शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसची प्रवाशांना धडक; अनेकजण जखमी
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी विभागाच्या परीक्षा मे महिन्यात घ्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:05 IST

अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या दरवर्षी मे महिन्याच्या दरम्यान होणाऱ्या परीक्षा एप्रिल मध्ये घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी विद्यापीठाने मे महिन्यात परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी युवा सेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद श्ािंदे यांना दिले.

ठळक मुद्देअभियांत्रिकी विभागाच्या परीक्षा मे महिन्यात घ्याव्यातयुवासेनेची मागणी; कुलगुरुंना निवेदन

कोल्हापूर : अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या दरवर्षी मे महिन्याच्या दरम्यान होणाऱ्या परीक्षा एप्रिल मध्ये घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी विद्यापीठाने मे महिन्यात परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी युवा सेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केली. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद श्ािंदे यांना दिले.यावर्षी बॅकलॉग आणि सेमिस्टरचे पेपर एप्रिलमध्ये एकत्रितपणे सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण पडला आहे. काही विद्यार्थ्यांचे बॅकलॉग व चालू सेमिस्टरचे विषयांचे पेपर एकाच दिवशी होणार आहेत, त्यामुळे त्या विद्यार्थ्यास एका कोणत्या तरी पेपरला मुकावे लागणार आहे.

परीक्षांना काहीच दिवस शिल्लक राहिले असून, हा वेळ महाविद्यालयातील सबमिशन, चाचणी परीक्षा, प्रोजेक्ट, सेमिनार तयार करणे, तोंडी परीक्षा देणे यामध्ये जाणार आहे. त्यामुळे अभ्यासासाठी कमी अवधी मिळणार आहे. काही विद्यार्थ्यांचे रि- चेकिंगचे रिझल्ट लागलेले नाहीत. परीक्षा पूर्ववत नियोजित वेळेत मे महिन्यात घेण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

त्यावर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी या परीक्षेचा कालावधी पूर्ववत करण्याबाबत विद्यापीठ प्रशासन सकारात्मक भूमिका घेईल, असे आश्वासन दिले. यावेळी युवासेनेचे ऋतुराज क्षीरसागर, योगेश चौगुले, अविनाश कामते, चेतन शिंदे, विश्वदीप साळोखे, प्रशांत जगदाळे, शैलेश साळोखे, आदी उपस्थित होते.

निवडणुकीच्या कालावधीत पेपर नकोलोकसभा निवडणुकीच्या कालावधीत अभियांत्रिकी विभागाचे पेपर घेण्यात येवू नयेत, अशी मागणी स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी विद्यापीठ प्रशासनाला शुक्रवारी दिले.

अभियांत्रिकीच्या ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्रमूल्यांकनासाठी अर्ज केले आहेत.त्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. या विद्यार्थ्यांचे पेपर सलग घेण्यात येवू नयेत. त्यात त्यांना अवधी देण्यात यावा. या परीक्षेचा कालावधी वाढविण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन युवासेनेचे जिल्हा युवाअधिकारी मंजीत माने यांनी कुलगुरुंना गुरुवारी दिले. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर