शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासूनच्या शहरवासीयांच्या हद्दवाढीच्या मागणीला पूर्णविराम देत राज्य सरकारने अखेर कोल्हापूर शहर आणि आसपासच्या ४२ गावांच्या संतुलित विकासासाठी ‘कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणा’ची स्थापना केली. या संदर्भातील अधिसूचनेवरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली असून, त्याची अधिकृत शासकीय अधिसूचना राज्य शासनाच्या असाधारण राजपत्रात एक-दोन दिवसांत प्रसिद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासूनच्या शहरवासीयांच्या हद्दवाढीच्या मागणीला पूर्णविराम देत राज्य सरकारने अखेर कोल्हापूर शहर आणि आसपासच्या ४२ गावांच्या संतुलित विकासासाठी ‘कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणा’ची स्थापना केली. या संदर्भातील अधिसूचनेवरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली असून, त्याची अधिकृत शासकीय अधिसूचना राज्य शासनाच्या असाधारण राजपत्रात एक-दोन दिवसांत प्रसिद्ध होईल. प्राधिकरणाबाबतची अधिसूचना बुधवारी राज्य सरकारचे सहसचिव श्री. द. लांडगे यांनी जारी केली.‘कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण’ स्थापन करण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हद्दवाढीच्या प्रश्नावरून शहर आणि ग्रामीण जनताअसा निर्माण झालेला वाद संपुष्टात आला असून, कोल्हापूर शहर आणि त्याच्या परिसरातील ४२ गावांचा संतुलित तसेच नियंत्रित विकास होण्याचा मार्गहीमोकळा झाला आहे. विशेष म्हणजे प्राधिकरणातून शहरालगतच्या शिरोली व गोकुळ शिरगाव या दोन औद्योगिक वसाहती तसेच वडगाव व कागल या नगरपालिका वगळण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे क्षेत्र विकास प्राधिकरण यापूर्वी पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण भागासाठी स्थापन झाले असून, त्याचे परिणामही चांगले दिसून येत आहेत.कोल्हापूर शहरातील सर्वपक्षीय कृती समितीने हद्दवाढ मागताना शहराला लागून असलेली १८ गावे आणि दोन औद्योगिक वसाहतींची मागणी केली होती. त्यातून मोठे आंदोलन उभे राहिले होते. तथापि, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुंबई येथे दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढीऐवजी हा प्राधिकरणाचा विषय समोर ठेवला होता. तो अखेर मान्य झाला.पालकमंत्री पाटील यांच्या सूचनेप्रमाणे प्राधिकरणात मात्र ४२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे १८ गावांव्यतिरिक्त ज्या २४ गावांचा नव्याने प्राधिकारणात समावेश झाला आहे, त्या गावांतील ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता घेतला जाणार निर्णय अन्यायकारक होईल, अशी भावना या गावांतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.या गावांचा होईल समावेशनव्याने अस्तित्वात आलेल्या कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणात ४२ गावांचा समावेश आहे. त्यामध्ये शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी, चिखली, आंबेवाडी, रजपूतवाडी, वडणगे, शिये, टोप, कासारवाडी, संभापूर, नागाव, शिरोली, वळिवडे, गांधीनगरसहित चिंचवाड, मुडशिंगी (न्यू वाडदेसहित) सरनोबतवाडी, तामगाव, नेर्ली, गोकुळ शिरगाव, कणेरी, कंदलगाव, पाचगाव, निगवे दुमाला, भुयेवाडी, कणेरीवाडी, मोरेवाडी, सादळे-मादळे, जठारवाडी, पाडळी खुर्द, वाडीपीर, वाशी, नंदवाळ, गिरगाव, कोगील खुर्द, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबे तर्फ ठाणे, उचगाव यांचा समावेश आहे. मात्र, यामधून कागल, वडगाव वगळण्यात आले आहे.ं२४ गावांतील ग्रामस्थांची होणार बैठक : चंद्रदीप नरकेदरम्यान, ग्रामपंचायतींचे उत्पन्नाचे मार्ग असलेले घरफाळा वसुली, पाणीपट्टी वसुली, चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळणारा निधी, तसेच शासनाकडून येणारा निधी याला कोणतीही बाधा येणार नसेल.२ तसेच त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहणार असतील आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी मिळणार असेल तर प्राधिकरणाचा निर्णय स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.३ तथापि, अचानक ज्या २४ गावांचा समावेश प्राधिकरणात करण्यात आला आहे, त्या गावांतील ग्रामस्थांशी आधी चर्चा करूनच पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.