शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘माझं कोल्हापूर, माझा रोजगार’ माध्यमातून ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 16:02 IST

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एक लाख परप्रांतीय मजूर आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे स्थानिक तरुणांना लाखो नोकऱ्यांची दारे खुली झाली आहेत. ज्या उद्योगक्षेत्राला कुशल, अकुशल कामगारांची गरज आहे, त्याकरिता उद्योजकांकडून मागणी आणि असे युवक-युवती तयार करणाऱ्या आौद्योगिक

ठळक मुद्देपालकमंत्री पाटील यांचा पुढाकार । व्हिडिओ कॉन्फरन्सतर्फे ६५ उद्योजकांशी संवाद

कोल्हापूर : उद्योजकांना कुशल कामगारांची, तर अनेकांना हातचा रोजगार गेल्यामुळे नोकरीची गरज आहे. या मरगळलेल्या उद्योगविश्वाला बूस्टर डोस देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांंनी ‘माझं कोल्हापूर, माझा रोजगार’ ही नवी संकल्पना शनिवारी मांडली. तिची माहिती देण्यासाठी डी. वाय. पाटील मेडिकल काॅलेजमध्ये त्यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे ६५ नामवंत उद्योजकांशी संवाद साधला व या उपक्रमाचा श्रीगणेशा केला. स्थानिक रोजगार स्थानिक तरुणांनाच मिळाला पाहिजे, या भूमिकेतून हे प्रयत्न सुरू झाले असून, त्यास उद्योजकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एक लाख परप्रांतीय मजूर आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे स्थानिक तरुणांना लाखो नोकऱ्यांची दारे खुली झाली आहेत. ज्या उद्योगक्षेत्राला कुशल, अकुशल कामगारांची गरज आहे, त्याकरिता उद्योजकांकडून मागणी आणि असे युवक-युवती तयार करणाऱ्या आौद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्यामध्ये समन्वय व्हावा, यासाठीच ही चर्चा आयोजित केली आहे.

या चर्चेत नामवंत उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, यंत्रमाग व हॉटेल व्यावसायिक, आदींनी सहभाग घेतला. यावेळी उद्योजकांच्या शंकांचे निरसन स्वत: पालकमंत्री पाटील, साहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव, एम.आय.डी.सी.चे विभागीय अधिकारी धनंजय इंगळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक एस. डी. शेळके, नाबार्डचे साहाय्यक सरव्यवस्थापक नंदू नाईक , जिल्हा व्होकेशनल एज्युकेशन प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी सोनवणे, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी केले.

 

जॉब फेअर घेणारउद्योजकांच्या मागणीप्रमाणे कोल्हापुरातील स्थानिक युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता लॉकडाऊन संपल्यानंतर कोल्हापूरसह इचलकरंजी व महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या विविध वसाहतींमध्ये जॉब फेअर घेतला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी Carrier@missionrojgar.com यावर नोंदणी करावी, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.

 

कोल्हापूरच्या विकासाला बळ देणारे हे पाऊल आहे. त्यासाठी डी. वाय. पाटील समूह व शिक्षण संस्थेची लागेल ती सर्व मदत देण्यास आम्ही तयार आहोत. कोरोनाने निर्माण केलेले हे संकट आहे. त्यातून आपण संधी निर्माण करू आणि कोल्हापूरला पुढे नेऊ. त्यासाठी तुम्ही सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा.- ऋतुराज पाटील, आमदार

 

परप्रांतीय कामगार सोडून गेल्यामुळे स्थानिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याकरिता स्थानिकांनी नेटाने काम करावे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनीही कुशल मनुष्यबळ तयार करावे.- चंद्रकांत जाधव, आमदार

 

कामगारांना आम्ही प्रशिक्षण देऊ शकतो. ग्रामीण भागातील कामगारांना संधी देऊ. सेंट्रिंंग कामगार, प्लंबर यांनाप्रशिक्षण देऊन कामावर घेऊ. त्यासाठी क्रिडाईतर्फे जाहिरात देण्यात येईल.- राजीव परीख, अध्यक्ष क्रिडाई, महाराष्ट्र

 

आम्ही कौशल्य विकास केंद्र स्थापण्यासाठी प्रयत्नशील आहोत.त्यासाठी त्वरित परवानगी द्यावी.- गोरख माळी, अध्यक्ष, कागल पंचतारांकितऔद्योगिक वसाहत

 

जिल्ह्यात एक लाख कामगारांची गरज भासणार आहे. डीकेटीई संस्थेत ४५० लोकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार तीन-चार महिन्यांत १० हजार कामगार तयार होतील.- सतीश कोष्टी, अध्यक्ष, पॉवरलूम विव्हर्स सोसायटी

कापड बनविण्यात कामगारांचा मोठा तुटवडा भासतो. पुढील तीन वर्षांत अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे स्थानिक युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार करून दिला पाहिजे.- शामसुंदर मर्दा, ज्येष्ठ यंत्रमाग व्यावसायिक

 

प्रशिक्षणासाठी शासनाने विद्यावेतन द्यावे; त्यामुळे इंडस्ट्रीज सुरू होतील. इचलकरंजी इंजिनिअरिंग असोसिएशनर्फे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे.- सतीश पाटील, अध्यक्ष, इचलकरंजी एअरजेट असोसिएशन

 

स्थलांतरित कामगार पुन्हा येणार नाहीत. त्यामुळे स्थानिकांना अंग मोडून काम करायची सवय लावावी. नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचा लाभ घ्यावा.-किरण पाटील, ज्येष्ठ उद्योजक

 

बाहेरून येणारे लोक फक्त काम करतात. येथील भूमिपुत्र हे कायद्याचा वापर करून कारखानदारांना वेठीस धरतात, यावर मार्ग काढावा. - प्रकाश गौड, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन

 

टॅग्स :jobनोकरीMIDCएमआयडीसीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील