शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

पंचनामे करून दीड वर्ष लोटले तरी दमडीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात २०१९ मध्ये आलेल्या प्रलंयकारी महापुरात महावितरण आणि कृषिपंपधारकांचे अतोनात नुकसान झाले, साहजिकच मदतीची मागणी झाली. शासनाने ...

कोल्हापूर : जिल्ह्यात २०१९ मध्ये आलेल्या प्रलंयकारी महापुरात महावितरण आणि कृषिपंपधारकांचे अतोनात नुकसान झाले, साहजिकच मदतीची मागणी झाली. शासनाने पंचनाम्याचे सोपस्कारही झाले, नुकसानभरपाईचा ७९ कोटींचा आकडाही निश्चित झाला. आता या सर्व घटनाक्रमाला दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे; पण यातील दमडीची मदत ना कृषिपंपधारक शेतकऱ्यांना मिळाली ना महावितरणला.

कोल्हापूूर जिल्ह्याने ऑगस्ट २०१९ मध्ये अभूतपूर्व अशा महापुराचा सामना केला. आठ दिवसांनी महापूर ओसरला तरी यात महावितरणची बहुतांश यंत्रणा गाळात रुतून बसली, काही वाहून गेली. यात कृषिपंपाची अवस्था तर त्याहून बिकट होती. नदीकाठच वाहून गेल्याने मोटारी डीपीसह वाहून गेल्या. कोल्हापुरातून राज्य इरिगेशन फेडरेशनने प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत यानिमित्ताने गाठीभेटी घेण्यात आल्या. याचे पंचनामे सुरू करण्यात आले, तोपर्यंत राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्याने हा सर्व विषय मागे पडला. सतेज पाटील हे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बैठक घेऊन पंचनामे करून तयार झालेल्या अहवालानुसार नुकसानभरपाईपोटी ७९ कोटी २८ लाख रुपये शासन देईल, असे जाहीर केले. या घटनेलाही आता नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी केलेल्या घोषणेप्रमाणे एक रुपयाचीही मदत अद्याप मिळालेली नाही.

चौकट ०१

महापुरात झालेले नुकसान

महावितरण: ६५ कोटी ४४ लाख

कृषिपंपधारक: १३ कोटी ८४ लाख

वैयक्तिक पंचनामा झालेले कृषी ग्राहक: ७ हजार ८८९

पंचनामा केलेल्या सिंचन योजना: २८०

चौकट ०२

महावितरणचे नुकसान

महापुरात महावितरणच्या जिल्ह्यातील २६ उपकेंद्रांत शेती व बिगरशेती असे वर्गीकरण करून बाधित संख्या काढण्यात आली. यात बिगरशेतीमध्ये ग्राहकांचे उच्चदाब वाहिन्या ५४८, रोहित्र ३५७० उच्चदाब खांब १२५, लघुदाब खांब ३१६ अशा २ लाख ४१ हजार ३९८ ग्राहकांचे नुकसान झाले. शेतीवर्गात उच्च दाब वाहिन्या २१८, रोहित्र ७ हजार ६०१, उच्चदाब खांब १५८१, लघुदाब खांब ५ हजार ५७ अशा ९६ हजार ६२१ ग्राहकांचे नुकसान झाले.

प्रतिक्रिया

शासन ढिम्म आहे. आधी कृषिपंपधारकांना झुलवले, आता घरगुती ग्राहकांना झुलवत आहे. दीड- दोन वर्षे जर नुकसान भरपाई मिळत नसेल तर यापेक्षा दुसरे दुर्दैव असू शकत नाही.

-विक्रांत पाटील किणीकर, राज्य इरिगेशन फेडरेशन