शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:23 IST

कोपार्डे : बालिंगा, ता. करवीर येथे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवतीच्या ...

कोपार्डे : बालिंगा, ता. करवीर येथे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रालाच अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवतीच्या संरक्षक भिंती गायब होत आहेत. यामुळे चारही बाजूने जलशुद्धीकरण केंद्राच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.

भोगावती नदीवर ७० वर्षांपूर्वी पंपहाऊस उभारण्यात आले.यासाठी बालिंगा येथे नागदेववाडी येथील

शेतकऱ्यांची २३ एकर जमीन घेऊन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले होते. या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्रासाठी विविध उपकरणे बसवण्यात आली. यातून जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध झालेले पाणी चंबूखडी येथील पाण्याच्या टाकीत टाकून जवळपास अर्धे शहर, चार-पाच उपनगरे याचबरोबर शेजारी असणाऱ्या शेकडो कॉलनींची तहान भागवत आहे.

पण या जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. या जलशुद्धीकरण केंद्राला ७० वर्षांपूर्वी बांधलेली दगडी सुरक्षा भिंत होती. पण सध्या ती चारही बाजूने जमीनदोस्त होत आहे. जलशुद्धीकरण केंद्राभोवती अतिक्रमणाचा विळखा पडू लागला आहे. या शिवाय या संपूूर्ण परिसरात अस्वच्छता निर्माण झाल्याने पाण्याच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चौकट : सुरक्षा चौकीभाेवती कचऱ्याचे ढीग

कोल्हापूर: गगनबावडा मार्गाकडे पूर्वेला सुरक्षा चौकी आहे. पण तिथे सुरक्षारक्षक नाही. या चौकीभोवती कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या केंद्राजवळ तळीरामांनी आपला अड्डा बनवला आहे. त्यामुळे येथे दिवसाही त्यांचा धिंगाणा सुरु असतो. त्यामुळे कचऱ्याबरोबरच बाटल्यांचा खचही नेहमी पडलेला दिसतो.

फोटो: २३ बालिंगा जलशुध्दीकरण केंद्र

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्राची सुरक्षा भिंत गायब झाली असून काही ठिकाणी अतिक्रमण सुरू झाले आहे.