शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

‘गाळयुक्त शिवार’साठी विभागीय समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 01:01 IST

विभागीय आयुक्त अध्यक्ष : जिल्हा व तालुकास्तरावरील समित्यांवर ठेवणार नियंत्रण; शासनाचा निर्णय

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : ‘जलयुक्त शिवार अभियाना’ला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य शासनाने यंदापासून ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ हे अभियान हाती घेतले आहे. त्यांची जिल्हास्तरीय समिती यापूर्वीच स्थापन झाली असून, नुकतीच विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सातजणांची विभागीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती जिल्हा व तालुकास्तरांवरील समित्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणार आहे.राज्यातील २५० हेक्टर सिंचन क्षमतेपर्यंतच्या धरणातील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी राज्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ हे अभियान राबविण्यात येत आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरांवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तसेच विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सातजणांची ‘विभागीय सनियंत्रण समिती’ स्थापन करण्यात आली आहे.या समितीमध्ये विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी हे अध्यक्ष असून, इतर आठजणांचा समावेश आहे. ही समिती जिल्ह्यात गाळयुक्त शिवार अंतर्गत कामकाजाची माहिती जिल्हास्तरावरील समितीकडून घेणार आहे. यापूर्वी या योजनेसाठी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील समित्या स्थापन झाल्या आहेत. राज्य समितीचे अध्यक्ष मुख्य सचिव, तर जिल्हा समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी व तालुक्याचे अध्यक्ष हे संबंधित प्रांताधिकारी आहेत. आता विभागीय समिती स्थापन झाली आहे.सध्या या योजनेंतर्गत काम सुरू झाले असून जिल्हास्तरीय समितीकडून तालुकास्तरीय समितीकडून दर आठवड्याला किती गाळ काढला याबाबत आढावा घेतला जात आहे. गाळ साचलेल्या धरणालगत क्षेत्रातील शेतकरी किंवा अशासकीय संस्था हा गाळ स्वखर्चाने काढून न्यायचा असून याबाबत संबंधित तहसीलदार, तलाठी, धरण यंत्रणा उपअभियंता यांना माहिती द्यावयाची आहे. या गाळावर कोणतेही शुल्क सरकारकडून आकारले जात नाही. स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा व त्यांनी स्वखर्चाने हा गाळ वाहून नेणे, अशी अट ठेवण्यात आली आहे.