शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब

By admin | Updated: July 27, 2016 00:55 IST

मुख्यमंत्र्यांची झाली स्वाक्षरी : अधिसूचना आज किंवा उद्या लागू होणार; ४४ वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला

भारत चव्हाण -मुंबई --कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या अधिसूचनेवर मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा गेली ४४ वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. ही अधिसूचना आज, बुधवारी किंवा उद्या, गुरुवारी लागू करण्यात येईल, असे मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. हद्दवाढीचा निर्णय झाल्यानंतर प्रस्तावित गावांतून कितपत प्रतिकूल प्रतिक्रिया उमटतील, याचा अंदाज सरकार घेत असल्याने अधिसूचना लागू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला; अन्यथा ही अधिसूचना मंगळवारीच लागू करण्यात येणार होती. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार सुरुवातीपासून अनुकूल आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही, अशी महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भूमिका आहे. राज्य मंत्रिमंडळात चंद्रकांतदादा पाटील यांना दोन नंबरचे स्थान असल्याने दादांनीच ठरवल्यावर हद्दवाढीचा निर्णय घेण्यास सरकारच्या पातळीवर कोणतीही अडचण नाही. परंतु, हा निर्णय आता इतक्या तातडीने घेण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांची मुदत मार्च २०१७ मध्ये संपत आहे. त्यांची निवडणूकविषयक कामाची प्रक्रिया १ सप्टेंबरला सुरू होत आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो १ सप्टेंबरपूर्वीच शासनाने घ्यावा, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाने शासनाला दिले आहेत. १ सप्टेंबरपूर्वी हद्दवाढीचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याची प्रक्रिया किमान महिनाभर आधी सुरू होणे आवश्यक आहे. कारण अधिसूचना लागू केल्यानंतर हरकती आणि सुनावणीसाठी महिनाभराचा किमान कालावधी देणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. या सगळ्या गोष्टींवर विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हद्दवाढीच्या अधिसूचनेवर मंगळवारी सकाळी सही केली आहे. अधिसूचना मंगळवारी लागू होणार हे समजल्यावर हद्दवाढीला विरोध करणारे शिवसेनेचे सर्वश्री आमदार चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर आणि भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन, हद्दवाढीतील प्रस्तावित गावांमध्ये प्रचंड विरोध असून, राज्य शासनाने त्याची दखल न घेतल्यास उद्रेक होऊ शकेल, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. यावर कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ होणे अपरिहार्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. हा निर्णय आता नाही झाला तर भविष्यात अडचणी वाढतील, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. याच चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलिस यंत्रणेमार्फत हद्दवाढ झाल्यास काय पडसाद उमटू शकतात, यासंबंधीची माहिती जाणून घेतली. पोलिस यंत्रणेने, हद्दवाढीत प्रस्तावित १८ गावांमध्ये आज, बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले असून, लोकांत संतप्त प्रतिक्रिया असल्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी लागू होणारी अधिसूचना थांबवली. परंतु, ती दोन दिवसांत लागू होणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.अठरा गावांत आज बंदहद्दवाढीविरोधात आज, बुधवारी १८ गावांत बंद पाळण्यात येणार आहे. शिवाय ठिकठिकाणी ‘रास्ता रोको’ करण्याचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढविरोधी प्रस्तावित गावांमधील सर्वपक्षीय कृती समितीने मंगळवारी घेतला. तसेच हद्दवाढ कायमस्वरूपी रद्द करण्याचा अहवाल शासनाला सादर करा, या मागणीचेनिवेदन समितीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना दिले. -वृत्त/३अशी आहेत प्रस्तावित गावे...१) सरनोबतवाडी २) गडमुडशिंगी ३) गोकुळ शिरगाव ४) नागाव ५) पाचगाव ६) मोरेवाडी ७) उजळाईवाडी ८) नवे बालिंगे ९) कळंबे तर्फ ठाणे १०) उचगाव ११) शिरोली १२) वाडीपीर १३) वडणगे १४) शिये १५) शिंगणापूर १६) नागदेववाडी १७) वळिवडे १८) गांधीनगर. फक्त वाढीव क्षेत्रातच निवडणुकाकोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्यास वाढीव क्षेत्रापुरती राज्य शासनाच्या सूचनेनुसार निवडणूक घेण्यात येईल, तसेच मूलभूत सुविधांसाठी विशेष निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.हद्दवाढ झाल्यानंतर संपूर्ण शहरात महानगरपालिकेची पुन्हा निवडणूक होईल याबाबत शहरात चर्चा सुरू आहे; पण आयुक्तांनी दिलेल्या माहितीमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्य शासनाकडून हद्दवाढीबाबत अधिसूचना काढण्यात येणार असल्याच्या वृत्तामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभर या हद्दवाढीच्या सूचनेबाबत शहरवासीयांना उत्सुकता लागून राहिली होती. हद्दवाढ झाल्यास (पान १२ वर)