शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

पंचतारांकितमधील गुंडगिरी संपवा

By admin | Updated: January 6, 2017 00:15 IST

उद्योजकांची मागणी : पोलिस ठाण्यासाठी समरजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली नांगरे-पाटील यांना निवेदन

कोल्हापूर : कागल - हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सध्या सुरू असलेली गुंडगिरी, दहशत आणि गुन्हेगारी संपवा. येथे स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करावे, अशी मागणी ‘शाहू ग्रुप’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखालील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ कागल-हातकणंगले (मॅक) या संघटनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली.घाटगे म्हणाले, ‘या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगवाढीला मोठी संधी आहे. मात्र, येथे वाटमारी, लूटमार, चोरी अशी गुन्हेगारी वाढल्याने सुरक्षा धोक्यात आहे. या वसाहतीमध्ये येत्या काही वर्षांत मोठ्या कंपन्या येतील. त्यांचे व्यवस्थापन प्रथम सुरक्षिततेची व्यवस्था पाहते. हे लक्षात घेऊन या औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे आवश्यक आहे. ‘मॅक’ चे अध्यक्ष संजय जोशी म्हणाले, ‘१०८९ हेक्टर क्षेत्र असलेल्या या वसाहतीत ४० हजार कामगार आहेत. पैकी दुसऱ्या व तिसऱ्या शिफ्टमध्ये १६ हजार कामगार काम करतात. यातील काही कामगारांना लुटणे, वाटमारीचे प्रकार, तसेच लहान-मोठ्या चोऱ्या होत आहेत. फाळकुटदादांची दहशत, गुंडगिरी यामुळे येथील सुरक्षिततेसाठी येथे स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करावे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाने पोलिस ठाण्यासाठी भूखंड मंजूर केला आहे. त्याचा ताबा पोलिस कार्यालयाने घेतलेला आहे. या पुढील कार्यवाही त्वरित व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी या वसाहतीमधील दहशत, गुंडगिरी मोडून काढू, स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करण्याबाबतचा निर्णय प्रत्यक्ष भेट देऊन घेऊ. त्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात सत्यजित पाटील, शंतनू गायकवाड, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)समरजितसिंह : वसाहतीत राजकीय हस्तक्षेप कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये काही कार्यकर्त्यांना नोकरी लावण्यासाठी राजकीय हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे गुणवत्ता व कौशल्य असलेल्या तालुक्यातील अनेक तरुणांना डावलले जाते. धमकी देऊन कंपन्यांचा ‘सीएसआर’ फंडाचा गैरवापर केला जात आहे. अशा स्वरूपातील राजकीय हस्तक्षेपामुळे या औद्योगिक वसाहतीमधील उद्योग विकासाला खीळ बसत असल्याचे ‘शाहू ग्रुप’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.चौकीत पुरेसे पोलिस हवेतगोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याने या औद्योगिक वसाहतीत पोलिस चौकी सुरू केली होती. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ती सध्या बंद अवस्थेत असल्याचे ‘मॅक’चे अध्यक्ष जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू होईपर्यंत या चौकीला पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. लक्ष्मी टेकडी-हुपरी रस्त्यावरील वाहतूक सुरक्षिततेसाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी.पुढील वर्षी ‘शाहू’कडे अधिकाअधिक ऊस सीमाभागातील काही कारखान्यांनी जिल्ह्यातील ऊस यंदा नेला आहे. त्यावर अध्यक्ष घाटगे म्हणाले, यावर्षी कारखान्याच्या क्षमतेपेक्षा जादा गाळप करू नये, अशी मर्यादा घातली आहे. मात्र, ‘शाहू’ची गाळप क्षमता वाढविणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाअधिक ऊस पुढील वर्षी ‘शाहू’कडे येईल.