शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टिका, स्पष्टच बोलले
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
5
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
6
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
7
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
8
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
9
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
10
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
11
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
12
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
13
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
14
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
15
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
16
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
17
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
18
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
19
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
20
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...

पंचतारांकितमधील गुंडगिरी संपवा

By admin | Updated: January 6, 2017 00:15 IST

उद्योजकांची मागणी : पोलिस ठाण्यासाठी समरजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली नांगरे-पाटील यांना निवेदन

कोल्हापूर : कागल - हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सध्या सुरू असलेली गुंडगिरी, दहशत आणि गुन्हेगारी संपवा. येथे स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करावे, अशी मागणी ‘शाहू ग्रुप’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखालील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ कागल-हातकणंगले (मॅक) या संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली.घाटगे म्हणाले, ‘या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगवाढीला मोठी संधी आहे. मात्र, येथे वाटमारी, लूटमार, चोरी अशी गुन्हेगारी वाढल्याने सुरक्षा धोक्यात आहे. या वसाहतीमध्ये येत्या काही वर्षांत मोठ्या कंपन्या येतील. त्यांचे व्यवस्थापन प्रथम सुरक्षिततेची व्यवस्था पाहते. हे लक्षात घेऊन या औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे आवश्यक आहे. ‘मॅक’ चे अध्यक्ष संजय जोशी म्हणाले, ‘१०८९ हेक्टर क्षेत्र असलेल्या या वसाहतीत ४० हजार कामगार आहेत. पैकी दुसऱ्या व तिसऱ्या शिफ्टमध्ये १६ हजार कामगार काम करतात. यातील काही कामगारांना लुटणे, वाटमारीचे प्रकार, तसेच लहान-मोठ्या चोऱ्या होत आहेत. फाळकुटदादांची दहशत, गुंडगिरी यामुळे येथील सुरक्षिततेसाठी येथे स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करावे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाने पोलिस ठाण्यासाठी भूखंड मंजूर केला आहे. त्याचा ताबा पोलिस कार्यालयाने घेतलेला आहे. या पुढील कार्यवाही त्वरित व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या वसाहतीमधील दहशत, गुंडगिरी मोडून काढू, स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करण्याबाबतचा निर्णय प्रत्यक्ष भेट देऊन घेऊ. त्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात सत्यजित पाटील, शंतनू गायकवाड, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)समरजितसिंह : वसाहतीत राजकीय हस्तक्षेप कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये काही कार्यकर्त्यांना नोकरी लावण्यासाठी राजकीय हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे गुणवत्ता व कौशल्य असलेल्या तालुक्यातील अनेक तरुणांना डावलले जाते. धमकी देऊन कंपन्यांचा ‘सीएसआर’ फंडाचा गैरवापर केला जात आहे. अशा स्वरूपातील राजकीय हस्तक्षेपामुळे या औद्योगिक वसाहतीमधील उद्योग विकासाला खीळ बसत असल्याचे ‘शाहू ग्रुप’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.चौकीत पुरेसे पोलिस हवेतगोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याने या औद्योगिक वसाहतीत पोलिस चौकी सुरू केली होती. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ती सध्या बंद अवस्थेत असल्याचे ‘मॅक’चे अध्यक्ष जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू होईपर्यंत या चौकीला पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. लक्ष्मी टेकडी-हुपरी रस्त्यावरील वाहतूक सुरक्षिततेसाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी.पुढील वर्षी ‘शाहू’कडे अधिकाअधिक ऊस सीमाभागातील काही कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस यंदा नेला आहे. त्यावर अध्यक्ष घाटगे म्हणाले, यावर्षी कारखान्याच्या क्षमतेपेक्षा जादा गाळप करू नये, अशी मर्यादा घातली आहे. मात्र, ‘शाहू’ची गाळप क्षमता वाढविणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाअधिक ऊस पुढील वर्षी ‘शाहू’कडे येईल.