शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

‘गाळयुक्त शिवार’साठी विभागीय समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 01:01 IST

विभागीय आयुक्त अध्यक्ष : जिल्हा व तालुकास्तरावरील समित्यांवर ठेवणार नियंत्रण; शासनाचा निर्णय

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : ‘जलयुक्त शिवार अभियाना’ला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य शासनाने यंदापासून ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ हे अभियान हाती घेतले आहे. त्यांची जिल्हास्तरीय समिती यापूर्वीच स्थापन झाली असून, नुकतीच विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सातजणांची विभागीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जिल्हा व तालुकास्तरांवरील समित्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणार आहे.राज्यातील २५० हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या धरणातील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी राज्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राबविण्यात येत आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सातजणांची ‘विभागीय सनियंत्रण समिती’ स्थापन करण्यात आली आहे.या समितीमध्ये विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी हे अध्यक्ष असून, इतर आठजणांचा समावेश आहे. ही समिती जिल्ह्यात गाळयुक्त शिवार अंतर्गत कामकाजाची माहिती जिल्हास्तरावरील समितीकडून घेणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील समित्या स्थापन झाल्या आहेत. राज्य समितीचे अध्यक्ष मुख्य सचिव, तर जिल्हा समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी व तालुक्याचे अध्यक्ष हे संबंधित प्रांताधिकारी आहेत. आता विभागीय समिती स्थापन झाली आहे.सध्या या योजनेंतर्गत काम सुरू झाले असून जिल्हास्तरीय समितीकडून तालुकास्तरीय समितीकडून दर आठवड्याला किती गाळ काढला याबाबत आढावा घेतला जात आहे. गाळ साचलेल्या धरणालगत क्षेत्रातील शेतकरी किंवा अशासकीय संस्था हा गाळ स्वखर्चाने काढून न्यायचा असून याबाबत संबंधित तहसीलदार, तलाठी, धरण यंत्रणा उपअभियंता यांना माहिती द्यावयाची आहे. या गाळावर कोणतेही शुल्क सरकारकडून आकारले जात नाही. स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा व त्यांनी स्वखर्चाने हा गाळ वाहून नेणे, अशी अट ठेवण्यात आली आहे.