शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

अखेर तिची १९ दिवसांची झुंज अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोगनोळी : शेतात मजुरी करताना सापाने दंश केल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या हंचिनाळ तालुका निपाणी येथील महिलेने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोगनोळी : शेतात मजुरी करताना सापाने दंश केल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या हंचिनाळ तालुका निपाणी येथील महिलेने तब्बल १९ दिवस मृत्यूशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली.

हंचिनाळ तालुका निपाणी येथील सौ. रूपाली अमृत ढाले (वय ३२) या गावालगत असणाऱ्या पाटील मळ्यात मोलमजुरी करण्यासाठी गेल्या होत्या. त्याठिकाणी उसाचा पाला काढत असताना त्यांच्या पायाला सापाने दंश केला. त्यावेळी त्यांनी आरडाओरड करताच सोबत असणाऱ्या महिलांनी जाऊन पाहिले. त्यावेळी त्यांना साप निघून जाताना दिसला. त्यानंतर त्यांना ताबडतोब बेनाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर निपाणी येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये व त्यानंतर कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाकडे नेण्यात आले तेथेही उपचारांची सोय उपलब्ध न झाल्याने त्यांना कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये तब्बल १९ दिवस उपचार सुरू होते. यादरम्यान त्यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

रुपाली यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, दीर, जाऊ, सासू असा परिवार आहे. घरची परिस्थिती हलाखीची असणाऱ्या रुपाली व त्यांचे पती दोघेही मोलमजुरी करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. रुग्णालयाचा आर्थिक खर्च होऊनही रुग्ण दगावल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे हंचिनाळ व परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.