शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अकरा दिवसांत कोल्हापूर शहरातील दहा हजार टन कचरा, गाळ उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:49 IST

कोल्हापूर शहरातील महापूर ओसरल्यानंतर रोगराईचा फैलाव होऊ नये म्हणून महानगरपालिका आरोग्य विभागाने तातडीने शहर स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, गेल्या ११ दिवसांत अंदाजे तब्बल १० हजार २०० टन कचरा तसेच गाळ उठाव केला असून, ही मोहीम आणखी आठ ते दहा दिवस चालेल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देअकरा दिवसांत दहा हजार टन कचरा, गाळ उचलला पूरग्रस्त भागांत आणखी आठ दिवस उठाव

कोल्हापूर : शहरातील महापूर ओसरल्यानंतर रोगराईचा फैलाव होऊ नये म्हणून महानगरपालिका आरोग्य विभागाने तातडीने शहर स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, गेल्या ११ दिवसांत अंदाजे तब्बल १० हजार २०० टन कचरा तसेच गाळ उठाव केला असून, ही मोहीम आणखी आठ ते दहा दिवस चालेल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.शहरात सोमवारी (दि. ५) पंचगंगेच्या महापुराचे पाणी शिरले. अनेक वसाहतींत घरांना पाण्याने घेरले. अतिवृष्टी आणि महापुरामुळे चौदा हजार कुटुंबांतील जवळपास ४० हजार व्यक्तींना स्थलांतरित व्हावे लागले. आतापर्यंतच्या पुरात यंदाचा महापूर सर्वांत मोठा होता. लोकांचे अतोनात नुकसान झाले. घरातील प्रापंचिक वस्तू, इलेक्ट्रिक वस्तू, कपडे, अंथरूण, अन्नधान्य पुराच्या पाण्यात पाच दिवस राहिल्यामुळे खराब झाले. पूरग्रस्त भागांत चिखलाचे मोठे साम्राज्य निर्माण झाले होते.शनिवारी (दि. १०) महापुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तत्काळ महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पूर ओसरेल तशी स्वच्छता मोहीम गतिमान केली. आरोग्य विभागाने ११ विभागांची पथके तयार करून त्या-त्या भागात कचरा उठाव, गाळ-चिखल उठाव तसेच रोगराई पसरू नये म्हणून औषध व धूर फवारणी मोहीम हाती घेतली.

सुरुवातीला या कामासाठी ४०० कर्मचारी तैनात करण्यात आले. नंतर ही संख्या ७५० पर्यंत वाढविली. याशिवाय स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, विद्यार्थी असे रोज २०० ते २५० जण या मोहिमेत सहभागी होत होते. देवस्थान समिती, मुंबई महानगरपालिका, रत्नागिरी नगरपालिका, बी व्ही जी इंडिया ग्रुप, आर्ट आॅफ लिव्हिंग, अप्पासाहेब धर्माधिकारी फौंडेशन यांचे स्वयंसेवक, न्यू कॉलेज, महावीर कॉलेज, पुण्याच्या आॅल इंडिया शिवाजी मेमोरियलच्या विद्यार्थ्यांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.गेल्या ११ दिवसांत शहरातील पूरग्रस्त भागातून १०२० डंपर कचरा व गाळ उठाव करण्यात आला. प्रत्येक डंपरमध्ये सरासरी दहा टन कचरा सामावला जातो. या हिशेबाने १० हजार २०० टन कचरा उचलला गेला. महापुरानंतर रस्त्यावर आलेल्या कचऱ्यापैकी ८० टक्के कचरा, गाळ व खरमाती उचलण्यात आली आहे. अद्यापही २० टक्के उठाव बाकी आहे. त्यामुळे ही मोहीम आणखी आठ ते दहा दिवस सुरू राहणार आहे.सामाजिक जाणिवेचे भानकोल्हापूर शहरावर ओढवलेले महापुराचे संकट दूर झाल्यानंतर शहरातील स्वच्छता आणि कचरा उठावाचे एक मोठे आव्हान होते. संभाव्य रोगराईवर नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे होते. मात्र महापालिकेच्या प्रशासनाला हे आव्हान पेलवणारे नव्हते. शहरातील अनेक दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सरकारी, निमसरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात देत स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.

आयुक्त कलशेट्टी यांच्यासह शाहू छत्रपती, पोलीस अधीक्षक डॉॅ. अभिनव देशमुख, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, मालोजीराजे, मधुरिमाराजे यांनीही सामाजिक जाणिवेच्या कल्पनेतून या मोहिमेत भाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडले.

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिका