शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

करारातील दराप्रमाणे रस्त्यांचे मूल्यांकन करा

By admin | Updated: August 18, 2015 01:14 IST

टोलप्रश्नी बैठक : शासनाचा कृती समिती, महापालिकेला आदेश

कोल्हापूर : राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्यात झालेल्या करारातील दरांप्रमाणे रस्त्यांचे मूल्यांकन करून तसा अहवाल द्यावा, असा आदेश राज्य सरकारने सोमवारी महानगरपालिका आणि सर्व पक्षीय कृती समितीला दिला. त्यानुसार गुरुवारी (२० आॅगस्ट) तसा अहवाल देण्यात येईल, असे सांगण्यात आले. कोल्हापूर शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत आयआरबी कंपनीला देय असलेली रक्कम निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहसचिव तामसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक घेण्यात आली. यापूर्वीच्या मूल्यांकन प्रक्रियेत आयआरबी कंपनीने सहभाग घेतला नव्हता. मात्र, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत आयआरबी कंपनीने आपले म्हणणे मांडले असल्याचे सांगून तामसेकर यांनी महानगरपालिका व कृती समितीने आपले म्हणणे मांडावे, असे सांगितले. त्यावेळी पालिकेचे नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कृती समितीचे सदस्य राजेंद्र सावंत व प्रसाद मुजुमदार यांनी डीएसआरप्रमाणे तयार केलेला अहवाल सादर केला. त्यावेळी, नोबेल कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातील क्षेत्रफळाबाबत आयआरबी कंपनीची कोणतीही तक्रार नाही परंतु मूल्यांकनामधील डीएसआरच्या दराऐवजी करारातील रस्त्यांच्या दराप्रमाणे दर निश्चित करावेत व त्याप्रमाणे मूल्यांकन करण्यात यावे, असे तामसेकर यांनी सूचित केले. कृती समिती सदस्य राजेंद्र सावंत, प्रसाद मुजुमदार व नगर अभियंता सरनोबत यांनी संबंधित दरसूची ही चौरस मीटरवर आधारित असून, त्यावर देय रक्कम काढायची झाल्यास त्या क्षेत्रफळामध्ये कमी जाडीचे थर, कामाचा दर्जा, इत्यादीवर आधारित रक्कम वजा होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे खराब झालेल्या, निकृष्ठ दर्जाच्या व अर्धवट राहिलेल्या व कराराप्रमाणे न केलेल्या कामांचे मूल्यांकन वजा झाले पाहिजे, असा आग्रहही धरला. शेवटी डीएसआरवरील धरण्यात आलेले वाढीव दर इत्यादी बाबी पडताळून नोबेल कंपनीच्या सर्वेक्षणावर आधारित अंतिम देय रक्कम ठरविली जाईल व ती टोल विरोधी कृती समितीच्या मान्यतेने गुरुवारपर्यंत सादर सांगितले. बैठकीला रस्ते विकास महामंडळाचे अनिल डिग्गीकर, रामचंदानी, मुख्य अभियंता ओहोळ, ‘नोबेल’चे धर्माधिकारी, ‘आयआरबी’चे वीरेंद्र म्हैसकर, आदी उपस्थित होते. राजेश क्षीरसागर यांची हरकत आमदार राजेश क्षीरसागर यांनी करारातील दराप्रमाणे मूल्यांकन करण्याला जोरदार हरकत घेतली. प्रकल्पाचा करार होताना त्याची किंमत कमी होती; परंतु ती नंतर वाढविली आहे. करार करताना काम मिळावे म्हणून कंपनीने तत्कालीन सत्ताधाऱ्यांना पैसे दिले असतील किंवा खर्च केले असतील तर तो सर्व खर्च कंपनी या प्रकल्पाद्वारे वसूल क रू पहात असेल तर ते कदापि शक्य होणार नाही. कंपनीकडून कोणी पैसे घेतले असतील तर त्यांचा शासनाशी काडीमात्र संबंध नाही, असे आमदार क्षीरसागर म्हणाले. अपूर्ण कामे, कामांचा निकृष्ट दर्जा, वसूल केलेली आजपर्यंतची टोलची रक्कम आदी बाबी या वजा करूनच आयआरबीची रक्कम निश्चित करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)