शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

मराठ्यांचा जानेवारीत पुन्हा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लाखोंच्या संख्येने मोर्चे काढूनही मराठा समाजाची कोणतीही मागणी सरकारने मान्य केलेली नाही; त्यामुळे सरकारला धडकी भरविण्यासाठी जानेवारी महिन्यात कोल्हापुरातील गांधी मैदानावर पश्चिम महाराष्टÑातील मराठ्यांची विराट सभा घेण्याचा निर्णय रविवारी येथे घेण्यात आला. सरकारने मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता लवकरात लवकर मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, असा इशारा मराठा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लाखोंच्या संख्येने मोर्चे काढूनही मराठा समाजाची कोणतीही मागणी सरकारने मान्य केलेली नाही; त्यामुळे सरकारला धडकी भरविण्यासाठी जानेवारी महिन्यात कोल्हापुरातील गांधी मैदानावर पश्चिम महाराष्टÑातील मराठ्यांची विराट सभा घेण्याचा निर्णय रविवारी येथे घेण्यात आला. सरकारने मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता लवकरात लवकर मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला.मराठा क्रांती मूक मोर्चाला रविवारी वर्षपूर्ती झाली. या मोर्चाचे फलित काय, याचा ऊहापोह करून पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा महासंघातर्फे शाहू स्मारक भवन येथे मराठा जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, प्राचार्य शिवाजी भुकेले, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, प्रा. विद्या साळोखे, व्ही. के. पाटील, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, उत्तम जाधव, प्रदीप पाटील, सुनील पाटील, दत्ता पाटील, डॉ. संदीप पाटील, आदींची होती.मेळाव्यात जिल्ह्याच्या कानाकोपºयातून आलेल्या मराठा बांधवांनी सरकारविरोधात ‘मूक मोर्चा नको, ठोक मोर्चा’ काढूया अशा भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर इंद्रजित शिरगावकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर जाऊन वसंतराव मुळीक यांना तलवार भेट देऊन ‘आरक्षण मिळाल्याशिवाय तलवार म्यान करायची नाही,’ अशी मागणी केली. लाखोंचे मोर्चे निघूनही समाजाची कोणतीही मागणी सरकारने मान्य केलेली नाही. त्यामुळे शासनावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल करीत सरकारने मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा वसंतराव मुळीक यांनी दिला. मराठ्यांच्या मागण्यांसंदर्भात समाजाच्या भावना लक्षात घेऊन जानेवारी महिन्यात कोल्हापुरातील गांधी मैदानावर पश्चिम महाराष्टÑाची विराट सभा घेण्याचे मुळीक यांनी जाहीर केले. या कालावधीत सरकारने मागण्यांबाबत लवकर निर्णय घ्यावा, असे सांगत मागण्या मान्य झाल्याशिवाय तलवार म्यान करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.सतेज पाटील म्हणाले, मराठा मूक मोर्चाचा आवाज बहुधा सरकारच्या कानांवर गेलेला दिसत नाही. त्यामुळे तेव्हा जर घोषणांचे मोर्चे काढले असते तर या सरकारचे कान बधिर होऊन काहीतरी निर्णय झाला असता. शांततेच्या मार्गाने आम्हाला यश मिळेल असे वाटत होते; परंतु हे कलियुग आहे; त्यामुळे शांत राहून चालणार नाही. आपल्याला संघर्ष करावा लागेल. राजेश क्षीरसागर म्हणाले, या सरकारला आरक्षण द्यायचे नसेल तर जाट, गुर्जर, राजपूत यांच्याप्रमाणे मराठ्यांना पेटून उठावे लागेल. सरकारला आरक्षण द्यायचे असते तर आतापर्यंत दिले असते.यावेळी मारुती मोरे, दत्ता पाटील, रविराज निंबाळकर, चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.तेलही गेले, तूपही गेलेप्राचार्य भुकेले म्हणाले, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत जेवढ्या घोषणा केल्या, त्याचे फलित म्हणजे ‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले,’ असे आहे.