शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

स्वराज्य संस्थांची पाणी, वीज बिले शासन भरणार : ‘ग्रामविकास’च्या आदेशाची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:58 IST

मार्च २०१८ अखेरची महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांची ५० टक्के थकीत पाणीपुरवठा आणि वीज बिले १४व्या वित्त आयोगातून भरण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने

ठळक मुद्देमार्च २०१८ अखेरची थकबाकी चार हजार ५३७ कोटी रुपयांची

कोल्हापूर : मार्च २०१८ अखेरची महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांची ५० टक्के थकीत पाणीपुरवठा आणि वीज बिले १४व्या वित्त आयोगातून भरण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याबाबत उद्योग आणि ऊर्जा विभागाने आदेश काढला असून, मात्र ग्रामविकास विभागाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची स्थानिक स्वराज्य संस्थांची राज्यातील एकूण थकबाकी ४ हजार ५३८ कोटी रुपयांची आहे. २१ नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊर्जा विभागाने याबाबत प्रस्ताव मांडला होता. त्यावर चर्चा करताना या सर्व थकीत रकमेवरील दंड व व्याज वगळता मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम १४व्या वित्त आयोगातून देण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार ८ मार्च २०१८ च्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयानुसार आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची जी पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची थकबाकी आहे, त्यांपैकी दंड व व्याज सोडूनची मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम आता थेट शासनाकडून चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून त्या-त्या विभागाला अदा करणार आहे.

उर्वरित ५० टक्के रक्कम ही संबंधित संस्थांनी, त्यांना मिळालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्याबाबतही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीचा मुद्दा तात्पुरता निकालात निघणार आहे. मात्र, मार्च २०१८ नंतरची सर्व बिले ही त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना भरणे बंधनकारक राहणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणार दिलासाराज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांची ही बिले थकीतच आहेत. करवसुली आणि येणारी बिले यांचा ताळमेळ लागत नसल्याने थकबाकी वाढली आहे.शासनानेच आता हा निर्णय घेतल्याने या संस्थांना दिलासा मिळणार आहे. मात्र, यासाठी नगरविकास आणि ग्रामविकास विभागाचा आदेश निघणे आवश्यक असून, तो मिळाल्याशिवाय यापुढील कार्यवाही अशक्य आहे.