शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:23 IST

कोपार्डे : बालिंगा, ता. करवीर येथे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवतीच्या ...

कोपार्डे : बालिंगा, ता. करवीर येथे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवतीच्या संरक्षक भिंती गायब होत आहेत. यामुळे चारही बाजूने जलशुद्धीकरण केंद्राच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.

भोगावती नदीवर ७० वर्षांपूर्वी पंपहाऊस उभारण्यात आले.यासाठी बालिंगा येथे नागदेववाडी येथील

शेतकऱ्यांची २३ एकर जमीन घेऊन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले होते. या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रासाठी विविध उपकरणे बसवण्यात आली. यातून जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध झालेले पाणी चंबूखडी येथील पाण्याच्या टाकीत टाकून जवळपास अर्धे शहर, चार-पाच उपनगरे याचबरोबर शेजारी असणाऱ्या शेकडो कॉलनींची तहान भागवत आहे.

पण या जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. या जलशुद्धीकरण केंद्राला ७० वर्षांपूर्वी बांधलेली दगडी सुरक्षा भिंत होती. पण सध्या ती चारही बाजूने जमीनदोस्त होत आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवती अतिक्रमणाचा विळखा पडू लागला आहे. या शिवाय या संपूूर्ण परिसरात अस्वच्छता निर्माण झाल्याने पाण्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चौकट : सुरक्षा चौकीभाेवती कचऱ्याचे ढीग

कोल्हापूर: गगनबावडा मार्गाकडे पूर्वेला सुरक्षा चौकी आहे. पण तिथे सुरक्षारक्षक नाही. या चौकीभोवती कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या केंद्राजवळ तळीरामांनी आपला अड्डा बनवला आहे. त्यामुळे येथे दिवसाही त्यांचा धिंगाणा सुरु असतो. त्यामुळे कचऱ्याबरोबरच बाटल्यांचा खचही नेहमी पडलेला दिसतो.

फोटो: २३ बालिंगा जलशुध्दीकरण केंद्र

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा भिंत गायब झाली असून काही ठिकाणी अतिक्रमण सुरू झाले आहे.