शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

कवठेएकंदला १२ तास आतषबाजीने डोळे दिपले

By admin | Updated: October 24, 2015 00:23 IST

नयनरम्य दारुकाम : श्री सिद्धराजाचा पालखी सोहळा उत्साहात; पोलीस यंत्रणा, प्रशासनाला सहकार्य

प्रदीप पोतदार-कवठेएकंद -श्री सिद्धराजाच्या पांढरीत भाविकांची जमलेली गर्दी, गर्दीतून उमटणारा ‘हर, हर..’चा गजर, डोळे दीपविणारी आतषबाजी आणि बेभानपणे चमकत्या ठिणग्यांच्या वर्षावात नाचणे अशा उत्साही आणि जल्लोषी वातावरणात ग्रामदैवतश्री सिद्धराजाचा पालखी सोहळा साजरा झाला. तब्बल १२ तास रंगीबेरंगी आतषबाजीचा झालेला नजराणा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. पोलीस यंत्रणा, प्रशासन आणि यात्रा कमिटीच्या संयोजनाला गावकऱ्यांनी चांगली साथ देत सुरक्षित व विनाअपघात दसरा उत्सव पार पाडून आदर्श नोंदविला. रात्री ८.१५ वाजता श्री मंदिरात पूजाअर्चा होऊन पालखी सोहळ्यास हजारो औटांची सलामी दिली. बिरदेव मंदिर परिसरातील शिलंगण चौकात चव्हाण पाटील कट्ट्यावर मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोनं (आपट्याची पानं) लुटण्याचा कार्यक्रम झाला. श्री सिद्धराजांची पूजाअर्चा होऊन ग्रामप्रदक्षिणेस श्री बिरदेवाच्या पालखीसह प्रारंभ झाला. रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या आतषबाजीची सलामी घेत पालखी पुढे-पुढे सरकत होती. रात्र चढेल तसा आतषबाजीच्या नानाविध प्रकारांनी पालखी सोहळ्याचा रंग अधिकत चढत होता. लाकडी शिंगाडांचे चमकते अग्निफवारे, खांद्यावर अवकाशात फुटणाऱ्या औटांची बरसात, कागदी शिंगाडांचे दरारे, बुरुज, फुगडी, दाणपा धबधबे अशा पारंपरिक, नानाविध प्रकारांमुळे आतषबाजी करताना यात्रेकरूंची वाहवा मिळवून गेली. १२ तास आसमंत उजळून टाकणारा पालखी सोहळा रंगला.ग्रामप्रदक्षिणेच्या मुख्य मार्गावर यात्रा कमिटीने नेटके नियोजन करून सुरक्षित सोहळ्यासाठी प्रयत्न केले. पालखी पुढे पुढे सरकत असताना गर्दीचा उत्साह वाढेल तसा आतषबाजीचा नजराणा अधिकच खुलत होता. भक्ती आणि कलेच्या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. श्री सिद्धराजाच्या पालखीसमवेत सजवलेला रुबाबदार अश्व, आरती-दिवटी, छत्र, चामर, सनई अशा दिमाखात पालखी सोहळ्यासाठी गावा-गावाहून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शन घेतले. रात्रभर चमकत्या ठिणग्यांच्या वर्षावात आतषबाजीचा आनंद लुटला. दारोदारी सुहासिनींनी पालखीस ओवाळून दर्शन घेतले. ग्रामप्रदक्षिणा पूर्ण होऊन श्री पालखी देवधरे येथे मानाच्या घरी श्रीची भेट होऊन पूजाअर्चा झाली. त्यावेळी सकाळ होऊन पालखी परत पळवत श्री मंदिरात येऊन सांगता होते.जवळपास १२ ते १३ तास पालखी सोहळ्याचा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला. पालखीसोबत गुरव, पुजारी, मानकरी चव्हाण, पाटील, सेवेकरी डवरी, गोंधळी, विविध जाती-धर्माचे पूर्वापार सेवक मंडळी, भाविक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रीबाण बंदीमुळे धोके टळलेयात्रेदिवशी आकाशात सोडलेला पत्री बाण डोक्यात पडल्याने अनेकजण जखमी होत होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून पत्री बाण करणे ग्रामस्थांनी बंद केल्याने यात्रेकरूंना सर्वत्र बिनधास्तपणे वावरता येत होते. बाण नसल्याने इकडून तिकडे ठिणगी पडण्याचे प्रकार थांबल्याने धोके टळले.चोख व्यवस्थाप्रांताधिकारी सुभाष बोरकर, तहसीलदार सुधाकर भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात्रा सुरक्षिततेबाबत केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. गावातील चौका-चौकात तलाठी, मंडल अधिकारी, पोलीस यंत्रणेसह आरोग्य विभाग, विद्युत कंपनीचे पदाधिकारी, सेवक तैनात होते. तातडीची सेवा म्हणून आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाड्या उपस्थित होत्या.