शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

अकरा दिवसांत कोल्हापूर शहरातील दहा हजार टन कचरा, गाळ उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 13:49 IST

कोल्हापूर शहरातील महापूर ओसरल्यानंतर रोगराईचा फैलाव होऊ नये म्हणून महानगरपालिका आरोग्य विभागाने तातडीने शहर स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, गेल्या ११ दिवसांत अंदाजे तब्बल १० हजार २०० टन कचरा तसेच गाळ उठाव केला असून, ही मोहीम आणखी आठ ते दहा दिवस चालेल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देअकरा दिवसांत दहा हजार टन कचरा, गाळ उचलला पूरग्रस्त भागांत आणखी आठ दिवस उठाव

कोल्हापूर : शहरातील महापूर ओसरल्यानंतर रोगराईचा फैलाव होऊ नये म्हणून महानगरपालिका आरोग्य विभागाने तातडीने शहर स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, गेल्या ११ दिवसांत अंदाजे तब्बल १० हजार २०० टन कचरा तसेच गाळ उठाव केला असून, ही मोहीम आणखी आठ ते दहा दिवस चालेल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.शहरात सोमवारी (दि. ५) पंचगंगेच्या महापुराचे पाणी शिरले. अनेक वसाहतींत घरांना पाण्याने घेरले. अतिवृष्टी आणि महापुरामुळे चौदा हजार कुटुंबांतील जवळपास ४० हजार व्यक्तींना स्थलांतरित व्हावे लागले. आतापर्यंतच्या पुरात यंदाचा महापूर सर्वांत मोठा होता. लोकांचे अतोनात नुकसान झाले. घरातील प्रापंचिक वस्तू, इलेक्ट्रिक वस्तू, कपडे, अंथरूण, अन्नधान्य पुराच्या पाण्यात पाच दिवस राहिल्यामुळे खराब झाले. पूरग्रस्त भागांत चिखलाचे मोठे साम्राज्य निर्माण झाले होते.शनिवारी (दि. १०) महापुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तत्काळ महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पूर ओसरेल तशी स्वच्छता मोहीम गतिमान केली. आरोग्य विभागाने ११ विभागांची पथके तयार करून त्या-त्या भागात कचरा उठाव, गाळ-चिखल उठाव तसेच रोगराई पसरू नये म्हणून औषध व धूर फवारणी मोहीम हाती घेतली.

सुरुवातीला या कामासाठी ४०० कर्मचारी तैनात करण्यात आले. नंतर ही संख्या ७५० पर्यंत वाढविली. याशिवाय स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, विद्यार्थी असे रोज २०० ते २५० जण या मोहिमेत सहभागी होत होते. देवस्थान समिती, मुंबई महानगरपालिका, रत्नागिरी नगरपालिका, बी व्ही जी इंडिया ग्रुप, आर्ट आॅफ लिव्हिंग, अप्पासाहेब धर्माधिकारी फौंडेशन यांचे स्वयंसेवक, न्यू कॉलेज, महावीर कॉलेज, पुण्याच्या आॅल इंडिया शिवाजी मेमोरियलच्या विद्यार्थ्यांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.गेल्या ११ दिवसांत शहरातील पूरग्रस्त भागातून १०२० डंपर कचरा व गाळ उठाव करण्यात आला. प्रत्येक डंपरमध्ये सरासरी दहा टन कचरा सामावला जातो. या हिशेबाने १० हजार २०० टन कचरा उचलला गेला. महापुरानंतर रस्त्यावर आलेल्या कचऱ्यापैकी ८० टक्के कचरा, गाळ व खरमाती उचलण्यात आली आहे. अद्यापही २० टक्के उठाव बाकी आहे. त्यामुळे ही मोहीम आणखी आठ ते दहा दिवस सुरू राहणार आहे.सामाजिक जाणिवेचे भानकोल्हापूर शहरावर ओढवलेले महापुराचे संकट दूर झाल्यानंतर शहरातील स्वच्छता आणि कचरा उठावाचे एक मोठे आव्हान होते. संभाव्य रोगराईवर नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे होते. मात्र महापालिकेच्या प्रशासनाला हे आव्हान पेलवणारे नव्हते. शहरातील अनेक दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सरकारी, निमसरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात देत स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.

आयुक्त कलशेट्टी यांच्यासह शाहू छत्रपती, पोलीस अधीक्षक डॉॅ. अभिनव देशमुख, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, मालोजीराजे, मधुरिमाराजे यांनीही सामाजिक जाणिवेच्या कल्पनेतून या मोहिमेत भाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडले.

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिका