शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

समाजातील अनिष्ट रूढी संपवा : जिल्हा न्यायाधीश र. ना. बावनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 00:49 IST

प्रा. मिलिंद दांडेकर यांनी, ज्या तृतीयपंथींना आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करावयाचे आहे, त्यांच्यासाठी नाईट कॉलेजमध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.

ठळक मुद्देतृतीयपंथीयांसाठी विधि साक्षरता शिबिर

इचलकरंजी : समाजात प्रवाहित होण्यासाठी तुमच्यात परिवर्तन आवश्यक आहे. ‘पायगुण’ हा शब्द बाजूला करून ‘कर्तृत्व’ हा शब्द अंगीकृत करा. अनिष्ट रूढी संपवून टाका. त्यानंतर समाज नक्कीच तुम्हाला पाठबळ देईल. त्यातून मिळालेल्या कामात विश्वास निर्माण करा. त्यामुळे तुमचे प्रश्न सुटतील, असा विश्वास जिल्हा न्यायाधीश र. ना. बावनकर यांनी तृतीयपंथींना दिला.

तृतीयपंथीयांना समाजात प्रवाहित करून त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आयोजित विधि साक्षरता शिबिरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

हातकणंगले तालुका विधि सेवा समिती इचलकरंजी, कन्या महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना व रोटरी क्लब आॅफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. बावनकर म्हणाले, तुम्हाला समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी या समाजातील अनेक संस्था, व्यक्तींनी पुढाकार घेऊन काम दिले आहे. त्या कामात विश्वासार्हता व प्रामाणिकपणा जोपासून संबंधितांना न्याय द्या. मिळालेले काम टिकवून ठेवा, असे आवाहन केले. यावेळी दिवाणी न्यायाधीश ए. पी. कोकरे व सरदिवाणी न्यायाधीश एस. ए. खलाने यांनी सर्वोच्च न्यायालयाने तृतीयपंथीयांसाठी लागू केलेल्या कायद्यांबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, उद्योगपती मदन कारंडे, डॉ. प्रशांत कांबळे,आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. मिलिंद दांडेकर यांनी, ज्या तृतीयपंथींना आपले अर्धवट शिक्षण पूर्ण करावयाचे आहे, त्यांच्यासाठी नाईट कॉलेजमध्ये शिक्षण उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.

अनेकांनी केली काम देण्याची घोषणाराज्यात सर्वप्रथम वस्त्रोद्योगाने या उपक्रमाला तत्काळ प्रतिसाद देत कायदेविषयक मार्गदर्शनासह तृतीयपंथींना काम मिळवून देण्यासाठी अनेक संस्था, संघटना पुढे आल्या. त्यांनी आपापल्यापरीने कितीजणांना काम देणार, याबाबत घोषणा केली. त्यामुळे नक्कीच सामाजिक बदल घडेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.

मला व्यक्त व्हायचंयदररोज तीच दुकाने, तोच बाजार, तीच टाळी आणि तीच दहाची नोट याचा कंटाळा आला आहे. आम्हालाही सन्मानाने जगायचे आहे. नशिबाला दोष देत बसण्यापेक्षा समाजात मिसळून राहायचे आहे, असे भावनिक मनोगत प्रिया ऊर्फ प्रशांत सवाईराम यांनी व्यक्त केले, तर नगरपालिकेने तृतीयपंथीयांचा२५ लाख रुपयांचा निधी तांत्रिक बाबी पुढे करत देण्यास टाळाटाळ करण्याऐवजी त्यातून तृतीयपंथीयांना उद्योग, व्यवसाय व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन सकीना यांनी केले. ‘मला व्यक्त व्हायचंय’ या टॅगलाईनखाली तृतीयपंथी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालय