शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मराठ्यांचा जानेवारीत पुन्हा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लाखोंच्या संख्येने मोर्चे काढूनही मराठा समाजाची कोणतीही मागणी सरकारने मान्य केलेली नाही; त्यामुळे सरकारला धडकी भरविण्यासाठी जानेवारी महिन्यात कोल्हापुरातील गांधी मैदानावर पश्चिम महाराष्टÑातील मराठ्यांची विराट सभा घेण्याचा निर्णय रविवारी येथे घेण्यात आला. सरकारने मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता लवकरात लवकर मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, असा इशारा मराठा ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : लाखोंच्या संख्येने मोर्चे काढूनही मराठा समाजाची कोणतीही मागणी सरकारने मान्य केलेली नाही; त्यामुळे सरकारला धडकी भरविण्यासाठी जानेवारी महिन्यात कोल्हापुरातील गांधी मैदानावर पश्चिम महाराष्टÑातील मराठ्यांची विराट सभा घेण्याचा निर्णय रविवारी येथे घेण्यात आला. सरकारने मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता लवकरात लवकर मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, असा इशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिला.मराठा क्रांती मूक मोर्चाला रविवारी वर्षपूर्ती झाली. या मोर्चाचे फलित काय, याचा ऊहापोह करून पुढील दिशा ठरविण्यासाठी मराठा महासंघातर्फे शाहू स्मारक भवन येथे मराठा जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, प्राचार्य शिवाजी भुकेले, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, प्रा. विद्या साळोखे, व्ही. के. पाटील, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, उत्तम जाधव, प्रदीप पाटील, सुनील पाटील, दत्ता पाटील, डॉ. संदीप पाटील, आदींची होती.मेळाव्यात जिल्ह्याच्या कानाकोपºयातून आलेल्या मराठा बांधवांनी सरकारविरोधात ‘मूक मोर्चा नको, ठोक मोर्चा’ काढूया अशा भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर इंद्रजित शिरगावकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर जाऊन वसंतराव मुळीक यांना तलवार भेट देऊन ‘आरक्षण मिळाल्याशिवाय तलवार म्यान करायची नाही,’ अशी मागणी केली. लाखोंचे मोर्चे निघूनही समाजाची कोणतीही मागणी सरकारने मान्य केलेली नाही. त्यामुळे शासनावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? असा सवाल करीत सरकारने मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा वसंतराव मुळीक यांनी दिला. मराठ्यांच्या मागण्यांसंदर्भात समाजाच्या भावना लक्षात घेऊन जानेवारी महिन्यात कोल्हापुरातील गांधी मैदानावर पश्चिम महाराष्टÑाची विराट सभा घेण्याचे मुळीक यांनी जाहीर केले. या कालावधीत सरकारने मागण्यांबाबत लवकर निर्णय घ्यावा, असे सांगत मागण्या मान्य झाल्याशिवाय तलवार म्यान करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.सतेज पाटील म्हणाले, मराठा मूक मोर्चाचा आवाज बहुधा सरकारच्या कानांवर गेलेला दिसत नाही. त्यामुळे तेव्हा जर घोषणांचे मोर्चे काढले असते तर या सरकारचे कान बधिर होऊन काहीतरी निर्णय झाला असता. शांततेच्या मार्गाने आम्हाला यश मिळेल असे वाटत होते; परंतु हे कलियुग आहे; त्यामुळे शांत राहून चालणार नाही. आपल्याला संघर्ष करावा लागेल. राजेश क्षीरसागर म्हणाले, या सरकारला आरक्षण द्यायचे नसेल तर जाट, गुर्जर, राजपूत यांच्याप्रमाणे मराठ्यांना पेटून उठावे लागेल. सरकारला आरक्षण द्यायचे असते तर आतापर्यंत दिले असते.यावेळी मारुती मोरे, दत्ता पाटील, रविराज निंबाळकर, चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.तेलही गेले, तूपही गेलेप्राचार्य भुकेले म्हणाले, सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत जेवढ्या घोषणा केल्या, त्याचे फलित म्हणजे ‘तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले,’ असे आहे.