शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

रोजंदारीवरील कर्मचारी अडचणीत

By admin | Updated: September 17, 2014 23:49 IST

प्रशासकांच्या नोटिसीवरील स्थगिती उठवली : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील भरती प्रकरण

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील ३७ रोजंदारी कर्मचारी अडचणीत आले आहेत. प्रशासकांच्या ‘कारणे दाखवा नोटिसी’ला जिल्हा औद्योगिक न्यायालयाने दिलेली स्थागिती आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने उठविली. बाजार समितीने औद्योगिक न्यायालयाच्या स्थगिती विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. समितीच्या बरखास्त संचालक मंडळाने पणन संचालकांची परवानगी न घेता ३७ कर्मचाऱ्यांची रोजंदारीवर भरती केली होती. ही बेकायदेशीर भरती असून, त्यांना कमी करण्याचे आदेश प्रशासक डॉ. महेश कदम यांना दिले होते; पण त्यांनी कारवाई केली नव्हती. पणन संचालक डॉ. सुभाष माने हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, याबाबत बाजार समितीचे माजी संचालक नंदकुमार वळंजू यांनी थेट तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे आदेश दिले होते. डॉ. कदम यांनी त्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली. या नोटिसीचा आधार घेत कर्मचाऱ्यांनी प्रथम वर्ग कामगार न्यायालयात याचिका दाखल केली; पण न्यायालयाने याचिका फेटाळून लावत प्रशासकांची नोटीस कायम केली. या निकालाविरोधात कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली. या न्यायालयाने प्रशासकांच्या नोटिसीला स्थगिती देत निकाल लागेपर्यंत कामावर ठेवण्याचे आदेश दिले होते. या स्थगितीविरोधात बाजार समितीचे प्रशासक व सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत समितीचे माजी रोजंदारी कर्मचारी संजय बाबगोंडा पाटील व प्रदीप आडसूळ यांनी ‘थर्ड पार्टी’ म्हणून आपले म्हणणे घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती. ती मान्य करत आज त्यावर सुनावणी झाली. औद्योगिक न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवत प्रशासकांनी दिलेल्या नोटिसीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे समजते. त्याचबरोबर याबाबत ‘थर्ड पार्टी’ म्हणून दाखल झालेल्या याचिकेवर दोन आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे. याबाबत न्यायालयाच्या निकालाची अधिकृत प्रत उपलब्ध झालेली नाही. (प्रतिनिधी) अवमान याचिका दाखल करून्यायालयाच्या आदेशानुसार समितीच्या अशासकीय मंडळाने कर्मचाऱ्यांना कमी केले नाही, तर अवमान याचिका दाखल करू. त्याचबरोबर याबाबत जिल्हा उपनिबंधक व पणन संचालकांना निवेदन देणार असल्याचे समितीचे माजी संचालक नंदकुमार वळंजू यांनी सांगितले. अशासकीय मंडळाची कोंडी!प्रशासकांनी थेट कारवाईचे हत्यारच उपसल्याने राजकीय मंडळींनी त्यांना हटवून आपल्या मर्जीतील अशासकीय मंडळ आणले. त्यांनी पदभार घेतल्यापासून रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी दबाव आहे. न्यायालयीन बाब असल्यानेत्याला काँग्रेसच्या सदस्यांनी विरोध केला होता; पण आता न्यायालयाचा निकाल लागल्याने सदस्यांची कोंडी होणार आहे.