शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षा मे महिन्यात घ्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:05 IST

अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या दरवर्षी मे महिन्याच्या दरम्यान होणाऱ्या परीक्षा एप्रिल मध्ये घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी विद्यापीठाने मे महिन्यात परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी युवा सेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद श्ािंदे यांना दिले.

ठळक मुद्देअभियांत्रिकी विभागाच्या परीक्षा मे महिन्यात घ्याव्यातयुवासेनेची मागणी; कुलगुरुंना निवेदन

कोल्हापूर : अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या दरवर्षी मे महिन्याच्या दरम्यान होणाऱ्या परीक्षा एप्रिल मध्ये घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी विद्यापीठाने मे महिन्यात परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी युवा सेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद श्ािंदे यांना दिले.यावर्षी बॅकलॉग आणि सेमिस्टरचे पेपर एप्रिलमध्ये एकत्रितपणे सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण पडला आहे. काही विद्यार्थ्यांचे बॅकलॉग व चालू सेमिस्टरचे विषयांचे पेपर एकाच दिवशी होणार आहेत, त्यामुळे त्या विद्यार्थ्यास एका कोणत्या तरी पेपरला मुकावे लागणार आहे.

परीक्षांना काहीच दिवस शिल्लक राहिले असून, हा वेळ महाविद्यालयातील सबमिशन, चाचणी परीक्षा, प्रोजेक्ट, सेमिनार तयार करणे, तोंडी परीक्षा देणे यामध्ये जाणार आहे. त्यामुळे अभ्यासासाठी कमी अवधी मिळणार आहे. काही विद्यार्थ्यांचे रि- चेकिंगचे रिझल्ट लागलेले नाहीत. परीक्षा पूर्ववत नियोजित वेळेत मे महिन्यात घेण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

त्यावर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या परीक्षेचा कालावधी पूर्ववत करण्याबाबत विद्यापीठ प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले. यावेळी युवासेनेचे ऋतुराज क्षीरसागर, योगेश चौगुले, अविनाश कामते, चेतन शिंदे, विश्वदीप साळोखे, प्रशांत जगदाळे, शैलेश साळोखे, आदी उपस्थित होते.

निवडणुकीच्या कालावधीत पेपर नकोलोकसभा निवडणुकीच्या कालावधीत अभियांत्रिकी विभागाचे पेपर घेण्यात येवू नयेत, अशी मागणी स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी विद्यापीठ प्रशासनाला शुक्रवारी दिले.

अभियांत्रिकीच्या ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्रमूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत.त्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. या विद्यार्थ्यांचे पेपर सलग घेण्यात येवू नयेत. त्यात त्यांना अवधी देण्यात यावा. या परीक्षेचा कालावधी वाढविण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन युवासेनेचे जिल्हा युवाअधिकारी मंजीत माने यांनी कुलगुरुंना गुरुवारी दिले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर