शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

यमगेच्या युवकाच्या पंखांना हवे मदतीचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:39 IST

अनिल पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमुरगूड : दुसºयाच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करणाºया एका तरुणाने अफलातून चारचाकी गाडी तयार केली असताना त्याला पुढील दिशा मिळण्यासाठी आणि सहकार्यासाठी मोठमोठ्या राजकीय नेत्यांनीच आणि काही उद्योजकांनी अनास्था दाखवल्यामुळे त्याच्या पदरी निराशाच पडली आहे.गेल्या अनेक महिन्यापासून कोणीतरी आपल्या तंत्रज्ञानाकडे पाहतील आणि आपल्या कल्पनेतून तयार झालेली ...

अनिल पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमुरगूड : दुसºयाच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करणाºया एका तरुणाने अफलातून चारचाकी गाडी तयार केली असताना त्याला पुढील दिशा मिळण्यासाठी आणि सहकार्यासाठी मोठमोठ्या राजकीय नेत्यांनीच आणि काही उद्योजकांनी अनास्था दाखवल्यामुळे त्याच्या पदरी निराशाच पडली आहे.गेल्या अनेक महिन्यापासून कोणीतरी आपल्या तंत्रज्ञानाकडे पाहतील आणि आपल्या कल्पनेतून तयार झालेली गाडी रस्त्यावर धावेल हे स्वप्न पहाणाºया यमगे, ता. कागल येथील अवलियाचे नाव आहे संजय शंकर हुल्ले.यमगे येथील संजय हुल्ले हा तसा गरीब कुटुंबामध्ये जन्माला आला. शिकण्याची इच्छा प्रबळ असतानाही घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा गाडा निम्म्यावरच थांबवावा लागला. संजयला लहानपणापासून गाड्याबाबत कमालीची उत्सुकता. तो गावातील एका ट्रॅक्टरवर माती भरण्याचे काम करत होता. काही दिवसानंतर तो त्याच ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून रुजू झाला व आजपर्यंत कार्यरत आहे.काहीतरी वेगळं करायचं या इराद्याने कार्यरत असणाºया संजयला वाचनाची आवड जास्तच. त्यातूनचपंतप्रधान मो दींच्या ‘मेक इन इंडिया’बाबत वाचलं आणि त्याची अनेक वर्षांपासून मनात घर करून बसलेली गाडी निर्मितीचं स्वप्न सत्यात आणण्याचा संकल्प बळावला. त्या दृष्टीने त्याने सुरुवात केली. दुसºयाच्या ट्रॅक्टरवर मोलमजुरी करून गोळा केलेली पै आणि पै त्याने खर्च केली. गावातील काहीनी त्याला मदत केली. त्यातून दिवसभर मोलमजुरी व रात्री घरात, दारातच या गाडीचे काम त्याने सुरु केले.सुरुवातीला गावकºयांनीही हा निव्वळ वेडेपणा आहे म्हणून त्याला हिणवलेही, पण आज संजयने तयार केलेली रस्त्यावर धावणारी चारचाकी गाडी दारात उभा असल्याचे पाहून सर्वांनी तोंडात बोटे घातली आहेत.आगळ्यावेगळ्या पद्धतीने बनवलेल्या या गाडीमुळे इंधनाची मोठी बचत होणार असून, पूर्णपणे निसर्गाशी निगडीत या गाडीचे धावण्याचे तंत्र आहे. अर्थात यामुळे गाड्यांमुळे वाढणाºया प्रदूषणाला आळा बसणार आहे. ही गाडी तिचे तंत्र, ड्रॉइंग घेऊन संजय अनेक उद्योजकांना भेटला, पण ते तंत्र आणि डिझाइन आपल्याला द्या, त्या बदल्यात आपण काही रक्कम आपल्याला देण्याचे आमिषही दाखवल्याचे या युवकाने सांगितले. आपण तयार केलेली गाडी सर्वसामान्यांसाठी असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी आणि याचे पेटंट घेण्यासाठी या तरुणाला आर्थिक आणि सल्ला मार्गदर्शनाची गरज आहे.कागल तालुक्याला राजकीय विद्यापीठ समजले जाते. कोणत्याही विकासकामाला चालना या ठिकाणी सर्वप्रथम मिळते, पण या उमद्या तरुणाने तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. पण अपेक्षित यश आले नाही, पण या सगळ्याबाबत या तरुणाने नाराजी व्यक्त करत आपल्या या लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या गाडीला पेटंट मिळून रीतसर मान्यता मिळवण्याचा मानस व्यक्त केला आहे.संजयकडून लेखनहीसमाजापासून थोडेसे अलिप्त असणाºया संजयला लेखनाचाही छंद आहे. त्याने आतापर्यंत तीन चित्रपट कथा लिहिल्या आहेत. याबाबत तो नाना पाटेकर यांच्यापर्यंत पोहोचला होता. या क्षेत्रातही त्याला संधी मिळाली नसल्याचे त्याने सांगितले.