शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
3
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
4
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
5
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
6
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
7
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
8
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
9
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
10
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
11
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
12
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
13
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
14
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
15
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
16
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
17
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
18
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
19
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
20
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?

कोल्हापूरसाठी संपूर्ण टोलमुक्ती हीच भूमिका : साळोखे

By admin | Updated: June 1, 2015 00:51 IST

संपूर्ण टोलमुक्ती हाच कोल्हापूरचा निर्धार आहे. त्यामुळे ‘एमएच ०९’ची अधिसूचना सरकारने काढली नाही.

कोल्हापूर : कोल्हापूर संपूर्ण टोलमुक्त व आय.आर.बी. कंपनीला येथून हटविणे हीच शेवटपर्यंत जनतेची भूमिका असल्याचे कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी रविवारी ‘लोकमत’ला बोलताना सांगितले.साळोखे म्हणाले, कोल्हापुरात गतआठवड्यात भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, एमएच ०९ पासिंगची वाहने वगळण्याबाबत आम्हीच अधिसूचना काढू नका, असे सांगितले होते. संपूर्ण टोलमुक्ती हाच कोल्हापूरचा निर्धार आहे. त्यामुळे ‘एमएच ०९’ची अधिसूचना सरकारने काढली नाही. राज्य सरकारने नेमलेल्या फेरमूल्यांकन समितीचे अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. सुमारे २० जूनपर्यंत फेरमूल्यांकन समिती राज्य शासनाला आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतर फडणवीस सरकार यावर निर्णय घेईल. त्याचबरोबर पूर्वी कोल्हापुरात झालेल्या रस्त्यांचे मूल्यांकन हे मंत्रालयात बसून झाले होते; पण, सध्याच्या फेरमूल्यांकन समितीमध्ये असलेल्या राज्य रस्ते विकास महामंडळ, कोल्हापूर महापालिका व टोलविरोधी कृती समितीतील सदस्यांनी पारदर्शकपणे व प्रत्यक्ष सर्व्हे केला आहे. त्यामुळे हा अहवाल सकारात्मक असेल. ही समिती जून महिन्यात सरकारला अहवाल देईल. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे यातून निर्णय घेऊन कोल्हापूर संपूर्ण टोलमुक्त करणार आहेत.दरम्यान, टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला फडणवीस यांनी कोल्हापुरात भाजप राज्यस्तरीय बैठकीवेळी ‘कोल्हापूरला संपूर्ण टोलमुक्ती केली जाईल,’ असे आश्वासन दिले होते. (प्रतिनिधी)