शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

पंचनामे करून दीड वर्ष लोटले तरी दमडीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात २०१९ मध्ये आलेल्या प्रलंयकारी महापुरात महावितरण आणि कृषिपंपधारकांचे अतोनात नुकसान झाले, साहजिकच मदतीची मागणी झाली. शासनाने ...

कोल्हापूर : जिल्ह्यात २०१९ मध्ये आलेल्या प्रलंयकारी महापुरात महावितरण आणि कृषिपंपधारकांचे अतोनात नुकसान झाले, साहजिकच मदतीची मागणी झाली. शासनाने पंचनाम्याचे सोपस्कारही झाले, नुकसानभरपाईचा ७९ कोटींचा आकडाही निश्चित झाला. आता या सर्व घटनाक्रमाला दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे; पण यातील दमडीची मदत ना कृषिपंपधारक शेतकऱ्यांना मिळाली ना महावितरणला.

कोल्हापूूर जिल्ह्याने ऑगस्ट २०१९ मध्ये अभूतपूर्व अशा महापुराचा सामना केला. आठ दिवसांनी महापूर ओसरला तरी यात महावितरणची बहुतांश यंत्रणा गाळात रुतून बसली, काही वाहून गेली. यात कृषिपंपाची अवस्था तर त्याहून बिकट होती. नदीकाठच वाहून गेल्याने मोटारी डीपीसह वाहून गेल्या. कोल्हापुरातून राज्य इरिगेशन फेडरेशनने प्रा. डॉ. एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत यानिमित्ताने गाठीभेटी घेण्यात आल्या. याचे पंचनामे सुरू करण्यात आले, तोपर्यंत राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्याने हा सर्व विषय मागे पडला. सतेज पाटील हे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बैठक घेऊन पंचनामे करून तयार झालेल्या अहवालानुसार नुकसानभरपाईपोटी ७९ कोटी २८ लाख रुपये शासन देईल, असे जाहीर केले. या घटनेलाही आता नऊ महिन्यांचा कालावधी लोटला तरी केलेल्या घोषणेप्रमाणे एक रुपयाचीही मदत अद्याप मिळालेली नाही.

चौकट ०१

महापुरात झालेले नुकसान

महावितरण: ६५ कोटी ४४ लाख

कृषिपंपधारक: १३ कोटी ८४ लाख

वैयक्तिक पंचनामा झालेले कृषी ग्राहक: ७ हजार ८८९

पंचनामा केलेल्या सिंचन योजना: २८०

चौकट ०२

महावितरणचे नुकसान

महापुरात महावितरणच्या जिल्ह्यातील २६ उपकेंद्रांत शेती व बिगरशेती असे वर्गीकरण करून बाधित संख्या काढण्यात आली. यात बिगरशेतीमध्ये ग्राहकांचे उच्चदाब वाहिन्या ५४८, रोहित्र ३५७० उच्चदाब खांब १२५, लघुदाब खांब ३१६ अशा २ लाख ४१ हजार ३९८ ग्राहकांचे नुकसान झाले. शेतीवर्गात उच्च दाब वाहिन्या २१८, रोहित्र ७ हजार ६०१, उच्चदाब खांब १५८१, लघुदाब खांब ५ हजार ५७ अशा ९६ हजार ६२१ ग्राहकांचे नुकसान झाले.

प्रतिक्रिया

शासन ढिम्म आहे. आधी कृषिपंपधारकांना झुलवले, आता घरगुती ग्राहकांना झुलवत आहे. दीड- दोन वर्षे जर नुकसान भरपाई मिळत नसेल तर यापेक्षा दुसरे दुर्दैव असू शकत नाही.

-विक्रांत पाटील किणीकर, राज्य इरिगेशन फेडरेशन