शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडणी कामगार आॅगस्टमध्ये लढ्याचे रणशिंग फुंकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 06:38 IST

राज्य सरकारकडून आश्वासने आणि पोकळ घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडलेले नसल्यामुळे राज्यभरातील ऊसतोडणी-ओढणी कामगारांमध्ये कमालीची नाराजी आहे.

कोल्हापूर : राज्य सरकारकडून आश्वासने आणि पोकळ घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडलेले नसल्यामुळे राज्यभरातील ऊसतोडणी-ओढणी कामगारांमध्ये कमालीची नाराजी आहे. आगामी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधावे यासाठी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात परळी वैजनाथ येथून लढ्याचे रणशिंग फुंकले जाणार आहे. कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसह मजुरीवाढीच्या नव्या कराराची मागणी नव्याने करण्यात येणार आहे.ऊसतोडणी कामगार संघटनांच्या पुढील लढ्याची दिशा ठरविण्यासाठी शनिवारी सकाळी कोल्हापुरात बैठक झाली. संघटनेचे राज्याध्यक्ष डी. एम. कराड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्याचे सरचिटणीस प्रा. आबासाहेब चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीत बोलताना कराड म्हणाले, ऊसतोडणी कामगारांची विद्यमान राज्य सरकारने फसवणूकच केली आहे. कल्याणकारी महामंडळ स्थापन करतो, अशी घोषणा करून सत्तेवर आलेल्या या सरकारने निव्वळ घोषणा करण्यापलीकडे काही केलेले नाही. मंडळासाठी परळी वैजनाथ येथे कार्यालय स्थापन केल्याचे सांगितले जाते; पण गेले वर्षभर एकाही मजुराची नोंदणी झाली नाही अथवा त्यांना कुठल्याही सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळालेला नाही. मजुरांची ही घोर फसवणूक आहे. याशिवाय स्वत: पंकजा मुंडे व जयंत पाटील यांनी मजुरीवाढीच्या संदर्भातही तीन वर्षांचा करार पाच वर्षांवर नेऊन मजुरांचे एक वर्षाचे नुकसान केले. हे करताना ऊसतोडणी कामगार संघटनेला साधे विश्वासातही घेतले नाही.या सरकारने मजुरांच्या सामाजिक सुरक्षेला महत्त्व दिलेले नाही. साखर कारखानदारांचा मात्र फायदा झाला आहे. वाहतूकदारांचीही फसवणूक वाढत असताना याला कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून वेसण घालता आली असती; पण शासनाने ते होऊ दिलेले नाही. फसवणूक करणाऱ्यांना एकप्रकारे अभयच दिले आहे. त्यामुळेच आता ऊसतोडणी-ओढणी मजुरांचे प्राबल्य असणाºया परळी वैैजनाथमधून लढ्याचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय घेतला आहे, असे कराड यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती