शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

कोल्हापूरसह चार जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 11:41 IST

Agriculture Sector kolhapur-कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी किसान आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देकोल्हापूरसह चार जिल्ह्यांसाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन कराप्रफुल्ल कदम यांची उपमुख्यमंत्री, कृषी मंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी विद्यापीठाची स्थापना करावी, अशी मागणी किसान आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत सध्या अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक या दहा जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या एकूण जमिनींपैकी तब्बल ३७.५ टक्के क्षेत्राचा म्हणजे ११६.१२ लाख हेक्टर एवढ्या मोठ्या जमिनीचा समावेश होतो.

महाराष्ट्रातील एकूण नऊ कृषी हवामान विभागापैकी चार कृषी हवामान विभागांत विद्यापीठाचे क्षेत्र व्यापले आहे. पन्नास वर्षांपूर्वी स्थापन झालेले हे विद्यापीठ प्रचंड विस्तार आणि भौगोलिक सलगतेअभावी आपल्या अधिपत्याखालील क्षेत्राला न्याय देऊ शकत नाही. यासाठी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी एक स्वतंत्र राजर्षी छत्रपती शाहू महाराज आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करावे.

या विद्यापीठाच्या स्थापनेसाठी कृती समिती स्थापन केली असून, पश्चिम महाराष्ट्रासोबतच उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि खासदार यांचाही पाठिंबा या कृषी विद्यापीठासाठी घेणार असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले.सांगोला, पंढरपूर विद्यापीठासाठी योग्य तालुकेचार जिल्ह्यांची सोय व उपलब्ध जागा पाहता, सांगोला किंवा पंढरपूर तालुके हे मध्यवर्ती असल्याने येथे स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास राहुरी विद्यापीठाचा थेट फायदा नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांना होऊ शकतो. येथे आदिवासींची संख्या अधिक असून, या भागात पारंपरिक शेती करणारा मोठा समुदाय आहे. नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम आखून आधुनिक शेतीच्या प्रवाहात वेगाने आणता येईल, असेही कदम यांनी सरकारला पटवून दिले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रcollegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर