शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:23 IST

कोपार्डे : बालिंगा, ता. करवीर येथे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवतीच्या ...

कोपार्डे : बालिंगा, ता. करवीर येथे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवतीच्या संरक्षक भिंती गायब होत आहेत. यामुळे चारही बाजूने जलशुद्धीकरण केंद्राच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.

भोगावती नदीवर ७० वर्षांपूर्वी पंपहाऊस उभारण्यात आले.यासाठी बालिंगा येथे नागदेववाडी येथील

शेतकऱ्यांची २३ एकर जमीन घेऊन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले होते. या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रासाठी विविध उपकरणे बसवण्यात आली. यातून जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध झालेले पाणी चंबूखडी येथील पाण्याच्या टाकीत टाकून जवळपास अर्धे शहर, चार-पाच उपनगरे याचबरोबर शेजारी असणाऱ्या शेकडो कॉलनींची तहान भागवत आहे.

पण या जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. या जलशुद्धीकरण केंद्राला ७० वर्षांपूर्वी बांधलेली दगडी सुरक्षा भिंत होती. पण सध्या ती चारही बाजूने जमीनदोस्त होत आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवती अतिक्रमणाचा विळखा पडू लागला आहे. या शिवाय या संपूूर्ण परिसरात अस्वच्छता निर्माण झाल्याने पाण्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चौकट : सुरक्षा चौकीभाेवती कचऱ्याचे ढीग

कोल्हापूर: गगनबावडा मार्गाकडे पूर्वेला सुरक्षा चौकी आहे. पण तिथे सुरक्षारक्षक नाही. या चौकीभोवती कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या केंद्राजवळ तळीरामांनी आपला अड्डा बनवला आहे. त्यामुळे येथे दिवसाही त्यांचा धिंगाणा सुरु असतो. त्यामुळे कचऱ्याबरोबरच बाटल्यांचा खचही नेहमी पडलेला दिसतो.

फोटो: २३ बालिंगा जलशुध्दीकरण केंद्र

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा भिंत गायब झाली असून काही ठिकाणी अतिक्रमण सुरू झाले आहे.