शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षा मे महिन्यात घ्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:05 IST

अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या दरवर्षी मे महिन्याच्या दरम्यान होणाऱ्या परीक्षा एप्रिल मध्ये घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी विद्यापीठाने मे महिन्यात परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी युवा सेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद श्ािंदे यांना दिले.

ठळक मुद्देअभियांत्रिकी विभागाच्या परीक्षा मे महिन्यात घ्याव्यातयुवासेनेची मागणी; कुलगुरुंना निवेदन

कोल्हापूर : अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या दरवर्षी मे महिन्याच्या दरम्यान होणाऱ्या परीक्षा एप्रिल मध्ये घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी विद्यापीठाने मे महिन्यात परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी युवा सेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद श्ािंदे यांना दिले.यावर्षी बॅकलॉग आणि सेमिस्टरचे पेपर एप्रिलमध्ये एकत्रितपणे सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण पडला आहे. काही विद्यार्थ्यांचे बॅकलॉग व चालू सेमिस्टरचे विषयांचे पेपर एकाच दिवशी होणार आहेत, त्यामुळे त्या विद्यार्थ्यास एका कोणत्या तरी पेपरला मुकावे लागणार आहे.

परीक्षांना काहीच दिवस शिल्लक राहिले असून, हा वेळ महाविद्यालयातील सबमिशन, चाचणी परीक्षा, प्रोजेक्ट, सेमिनार तयार करणे, तोंडी परीक्षा देणे यामध्ये जाणार आहे. त्यामुळे अभ्यासासाठी कमी अवधी मिळणार आहे. काही विद्यार्थ्यांचे रि- चेकिंगचे रिझल्ट लागलेले नाहीत. परीक्षा पूर्ववत नियोजित वेळेत मे महिन्यात घेण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

त्यावर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या परीक्षेचा कालावधी पूर्ववत करण्याबाबत विद्यापीठ प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले. यावेळी युवासेनेचे ऋतुराज क्षीरसागर, योगेश चौगुले, अविनाश कामते, चेतन शिंदे, विश्वदीप साळोखे, प्रशांत जगदाळे, शैलेश साळोखे, आदी उपस्थित होते.

निवडणुकीच्या कालावधीत पेपर नकोलोकसभा निवडणुकीच्या कालावधीत अभियांत्रिकी विभागाचे पेपर घेण्यात येवू नयेत, अशी मागणी स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी विद्यापीठ प्रशासनाला शुक्रवारी दिले.

अभियांत्रिकीच्या ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्रमूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत.त्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. या विद्यार्थ्यांचे पेपर सलग घेण्यात येवू नयेत. त्यात त्यांना अवधी देण्यात यावा. या परीक्षेचा कालावधी वाढविण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन युवासेनेचे जिल्हा युवाअधिकारी मंजीत माने यांनी कुलगुरुंना गुरुवारी दिले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर