करणारे ते एकमेव पूर्वसुरी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्रातर्फे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘राजर्षी शाहू छत्रपती आणि कोल्हापूर (खंड-१२)’ आणि ‘शाहू छत्रपती : राजा आणि क्रांतिकारक (खंड-१३)’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. शिवाजी विद्यापीठाच्या छत्रपती शाहू स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत मद्रास विद्यापीठाचे डॉ. चंद्रा मुदलियार आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एन. वैद्य यांनी दिलेल्या व्याख्यानांचा प्रा. दिलीप पंगू आणि चंद्रकांत गायकवाड यांनी अनुवाद केला.

डॉ. देशमुख म्हणाले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी वि. रा. शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांनी महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला पुरोगामित्वाची दिशा दाखविली. त्यांना केवळ राज्यापुरते संकुचित करून चालणार नाही. जिथे जिथे वंचित, शोषितांची चळवळ सुरू आहे, तिथे तिथे या महापुरूषांचे अस्तित्व आहे. वर्तमानात महापुरुषांचे दैवतीकरण आणि विकृतीकरण सुरू आहे. दोन्ही बाबी प्रत्येकजण आपापल्या अजेंड्यानुसार करत असून हे गैर आहे.

ते म्हणाले, न्या. वैद्यांनी शाहू महाराजांचे चरित्र रंजकपणे मात्र अत्यंत नेमकेपणाने व नेटकेपणाने सांगितले आहे. महाराजांचे थोरपण श्रोत्यांवर बिंबविण्यात ते यशस्वी झाले आहेत. चंद्रा मुदलियार यांनी कोल्हापुरातील ब्राम्हणेतर चळवळीचा साद्यंत वेध घेतला आहे. चिकित्सक मांडणीतून त्यांनी इतिहास संशोधनाचा वस्तुनिष्ठ नमुना सादर केला आहे.

डॉ. जयसिंगराव पवार प्रास्ताविकात म्हणाले, शाहू महाराजांनी शैक्षणिक व सामाजिक सुधारणांची चळवळ सुुरू केली, तेव्हा ब्राम्हणांना आपल्या प्रतिष्ठेला बाधा आल्यासारखे वाटले. वेदोक्त प्रकरणामुळे या भावनेला टोकाचे स्वरूप येऊन ब्राम्हणेतर चळवळ अधिक गतिमान झाली. अशा अनेक घटना आहेत, की त्यांचे खूप संशोधन होऊ शकते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, उत्तम प्रशासन चालवायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या चरित्रांचा आजच्या तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. शाहूंचे चरित्र प्रकाशात आणण्यासाठी केंद्रातर्फे प्रयत्न केले जातील. त्यांनी स्त्रियांसाठी केलेल्या कार्याविषयी केंद्रामार्फत लवकरच प्रकल्प हाती घेण्यात येईल.

डॉ. देविकाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, सचिन घोरपडे यांनी संयोजन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले.

---

शाहूंचे विविध पैलू प्रकाशात यावेत..

यावेळी मान्यवरांनी, शाहू महाराजांनी वेगवेगळ्या घटकांसाठी केलेले कार्य प्रकाशात येण्याची गरज आहे. महाराजांचे स्त्री-पुरुष समानतेचे काम, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी दिलेली साथ, सर फ्रेझर व महाराज यांचे संबंध, राधानगरी धरण बांधतानाची त्यांची तळमळ, राजकीय चळवळीसाठी महाराजांचे कार्य... अशा विविध पैलूंवर शाहू संशोधन केंद्राचे काम करावे, असे आवाहन केले.

यावर कुलगुरू डॉ. शिर्के यांनी, या विषयावर संशोधन करून ते पुस्तकरूपाने प्रकाशात आणले जाईल, अशी ग्वाही दिली.

---

फोटो नं ०६०३२०२१-कोल-शाहू संशोधन बुक

ओळ :

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात शनिवारी ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार संपादित दोन पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रा. चंद्रकांत गायकवाड, दिलीप पंगू, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. पवार, डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--