शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

‘भाजप’च्या सत्तेची अंत्ययात्रा सुरू : मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:40 IST

कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून, ही परिवर्तन यात्रा म्हणजे भाजपच्या ...

कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून, ही परिवर्तन यात्रा म्हणजे भाजपच्या सत्तेची अंत्ययात्रा सुरू झाल्याची घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.थापाड्या सरकारला लोक कंटाळले असून, त्यांनी राज्यात व देशातही परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित पवार यांनी सभेत सांगितले.राष्टÑवादीच्या परिवर्तन यात्रेत सोमवारी सायंकाळी येथील मुस्कान लॉन येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राष्टÑवादीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.मुंडे म्हणाले, पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी जरा महाराष्टÑाच्या मंत्रिमंडळात डोकावून पाहावे. आमच्यावर टीका करणाºया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी तर महापुरुषांच्या फोटोत घोटाळा केला. सरकारी प्रेसमध्ये पूर्वी ५२ रुपयांना मिळणारे महापुरुषांचे फोटो १७०० रुपयांना माथी मारले. त्यांच्यासह १६ मंत्र्यांनी ९० हजार कोटींचा घोटाळा केला. माझा आरोप खोटा असला तर मुख्यमंत्र्यांनी खुशाल मला चौकात फाशी द्यावी; पण हे सरकार मंत्र्यांना पाठीशी घालत असून, १५ वर्षांच्या नवसाने भाजपला मिळालेले सत्तेचे मूल घोटाळ्यामुळे २०१९ मध्ये घरी जाणार आहे. मोदी लाटेत कोल्हापूरकरांनी धनंजय महाडिक यांना खासदार केले. आता कोणतीच लाट नसल्याने ‘बस एकच निर्धार पुन्हा धनंजय महाडिकच खासदार’ असे आवाहनही मुंडे यांनी केले.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, धनंजय महाडिक यांचे लोकसभेतील कामकाज उत्तम असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. हे जरी असले तरी पक्षातील छोट्यातील छोट्या कार्यकर्त्याची गरजही पक्षाला आहे. हलक्या कानाचे राहू नका. कॉँग्रेसलाही सोबत घेऊन पुढे जायचे असून, कोणालाही बोट ठेवायला जागा नको.खासदार महाडिक म्हणाले,‘भाजप सरकार केवळ घोषणाबाज सरकार असून, देशात २५ हजारांहून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या. देशात कोणताही घटक समाधानी नाही. कोल्हापूरची विमान सेवा, रेल्वे, पासपोर्टसह अनेक प्रश्न मार्गी लावलेच, त्याशिवाय संसदेत प्रभावी कामगिरी केल्यानेच तीन वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मान झाला.’यावेळी आर. के. पोवार यांनी स्वागत केले. आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, महापौर सरिता मोरे, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, मानसिंगराव गायकवाड, व्ही. बी. पाटील, सारंग पाटील, अशोकराव जांभळे, संग्राम कोते-पाटील, अनिल साळोखे, राजेश लाटकर, आदिल फरास, जहिदा मुजावर, संगीता खाडे, रोहित पाटील, आदी उपस्थित होते.मुले कॉँग्रेसची, बारसे भाजपकडूनपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना मुंडे म्हणाले, दोन्ही कॉँग्रेसमधील लोक घ्यायचे, त्यांच्यावर पैसा लावून विजय मिळवायचा आणि ‘कमळ’ फुलल्याचे सांगायचे. हे म्हणजे मुले दोन्ही कॉँग्रेसची आणि बारसे भाजपकडून, अशी अवस्था आहे.